शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: इलेक्टिक कारच्या ऑटोमेटिक फिचरनं घेतला मालकाचा जीव?; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल
2
ऑनलाइन फॅन्टसी गेमिंगवर अखेर बंदी; नवीन विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची मोहोर
3
टिकटॉक भारतात परत सुरू होणार? नवीन अपडेट आली, सोशल मीडियावर जोरदार चर्चा
4
अबब! ३५ लाख जप्त, २० लाखांची रोकड जाळली; सरकारी इंजिनिअरचा 'काळा' प्रताप उघड, नेमकं काय घडलं?
5
सोलापूर: माहेराहून पैसे आण, चाबकाने मारले फटके; काजलने आयुष्य संपवले, वैष्णवी हगवणे घटनेची पुनरावृत्ती?
6
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद
7
भारतावरील 'टॅरिफ'वरून' ट्रम्प यांच्यावर टीका केली, माजी अमेरिकन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराच्या घरावर एफबीआयचा छापा
8
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
9
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
10
Video: सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला अन् नाशिकमधला राडा समोर आला; कुत्र्याने बिबट्यावरच केला हल्ला
11
लवकरच ममता बॅनर्जींचे सरकार जाणार अन्..; कोलकात्यातून PM मोदींचा हल्लाबोल
12
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या
13
बीडमध्ये खळबळ! सरकारी वकिलाने कोर्टातच संपवले आयुष्य, न्यायाधीशासह दोघांवर गुन्हा; प्रकरण काय?
14
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
15
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात
16
संपूर्ण देशाची फेव्हरिट बनली ही ₹9 लाखाहून कमी किंमतीची SUV; नेक्सन, पंच, फ्रोंक्सला टाकलं मागे; विक्री घटूनही ठरली नं. 1
17
विवाह नोंदणी कार्यालयात हायव्होल्टेज ड्रामा; मेहुणीसोबत दाजी करणार होता लग्न, तितक्यात...
18
भारतीय ड्रायव्हर्संना डोनाल्ड ट्रम्प यांचा झटका! वर्कर व्हिसा मिळणार नाही, अमेरिकेतील नोकऱ्या जाणार
19
या मल्टीबॅगर स्टॉकला मिळालं 499.95 कोटींचं काम, रेल्वे सेक्टरशी संबंधित आहे नवी वर्क ऑर्डर; जाणून घ्या सविस्तर
20
जोधपूरला जाणारे एअर इंडियाचे विमान अचानक परतले, मुंबई विमानतळावर गोंधळ! नेमकं झालं काय?

बंद केलेले जलवाहिनीचे काम पुन्हा सुरु

By admin | Updated: April 28, 2015 00:22 IST

बांदा-वेंगुर्ले जलवाहिनी : दर्जेदार नसल्याने काम थांबविले

शिरीष नाईक-कसई दोडामार्ग  तिलारी धरणाचे पाणी मणेरी नदीतून उपसा करून वेंगुर्ले येथे नेणाऱ्या ३५० कोटी रुपये मंंजूर असलेल्या जलवाहिनीचे काम पुन्हा युद्धपातळीवर सुरु झाले आहे. हे काम अनेक राजकीय नेत्यांनी थांबवले होते.दोडामार्ग ते बांदा या राज्यमार्गावर रस्त्याच्या कडेला चर मारून जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू होते. मात्र, काम दर्जेदार होत नसल्यामुळे रस्त्याच्या बाजूपट्टीला तडे जात असल्याची व अन्य कारणे पुढे करून काही राजकीय पदाधिकाऱ्यांनी जलवाहिनीचे काम अडविले होते. मात्र, बांधकाम व प्रकल्प अधिकाऱ्यांनी एकाही आश्वासनाची पूर्तता न करता काम पुन्हा युद्धपातळीवर सुरू केले. मणेरी येथून बांदा ते वेेंगुर्ले अशी जलवाहिनी राज्यमार्गावरून टाकण्यात येत आहे. रस्त्याच्या कडेला भला मोठा चर मारून त्यामध्ये वाहिनी टाकून वर साधी माती टाकण्यात येत आहे. त्यामुळे काही ठिकाणी रस्त्यावर चर पडून वाहतुकीस धोकादायक बनत आहे. हे काम महिनाभर सुरू आहे.

जलवाहिनीचे काम सुरू असताना कामात अडथळे नको म्हणून काहींना हाताशी धरले होते. त्यामुळे काम सुरळीत सुरू होते. मात्र, पंधरा दिवसांपूर्वी पुन्हा हे काम बंद पाडण्यात आले. काम दर्जेदार होत नाही, बाजूपट्टी कापल्याने रस्त्याला तडे गेले, खड्डे बुजविण्यासाठी साध्या मातीचा भराव टाकल्याने पावसाळ्यात माती वाहून जाऊन अपघात होण्याची शक्यता आदी कारणे पुढे करून काही राजकीय पदाधिकाऱ्यांनी काम बंद करून कामाची पाहणी केली. यावेळी सर्व संंबंधित अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले होेते. उपस्थित बांधकाम उपअभियंता पी. जी. पाटील यांना धारेवर धरले होते. यावेळी पाटील यांनी रस्त्याच्या कडेने पाईप टाकण्यास परवानगी दिली नाही, असे सांगून संबंधित प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करणार तसेच रस्त्याची बाजूपट्टी त्वरित दुरुस्त करणार, असे आश्वासन दिले होते. मात्र, लेखी आश्वासन देण्याची मागणी करून अधिकाऱ्यांची बैठक लावा, तोपर्यंत काम सुरू करू नये, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला होता. त्यानंतर पाटील यांनी काम बंद करण्याचे लेखी पत्र प्रकल्प अधिकाऱ्यांना दिले होते. त्यामुळे पंधरा दिवस हे काम ठप्प होते. मधल्या काळात अनेक घडामोडी घडल्या. बैठका झाल्या आणि चार दिवसांपूर्वी काम युद्धपातळीवर पुन्हा सुरू करण्यात आले. आंदोलनावेळी उपस्थित के लेल्या एकाही मुद्याचे पालन केलेले नाही. बाजूपट्टीची दुरुस्ती केलेली नाही. तसे स्पष्टीकरणही कोणी दिले नाही. आणि अचानक काम सुरू झाल्याने ग्रामस्थ संभ्रमात पडले आहेत. काम सुरू झाल्यावर कोणताही नेता फिरकला नाही. सर्वांनीच पाठ फिरवली. याबाबत संबंधित आंदोलनकर्त्यांना विचारले असता त्यांनी बांधकाम विभागाने प्रकल्प अधिकाऱ्यांना लेखी पत्र दिल्याने काम सुरू झाल्याची उडवाउडवीची उत्तरे दिली. दोडामार्ग ते बांदा हा राज्यमार्ग आहे. जलवाहिनीच्या कामात रस्त्याच्या कडेला चर मारून वर साधी माती ओढल्याने पावसाळ्यात रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक बनणार आहे. पाणी मुरतेय? गॅसवाहिनी, मायनिंग प्रकल्प आणि आता तिसऱ्या जलवाहिनी प्रकल्पांना राजकीय नेत्यांनीच प्रथम प्रखर विरोध केला. परंतु नंतर तिन्हीही प्रकल्प सुरू झाले. येथे काही पाणी मुरत आहे की लोकांची आणि शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे?, शेतकऱ्यांना वाली कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे.