शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
2
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
3
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
4
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
5
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
6
महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
7
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
8
रेखा झुनझुनवालांकडे या कंपनीचे तब्बल ५ कोटींहून अधिक शेअर; ₹३०० पार जाणार स्टॉक, एक्सपर्ट्सचा दावा
9
Photo: 'या' वर्षातील बेस्ट बजेट स्मार्टफोन, किंमत १५ हजारांपेक्षा कमी, यादीत मोठे ब्रँड्स
10
Wedding Ritual: लग्नाआधीची विचित्र प्रथा, वरच्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी वधूला करावं लागतं 'हे' काम
11
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
12
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
13
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
14
सलग दुसऱ्या आठवड्याची सुरुवात घसरणीने! 'या' ३ कारणांमुळे बाजारात चांगली रिकव्हरी
15
IPL 2026 Mock Auction : CSK ची थट्टा? KKR नं ऑस्ट्रेलियन खेळाडूवर लावली ३०.५० कोटींची विक्रमी बोली!
16
भारतीय ऑटो बाजारातील सर्वात मोठी बातमी! फोक्सवॅगनची हजारो कर्मचाऱ्यांना व्हीआरएसची ऑफर, फोर्डच्याच वाटेवर?
17
पुतिन मायदेशी परतताच भारताने तयार केली ३०० वस्तूंची यादी, काय आहे केंद्र सरकारचा प्लॅन
18
१६ डिसेंबर पासून सुरु होत आहे धनुर्मास; आहार, आरोग्य, लक्ष्मी उपासनेसाठी महत्त्वाचा महिना!
19
Shaheen Afridi: शाहीन आफ्रिदीचा अपमान; बिग बॅश लीगमध्ये गोलंदाजी करण्यापासून रोखलं! नेमकं प्रकरण काय?
20
भारताच्या निर्यातीला मोठा 'बूस्ट'! नोव्हेंबरमध्ये १९.३७% ची वाढ; व्यापार तुटीतही मोठा दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

जनतेचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न

By admin | Updated: June 27, 2015 00:22 IST

गिरीष बापट : कासार्डे येथील संवाद कार्यक्रमात मार्गदर्शन

नांदगाव : सर्वसामान्य माणसाच्या दैनंदिन जीवनाशी निगडित असलेले अन्न व नागरी पुरवठा हे खाते माझ्याकडे आहे. विविध कल्याणकारी योजनांचा लाभ सर्वसामान्यांना मिळत नाही. सरकारी यंत्रणांच्या चुकांमुळे गरीब लाभार्थी दारिद्र्यरेषेखालील कार्ड नसल्याने शासनाच्या अनेक योजनांपासून वंचित आहेत. हे चित्र बदलण्यासाठी सक्षम यंत्रणा निर्माण करण्याचे आव्हान मी स्वीकारले आहे आणि या खात्याचे स्वरूप पालटण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची गरज आहे. या विभागाच्या विविध समस्या कार्यकर्त्यांनी माझ्यापर्यंत लेखी स्वरूपात द्याव्यात. त्यामुळे जनतेचे प्रश्न सोडविण्यास मदत होईल, असे आवाहन राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट यांनी केले.कासार्डे येथील अभिषेक मंगल कार्यालयामध्ये आयोजित कार्यकर्त्यांशी संवाद कार्यक्रमप्रसंगी मंत्री बापट बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर माजी आमदार प्रमोद जठार, अ‍ॅड. अजित गोगटे, भाजप जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर, जिल्हा सरचिटणीस जयदेव कदम, राजन चिके, प्रमोद रावराणे, राजेंद्र म्हापसेकर, राजू राऊळ, संजय नकाशे, अमोल लोके उपस्थित होते.कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना मंत्री गिरीष बापट म्हणाले, गरीब जनता अजूनही दारिद्र्यरेषेखालील कार्डापासून वंचित आहे. श्रीमंतांचा दारिद्र्यरेषेखालील यादीमध्ये समावेश आहे. संपूर्ण यंत्रणेमध्ये भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात सुरू आहे. या सगळ्या गोष्टींना आळा घालण्यासाठी व व्यवस्था बदलासाठी बायोमेट्रिक पद्धतीबरोबरच निरनिराळ्या उपाययोजनांचा अवलंब केला जात आहे. शासनाच्या विविध कल्याणकारी योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दुवा बनून काम केले पाहिजे. सरकार चालविणे सोपे काम नाही. अनेक समस्यांवर मात करून राज्याच्या विकासाच्या व समृद्धीच्या दिशेने न्यायचे आहे. त्यासाठी टीमवर्कची गरज आहे. आपला या मतदारसंघातील हक्काचा आमदार आपण निवडून आणू शकलो नाही ही सल मला बोचते आहे. याची जाणीव प्रत्येक कार्यकर्त्यांनी मनाशी खूणगाठ बांधून त्यादृष्टीने सतर्क राहून आतापासूनच तयारी सुरू केली पाहिजे.आपण स्वत: प्रत्येक जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या गाठी-भेटी घेऊन त्यांच्याशी चर्चा करून संवाद साधण्याचा आपला प्रयत्न आहे. जेणेकरून संघटनेच्या कार्यात चैतन्य निर्माण होईल. कार्यकर्ते आपापल्या भागामध्ये आपल्या कार्याच्या माध्यमातून आपले वेगळे स्थान निर्माण करू शकतील. यादृष्टीने आपला प्रयत्न आहे. पुन्हा मी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी येणार असल्याचे सांगितले. त्याचबरोबर कार्यकर्त्यांशी हसत-खेळत संवाद साधण्याबरोबर कार्यकर्त्यांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांना समर्पक उत्तरे खेळीमेळीत दिली. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला होता.याप्रसंगी माजी आमदार अ‍ॅड. अजित गोगटे, दोडामार्ग तालुकाध्यक्ष रंगनाथ गवस, राजन चिके, मानसी वाळवे, आदींसह कार्यकर्त्यांनी अन्न व नागरी पुरवठा विभागासंदर्भात प्रश्न मांडले.माजी आमदार प्रमोद जठार यांच्या हस्ते गिरीष बापट यांना मोठा हार घालून स्वागत करण्यात आले. जयदेव कदम यांनी सूत्रसंचालन केले. अतुल काळसेकर यांनी आभार मानले. (वार्ताहर)एपीएल कार्डधारकांना अन्नसुरक्षा कायद्यामुळे धान्यच मिळत नाही, ही वस्तुस्थिती आहे. यासाठी सरकारी यंत्रणांची मानसिकता बदलण्याची गरज आहे.-गिरीष बापट, अन्नपुरवठा मंत्री