शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
3
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
4
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
6
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
7
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
8
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
9
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
10
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
11
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
12
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
13
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
14
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
15
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
16
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
17
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
18
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
19
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
20
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'

जनतेचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न

By admin | Updated: June 27, 2015 00:22 IST

गिरीष बापट : कासार्डे येथील संवाद कार्यक्रमात मार्गदर्शन

नांदगाव : सर्वसामान्य माणसाच्या दैनंदिन जीवनाशी निगडित असलेले अन्न व नागरी पुरवठा हे खाते माझ्याकडे आहे. विविध कल्याणकारी योजनांचा लाभ सर्वसामान्यांना मिळत नाही. सरकारी यंत्रणांच्या चुकांमुळे गरीब लाभार्थी दारिद्र्यरेषेखालील कार्ड नसल्याने शासनाच्या अनेक योजनांपासून वंचित आहेत. हे चित्र बदलण्यासाठी सक्षम यंत्रणा निर्माण करण्याचे आव्हान मी स्वीकारले आहे आणि या खात्याचे स्वरूप पालटण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची गरज आहे. या विभागाच्या विविध समस्या कार्यकर्त्यांनी माझ्यापर्यंत लेखी स्वरूपात द्याव्यात. त्यामुळे जनतेचे प्रश्न सोडविण्यास मदत होईल, असे आवाहन राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट यांनी केले.कासार्डे येथील अभिषेक मंगल कार्यालयामध्ये आयोजित कार्यकर्त्यांशी संवाद कार्यक्रमप्रसंगी मंत्री बापट बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर माजी आमदार प्रमोद जठार, अ‍ॅड. अजित गोगटे, भाजप जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर, जिल्हा सरचिटणीस जयदेव कदम, राजन चिके, प्रमोद रावराणे, राजेंद्र म्हापसेकर, राजू राऊळ, संजय नकाशे, अमोल लोके उपस्थित होते.कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना मंत्री गिरीष बापट म्हणाले, गरीब जनता अजूनही दारिद्र्यरेषेखालील कार्डापासून वंचित आहे. श्रीमंतांचा दारिद्र्यरेषेखालील यादीमध्ये समावेश आहे. संपूर्ण यंत्रणेमध्ये भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात सुरू आहे. या सगळ्या गोष्टींना आळा घालण्यासाठी व व्यवस्था बदलासाठी बायोमेट्रिक पद्धतीबरोबरच निरनिराळ्या उपाययोजनांचा अवलंब केला जात आहे. शासनाच्या विविध कल्याणकारी योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दुवा बनून काम केले पाहिजे. सरकार चालविणे सोपे काम नाही. अनेक समस्यांवर मात करून राज्याच्या विकासाच्या व समृद्धीच्या दिशेने न्यायचे आहे. त्यासाठी टीमवर्कची गरज आहे. आपला या मतदारसंघातील हक्काचा आमदार आपण निवडून आणू शकलो नाही ही सल मला बोचते आहे. याची जाणीव प्रत्येक कार्यकर्त्यांनी मनाशी खूणगाठ बांधून त्यादृष्टीने सतर्क राहून आतापासूनच तयारी सुरू केली पाहिजे.आपण स्वत: प्रत्येक जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या गाठी-भेटी घेऊन त्यांच्याशी चर्चा करून संवाद साधण्याचा आपला प्रयत्न आहे. जेणेकरून संघटनेच्या कार्यात चैतन्य निर्माण होईल. कार्यकर्ते आपापल्या भागामध्ये आपल्या कार्याच्या माध्यमातून आपले वेगळे स्थान निर्माण करू शकतील. यादृष्टीने आपला प्रयत्न आहे. पुन्हा मी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी येणार असल्याचे सांगितले. त्याचबरोबर कार्यकर्त्यांशी हसत-खेळत संवाद साधण्याबरोबर कार्यकर्त्यांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांना समर्पक उत्तरे खेळीमेळीत दिली. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला होता.याप्रसंगी माजी आमदार अ‍ॅड. अजित गोगटे, दोडामार्ग तालुकाध्यक्ष रंगनाथ गवस, राजन चिके, मानसी वाळवे, आदींसह कार्यकर्त्यांनी अन्न व नागरी पुरवठा विभागासंदर्भात प्रश्न मांडले.माजी आमदार प्रमोद जठार यांच्या हस्ते गिरीष बापट यांना मोठा हार घालून स्वागत करण्यात आले. जयदेव कदम यांनी सूत्रसंचालन केले. अतुल काळसेकर यांनी आभार मानले. (वार्ताहर)एपीएल कार्डधारकांना अन्नसुरक्षा कायद्यामुळे धान्यच मिळत नाही, ही वस्तुस्थिती आहे. यासाठी सरकारी यंत्रणांची मानसिकता बदलण्याची गरज आहे.-गिरीष बापट, अन्नपुरवठा मंत्री