शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

‘सहा टक्के’साठी प्रयत्न

By admin | Updated: February 2, 2015 00:08 IST

मुख्यमंत्र्यांना भेटणार : आंबा बागायतदार बैठकीत निर्णय

रत्नागिरी : शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांकडे आंबा विक्रीस पाठवल्यानंतर शासन निर्णयानुसार दलाली केवळ सहा टक्केच घेण्यात यावी. परंतु, १० टक्के दलाली घेण्यात येत असल्याने, ती रद्द करण्यात यावी, अशी मागणी रत्नागिरी जिल्हा आंबा उत्पादक संघातर्फे व्यापाऱ्यांकडे करण्यात येणार आहे. याशिवाय, राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊन या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी विनंती करण्यात येणार आहे.मराठा भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या आंबा उत्पादकांच्या बैठकीत संबंधित निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. कॅनिंगच्या दरामध्ये नेहमी चढउतार असतो. परंतु कॅनिंगचा दर शेवटपर्यंत स्थिर रहाणे आवश्यक आहे. याकरिता संघाने कमिटी स्थापन करावी. बाजार दरावर परिणाम करणाऱ्या कॅनिंग कंपनीच्या प्रतिनिधींना त्यामध्ये सहभागी करुन घेऊन दर निश्चित करण्यात यावेत. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रतिनिधींशी चर्चा करुन बाजार समितीच्या आवारातच कॅनिंग आंब्याची खरेदी-विक्री व्हावी.आंब्याच्या हंगामामध्ये वाहतूकदारांनी कोणत्याही प्रकारचा संप करुन शेतकऱ्यांची गैरसोय करु नये. यासाठी वाहतूकदारांशी आंबा उत्पादक संघ चर्चा करणार असून, तसे निवेदनही सादर करणार आहे. या वेळी बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांना भेटून निवेदन देण्यासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली.यावेळी झालेल्या बैठकीस डॉ. विवेक भिडे, मंदार सरपोतदार, तुकाराम घवाळी, उमर धामस्कर, अनिल पटवर्धन, हनिफ धामस्कर, प्रसन्न पेठे, हसन धामस्कर, धाडस सावंत व पदाधिकारी, बागायतदार उपस्थित होते. (प्रतिनिधी)