शहरं
Join us  
Trending Stories
1
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
2
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
3
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
4
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
5
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
7
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
8
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
9
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
10
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
11
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
12
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
13
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
14
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
15
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
16
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
17
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
18
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
19
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
20
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च

‘सहा टक्के’साठी प्रयत्न

By admin | Updated: February 2, 2015 00:08 IST

मुख्यमंत्र्यांना भेटणार : आंबा बागायतदार बैठकीत निर्णय

रत्नागिरी : शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांकडे आंबा विक्रीस पाठवल्यानंतर शासन निर्णयानुसार दलाली केवळ सहा टक्केच घेण्यात यावी. परंतु, १० टक्के दलाली घेण्यात येत असल्याने, ती रद्द करण्यात यावी, अशी मागणी रत्नागिरी जिल्हा आंबा उत्पादक संघातर्फे व्यापाऱ्यांकडे करण्यात येणार आहे. याशिवाय, राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊन या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी विनंती करण्यात येणार आहे.मराठा भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या आंबा उत्पादकांच्या बैठकीत संबंधित निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. कॅनिंगच्या दरामध्ये नेहमी चढउतार असतो. परंतु कॅनिंगचा दर शेवटपर्यंत स्थिर रहाणे आवश्यक आहे. याकरिता संघाने कमिटी स्थापन करावी. बाजार दरावर परिणाम करणाऱ्या कॅनिंग कंपनीच्या प्रतिनिधींना त्यामध्ये सहभागी करुन घेऊन दर निश्चित करण्यात यावेत. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रतिनिधींशी चर्चा करुन बाजार समितीच्या आवारातच कॅनिंग आंब्याची खरेदी-विक्री व्हावी.आंब्याच्या हंगामामध्ये वाहतूकदारांनी कोणत्याही प्रकारचा संप करुन शेतकऱ्यांची गैरसोय करु नये. यासाठी वाहतूकदारांशी आंबा उत्पादक संघ चर्चा करणार असून, तसे निवेदनही सादर करणार आहे. या वेळी बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांना भेटून निवेदन देण्यासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली.यावेळी झालेल्या बैठकीस डॉ. विवेक भिडे, मंदार सरपोतदार, तुकाराम घवाळी, उमर धामस्कर, अनिल पटवर्धन, हनिफ धामस्कर, प्रसन्न पेठे, हसन धामस्कर, धाडस सावंत व पदाधिकारी, बागायतदार उपस्थित होते. (प्रतिनिधी)