शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न

By admin | Updated: July 18, 2014 22:55 IST

वैभव नाईक : नारायण राणेंवर केले थेट आरोप

मालवण : उद्योगमंत्री नारायण राणे यांनी पुकारलेले बंड आणि मंत्रीपदाचा राजीनामा देण्याची घेतलेली भूमिका हा त्यांचा जनतेची सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न आहे, अशी टीका त्यांचे राजकीय प्रतिस्पर्धी राहिलेल्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी केली आहे. राणेंच्या भाजप प्रवेशाबाबतच्या चर्चेबद्दलही आपले मत व्यक्त करताना राणेंना घेऊन निवडणूक लढविणाऱ्या कोणत्याही पक्षास आमचा विरोध राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले. राणेंचे बंड आणि त्यानंतर घडणाऱ्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर वैभव नाईक यांची प्रतिक्रिया महत्त्वपूर्ण ठरणार आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी शुक्रवारी मालवण दौरा केला. यावेळी त्यांनी जिल्हा शिवसेनेच्यावतीने आयोजित विविध कार्यक्रमांना हजेरी लावली. दरम्यान, तालुका शिवसेना कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी आपली भूमिका मांडली. सुरूवातीला त्यांनी मालवणचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष अशोक तोडणकर यांनी त्यांच्या नगराध्यक्षपदाच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या तसेच त्यांचे अभिनंदनही केले. शिवसेनेत नाराज असलेले राणे काँग्रेसमध्ये गेले. आज ते काँग्रेसमध्ये नाराज आहेत. राणेंची नाराजी नेमकी कोणत्या कारणासाठी आहे हेसुद्धा त्यांनी जनतेसमोर स्पष्ट करावे, असे वैभव नाईक म्हणाले. काँग्रेसमध्ये त्यांनी उद्योगमंत्रीपद भोगले. जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणूनही ते काम पाहतात. मंत्री पदाच्या काळात त्यांनी राज्याचे कोणतेही उद्योग धोरण जाहीर केले नाही किंवा जिल्ह्यात कोणतेही उद्योग आणले नाहीत. लगतच्या कोल्हापूर, रत्नागिरी जिल्ह्यांच्या तुलनेत सिंधुदुर्गचा विकास आराखडा लहान आहे. पालकमंत्री राहिलेल्या नारायण राणेंना शेजारी जिल्ह्यांच्या तुलनेत येथील विकास आराखडा वाढवता आला नाही, असेही वैभव नाईक म्हणाले. (प्रतिनिधी)