शहरं
Join us  
Trending Stories
1
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
2
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
3
"विविहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
4
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
5
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
6
सलग दुसऱ्या आठवड्याची सुरुवात घसरणीने! 'या' ३ कारणांमुळे बाजारात चांगली रिकव्हरी
7
IPL 2026 Mock Auction : CSK ची थट्टा? KKR नं ऑस्ट्रेलियन खेळाडूवर लावली ३०.५० कोटींची विक्रमी बोली!
8
भारतीय ऑटो बाजारातील सर्वात मोठी बातमी! फोक्सवॅगनची हजारो कर्मचाऱ्यांना व्हीआरएसची ऑफर, फोर्डच्याच वाटेवर?
9
पुतिन मायदेशी परतताच भारताने तयार केली ३०० वस्तूंची यादी, काय आहे केंद्र सरकारचा प्लॅन
10
१६ डिसेंबर पासून सुरु होत आहे धनुर्मास; आहार, आरोग्य, लक्ष्मी उपासनेसाठी महत्त्वाचा महिना!
11
Shaheen Afridi: शाहीन आफ्रिदीचा अपमान; बिग बॅश लीगमध्ये गोलंदाजी करण्यापासून रोखलं! नेमकं प्रकरण काय?
12
भारताच्या निर्यातीला मोठा 'बूस्ट'! नोव्हेंबरमध्ये १९.३७% ची वाढ; व्यापार तुटीतही मोठा दिलासा
13
MNS: मनपा निवडणुकीच्या घोषणेपूर्वी मोठा राडा! आयोगाच्या कार्यालयात मनसेची तोडफोड, काय घडलं?
14
याला म्हणतात ढासू स्टॉक...! पॉवर कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 30% नं वधारला; दिलाय 6500% चा बंपर परतावा, करतोय मालामाल
15
"मुलाचे कान धरू शकतो, सूनेचे धरू शकत नाही; मी उद्धव ठाकरेंना कॉल करून..."; विनोद घोसाळकरांच्या डोळ्यात पाणी
16
'मनरेगा' बंद! मोदी सरकार आणणार 'विकसित भारत-जी राम जी' योजना; राज्यांवर पडणार अतिरिक्त भार
17
"मी पोहून आलो, सकाळी घरी..."; बॉन्डी बीचवर हल्ला करण्यापूर्वी दहशतवाद्याचा आईला कॉल
18
लेडी सेहवागची कमाल! वर्ल्ड कपमध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री; एका मॅचमधील धमाक्यासह जिंकला ICC पुरस्कार
19
ना स्वतःचे विमानतळ, ना चलन, ना भाषा..; तरीदेखील 'हा' आहे युरोपमधील सर्वात श्रीमंत देश
20
Astrology: नवीन वर्षात नवीन वास्तूमध्ये प्रवेश करण्यासाठी २०२६ मधील तारखा आणि शुभ मुहूर्त 
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासनात लोकाभिमुख सेवेसाठी प्रयत्न करा

By admin | Updated: April 22, 2015 00:21 IST

ई. रवींद्रन : जिल्हा नियोजन समिती सभागृहात नागरी सेवा दिनात वरिष्ठांनी केले मार्गदर्शन

सिंधुदुर्गनगरी : प्रशासनात लोकाभिमुख सेवा देण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रयत्नशील असले पाहिजे. जनतेला शासनाकडून देण्यात येणाऱ्या सेवा विहित वेळेत, पारदर्शक व उपयुक्त असल्याने येणाऱ्या काळाची पावले ओळखून अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्या कामाचे उत्तरदायीत्व जास्तीत जास्त वाढवले पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी ई. रवींद्रन यांनी केले.जिल्हा नियोजन समिती सभागृहात नागरी सेवा दिनानिमित्त सोमवारी आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक संजयकुमार बावीस्कर, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपट्टे, निवासी उपजिल्हाधिकारी ज्ञानेश्वर खुटवड, जिल्हा पुरवठा अधिकारी धनाजी तोरस्कर, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. ई. रवींद्रन म्हणाले, प्रशासनात आल्यानंतर जनतेच्या प्रत्येक प्रश्नांशी सामाजिक बांधीलकी असणे गरजेची आहे. सेवा हमी कायदा झाल्यास अधिकाऱ्यांना जास्तच जबाबदारीने काम करावे लागेल. काळाची गरज लक्षात घेता प्रत्येक विभागाला किंबहुना अधिकारी व कर्मचाऱ्यांना आपल्या प्रत्येक कामासाठीचा वेळ हा ठरवून त्या कालावधीत काम पूर्ण करणे बंधनकारक राहणार आहे. सेवा हमी कायद्यातील तरतुदींची सविस्तर माहिती रवींद्रन यांनी यावेळी दिली.जिल्हा पोलीस अधीक्षक संजयकुमार बावीस्कर म्हणाले, प्रशासकीय नोकरी मिळेपर्यंत प्रशासनात येणे हे बऱ्याचजणांचे ध्येय असते. मात्र, नोकरीत आल्यानंतर आपल्या कर्तव्याचा विसर न पडू देता उत्कृष्टपणे काम करणारे अधिकारी व कर्मचारी हे नेहमी उत्कृष्ट ठरतात. मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपट्टे म्हणाले, प्रशासकीय कामात आपले सामाजिक दायित्व मोठे असते. त्याचा विसर पडता कामा नये. लोकशाहीत लोकांच्या मताला अधिक महत्त्व असते. जनतेचे प्रश्न आणि जनतेची कामे करण्यासाठी आपण सर्व लोकसेवक आहोत. अधिकारी व कर्मचाऱ्यांचा होणारा गौरव हा नक्कीच प्रेरणा देणारा ठरेल.सुनील रेडकर यांनी, संपूर्ण स्वच्छता अभियानात जिल्ह्यात झालेले काम आणि उर्वरित कामासाठी सर्व विभागांचे सहकार्य आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. तसेच संपूर्ण जिल्हा निर्मल होण्यासाठी २०१७ पर्यंतचे लक्ष्य ठेवण्यात आले असून, जिल्ह्यात सहा हजार कुटुंबांकडे वैयक्तिक शौचालय आल्यास संपूर्ण जिल्हा निर्मल होणार आहे. तसेच घनकचरा व्यवस्थापन, प्लास्टिकमुक्त स्वच्छ भारत मिशनचे ध्येय असल्याचे मत रेडकर यांनी व्यक्त केले.जिल्हा कृषी उपसंचालक टी. बी. पावडे यांनी, जलयुक्त शिवार अभियानाची माहिती दिली. जलयुक्त शिवार अभियान ही महाराष्ट्र शासनाची महत्त्वाकांक्षी योजना आहे. महाराष्ट्राच्या शेतीला शाश्वततेकडे नेणारी ही योजना महाराष्ट्रातील प्रत्येकाला जलसाक्षरही करेल. या योजनेंतर्गतची कामे लोकांच्या गरजेनुसार करण्यास प्राधान्य देण्यात येत आहे. त्यामुळे आता हे अभियान केवळ शासकीय योजना न राहता लोकचळवळ होत आहे. हे अभियान लोकचळवळ होत असताना होणारी कामे ही गुणवत्तापूर्ण, दर्जेदार असावीत, जेणेकरून लोकांना ती दीर्घकाळ पुरतील, यासाठीही शासन जाणीवपूर्वक प्रयत्न करीत आहे. या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करतानाच गुणवत्तापूर्ण कामे करण्यासाठी शासनाने काटेकोर उपाययोजनाही केल्या आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३५ गावांची या अभियानांतर्गत निवड केली आहे.उत्कृष्ट अधिकारी म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी ज्ञानेश्वर खुटवड, तहसीलदार वनिता पाटील, नायब तहसीलदार नंदकिशोर नाटेकर, ए. एच. देवूलकर, एस. एस. खरात, एस. एस. जाधव, अव्वल कारकून, मंडळ अधिकारी, लिपिक, वाहनचालक, शिपाई, कोतवाल यांचा सत्कार केला. वेंगुर्ले गटविकास अधिकारी बाबली वायंगणकर, मालवण गटविकास अधिकारी राजेंद्र पराडकर, देवगड गटविकास अधिकारी विजय चव्हाण, परुळेबाजारचे ग्रामसेवक मंगेश नाईक यांचाही सत्कार केला. प्रास्ताविक निवासी उपजिल्हाधिकारी ज्ञानेश्वर खुटवड यांनी, तर राजश्री सामंत यांनी सूत्रसंचालन केले. जिल्हा पुरवठा अधिकारी धनाजी तोरस्कर यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)ँप्रशासनात सामाजिक बांधीलकी हवीप्रशासनात आल्यानंतर जनतेच्या प्रत्येक प्रश्नांशी सामाजिक बांधीलकी असणे गरजेचे आहे. आगामी काळात सेवा हमी कायद्याची अंमलबजावणी झाल्यास अधिकाऱ्यांना जास्तच जबाबदारीने काम करावे लागणार आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांना ठरवून दिलेल्या कालावधीत काम पूर्ण करणे बंधनकारक राहणार आहे.