शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

प्रशासनात लोकाभिमुख सेवेसाठी प्रयत्न करा

By admin | Updated: April 22, 2015 00:21 IST

ई. रवींद्रन : जिल्हा नियोजन समिती सभागृहात नागरी सेवा दिनात वरिष्ठांनी केले मार्गदर्शन

सिंधुदुर्गनगरी : प्रशासनात लोकाभिमुख सेवा देण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रयत्नशील असले पाहिजे. जनतेला शासनाकडून देण्यात येणाऱ्या सेवा विहित वेळेत, पारदर्शक व उपयुक्त असल्याने येणाऱ्या काळाची पावले ओळखून अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्या कामाचे उत्तरदायीत्व जास्तीत जास्त वाढवले पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी ई. रवींद्रन यांनी केले.जिल्हा नियोजन समिती सभागृहात नागरी सेवा दिनानिमित्त सोमवारी आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक संजयकुमार बावीस्कर, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपट्टे, निवासी उपजिल्हाधिकारी ज्ञानेश्वर खुटवड, जिल्हा पुरवठा अधिकारी धनाजी तोरस्कर, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. ई. रवींद्रन म्हणाले, प्रशासनात आल्यानंतर जनतेच्या प्रत्येक प्रश्नांशी सामाजिक बांधीलकी असणे गरजेची आहे. सेवा हमी कायदा झाल्यास अधिकाऱ्यांना जास्तच जबाबदारीने काम करावे लागेल. काळाची गरज लक्षात घेता प्रत्येक विभागाला किंबहुना अधिकारी व कर्मचाऱ्यांना आपल्या प्रत्येक कामासाठीचा वेळ हा ठरवून त्या कालावधीत काम पूर्ण करणे बंधनकारक राहणार आहे. सेवा हमी कायद्यातील तरतुदींची सविस्तर माहिती रवींद्रन यांनी यावेळी दिली.जिल्हा पोलीस अधीक्षक संजयकुमार बावीस्कर म्हणाले, प्रशासकीय नोकरी मिळेपर्यंत प्रशासनात येणे हे बऱ्याचजणांचे ध्येय असते. मात्र, नोकरीत आल्यानंतर आपल्या कर्तव्याचा विसर न पडू देता उत्कृष्टपणे काम करणारे अधिकारी व कर्मचारी हे नेहमी उत्कृष्ट ठरतात. मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपट्टे म्हणाले, प्रशासकीय कामात आपले सामाजिक दायित्व मोठे असते. त्याचा विसर पडता कामा नये. लोकशाहीत लोकांच्या मताला अधिक महत्त्व असते. जनतेचे प्रश्न आणि जनतेची कामे करण्यासाठी आपण सर्व लोकसेवक आहोत. अधिकारी व कर्मचाऱ्यांचा होणारा गौरव हा नक्कीच प्रेरणा देणारा ठरेल.सुनील रेडकर यांनी, संपूर्ण स्वच्छता अभियानात जिल्ह्यात झालेले काम आणि उर्वरित कामासाठी सर्व विभागांचे सहकार्य आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. तसेच संपूर्ण जिल्हा निर्मल होण्यासाठी २०१७ पर्यंतचे लक्ष्य ठेवण्यात आले असून, जिल्ह्यात सहा हजार कुटुंबांकडे वैयक्तिक शौचालय आल्यास संपूर्ण जिल्हा निर्मल होणार आहे. तसेच घनकचरा व्यवस्थापन, प्लास्टिकमुक्त स्वच्छ भारत मिशनचे ध्येय असल्याचे मत रेडकर यांनी व्यक्त केले.जिल्हा कृषी उपसंचालक टी. बी. पावडे यांनी, जलयुक्त शिवार अभियानाची माहिती दिली. जलयुक्त शिवार अभियान ही महाराष्ट्र शासनाची महत्त्वाकांक्षी योजना आहे. महाराष्ट्राच्या शेतीला शाश्वततेकडे नेणारी ही योजना महाराष्ट्रातील प्रत्येकाला जलसाक्षरही करेल. या योजनेंतर्गतची कामे लोकांच्या गरजेनुसार करण्यास प्राधान्य देण्यात येत आहे. त्यामुळे आता हे अभियान केवळ शासकीय योजना न राहता लोकचळवळ होत आहे. हे अभियान लोकचळवळ होत असताना होणारी कामे ही गुणवत्तापूर्ण, दर्जेदार असावीत, जेणेकरून लोकांना ती दीर्घकाळ पुरतील, यासाठीही शासन जाणीवपूर्वक प्रयत्न करीत आहे. या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करतानाच गुणवत्तापूर्ण कामे करण्यासाठी शासनाने काटेकोर उपाययोजनाही केल्या आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३५ गावांची या अभियानांतर्गत निवड केली आहे.उत्कृष्ट अधिकारी म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी ज्ञानेश्वर खुटवड, तहसीलदार वनिता पाटील, नायब तहसीलदार नंदकिशोर नाटेकर, ए. एच. देवूलकर, एस. एस. खरात, एस. एस. जाधव, अव्वल कारकून, मंडळ अधिकारी, लिपिक, वाहनचालक, शिपाई, कोतवाल यांचा सत्कार केला. वेंगुर्ले गटविकास अधिकारी बाबली वायंगणकर, मालवण गटविकास अधिकारी राजेंद्र पराडकर, देवगड गटविकास अधिकारी विजय चव्हाण, परुळेबाजारचे ग्रामसेवक मंगेश नाईक यांचाही सत्कार केला. प्रास्ताविक निवासी उपजिल्हाधिकारी ज्ञानेश्वर खुटवड यांनी, तर राजश्री सामंत यांनी सूत्रसंचालन केले. जिल्हा पुरवठा अधिकारी धनाजी तोरस्कर यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)ँप्रशासनात सामाजिक बांधीलकी हवीप्रशासनात आल्यानंतर जनतेच्या प्रत्येक प्रश्नांशी सामाजिक बांधीलकी असणे गरजेचे आहे. आगामी काळात सेवा हमी कायद्याची अंमलबजावणी झाल्यास अधिकाऱ्यांना जास्तच जबाबदारीने काम करावे लागणार आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांना ठरवून दिलेल्या कालावधीत काम पूर्ण करणे बंधनकारक राहणार आहे.