शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासनात लोकाभिमुख सेवेसाठी प्रयत्न करा

By admin | Updated: April 22, 2015 00:21 IST

ई. रवींद्रन : जिल्हा नियोजन समिती सभागृहात नागरी सेवा दिनात वरिष्ठांनी केले मार्गदर्शन

सिंधुदुर्गनगरी : प्रशासनात लोकाभिमुख सेवा देण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रयत्नशील असले पाहिजे. जनतेला शासनाकडून देण्यात येणाऱ्या सेवा विहित वेळेत, पारदर्शक व उपयुक्त असल्याने येणाऱ्या काळाची पावले ओळखून अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्या कामाचे उत्तरदायीत्व जास्तीत जास्त वाढवले पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी ई. रवींद्रन यांनी केले.जिल्हा नियोजन समिती सभागृहात नागरी सेवा दिनानिमित्त सोमवारी आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक संजयकुमार बावीस्कर, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपट्टे, निवासी उपजिल्हाधिकारी ज्ञानेश्वर खुटवड, जिल्हा पुरवठा अधिकारी धनाजी तोरस्कर, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. ई. रवींद्रन म्हणाले, प्रशासनात आल्यानंतर जनतेच्या प्रत्येक प्रश्नांशी सामाजिक बांधीलकी असणे गरजेची आहे. सेवा हमी कायदा झाल्यास अधिकाऱ्यांना जास्तच जबाबदारीने काम करावे लागेल. काळाची गरज लक्षात घेता प्रत्येक विभागाला किंबहुना अधिकारी व कर्मचाऱ्यांना आपल्या प्रत्येक कामासाठीचा वेळ हा ठरवून त्या कालावधीत काम पूर्ण करणे बंधनकारक राहणार आहे. सेवा हमी कायद्यातील तरतुदींची सविस्तर माहिती रवींद्रन यांनी यावेळी दिली.जिल्हा पोलीस अधीक्षक संजयकुमार बावीस्कर म्हणाले, प्रशासकीय नोकरी मिळेपर्यंत प्रशासनात येणे हे बऱ्याचजणांचे ध्येय असते. मात्र, नोकरीत आल्यानंतर आपल्या कर्तव्याचा विसर न पडू देता उत्कृष्टपणे काम करणारे अधिकारी व कर्मचारी हे नेहमी उत्कृष्ट ठरतात. मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपट्टे म्हणाले, प्रशासकीय कामात आपले सामाजिक दायित्व मोठे असते. त्याचा विसर पडता कामा नये. लोकशाहीत लोकांच्या मताला अधिक महत्त्व असते. जनतेचे प्रश्न आणि जनतेची कामे करण्यासाठी आपण सर्व लोकसेवक आहोत. अधिकारी व कर्मचाऱ्यांचा होणारा गौरव हा नक्कीच प्रेरणा देणारा ठरेल.सुनील रेडकर यांनी, संपूर्ण स्वच्छता अभियानात जिल्ह्यात झालेले काम आणि उर्वरित कामासाठी सर्व विभागांचे सहकार्य आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. तसेच संपूर्ण जिल्हा निर्मल होण्यासाठी २०१७ पर्यंतचे लक्ष्य ठेवण्यात आले असून, जिल्ह्यात सहा हजार कुटुंबांकडे वैयक्तिक शौचालय आल्यास संपूर्ण जिल्हा निर्मल होणार आहे. तसेच घनकचरा व्यवस्थापन, प्लास्टिकमुक्त स्वच्छ भारत मिशनचे ध्येय असल्याचे मत रेडकर यांनी व्यक्त केले.जिल्हा कृषी उपसंचालक टी. बी. पावडे यांनी, जलयुक्त शिवार अभियानाची माहिती दिली. जलयुक्त शिवार अभियान ही महाराष्ट्र शासनाची महत्त्वाकांक्षी योजना आहे. महाराष्ट्राच्या शेतीला शाश्वततेकडे नेणारी ही योजना महाराष्ट्रातील प्रत्येकाला जलसाक्षरही करेल. या योजनेंतर्गतची कामे लोकांच्या गरजेनुसार करण्यास प्राधान्य देण्यात येत आहे. त्यामुळे आता हे अभियान केवळ शासकीय योजना न राहता लोकचळवळ होत आहे. हे अभियान लोकचळवळ होत असताना होणारी कामे ही गुणवत्तापूर्ण, दर्जेदार असावीत, जेणेकरून लोकांना ती दीर्घकाळ पुरतील, यासाठीही शासन जाणीवपूर्वक प्रयत्न करीत आहे. या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करतानाच गुणवत्तापूर्ण कामे करण्यासाठी शासनाने काटेकोर उपाययोजनाही केल्या आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३५ गावांची या अभियानांतर्गत निवड केली आहे.उत्कृष्ट अधिकारी म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी ज्ञानेश्वर खुटवड, तहसीलदार वनिता पाटील, नायब तहसीलदार नंदकिशोर नाटेकर, ए. एच. देवूलकर, एस. एस. खरात, एस. एस. जाधव, अव्वल कारकून, मंडळ अधिकारी, लिपिक, वाहनचालक, शिपाई, कोतवाल यांचा सत्कार केला. वेंगुर्ले गटविकास अधिकारी बाबली वायंगणकर, मालवण गटविकास अधिकारी राजेंद्र पराडकर, देवगड गटविकास अधिकारी विजय चव्हाण, परुळेबाजारचे ग्रामसेवक मंगेश नाईक यांचाही सत्कार केला. प्रास्ताविक निवासी उपजिल्हाधिकारी ज्ञानेश्वर खुटवड यांनी, तर राजश्री सामंत यांनी सूत्रसंचालन केले. जिल्हा पुरवठा अधिकारी धनाजी तोरस्कर यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)ँप्रशासनात सामाजिक बांधीलकी हवीप्रशासनात आल्यानंतर जनतेच्या प्रत्येक प्रश्नांशी सामाजिक बांधीलकी असणे गरजेचे आहे. आगामी काळात सेवा हमी कायद्याची अंमलबजावणी झाल्यास अधिकाऱ्यांना जास्तच जबाबदारीने काम करावे लागणार आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांना ठरवून दिलेल्या कालावधीत काम पूर्ण करणे बंधनकारक राहणार आहे.