शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
3
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
4
रामराजे नाईक-निंबाळकर यांनाही उत्तरे द्यावीच लागणार, मुख्यमंत्र्यांचे यावर बारीक लक्ष- जयकुमार गोरे
5
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
6
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
7
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
8
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
9
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
10
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
11
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
12
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
13
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
14
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
15
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
16
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
17
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
18
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
19
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं
20
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप

बहुजन समाजाच्या विकासासाठी प्रयत्न व्हावेत

By admin | Updated: November 24, 2014 23:04 IST

जीवन कांबळे : जामसंडे येथे प्रशिक युवा मंचच्यावतीने पुरस्कार वितरण सोहळा

जामसंडे : बहुजन समाजातील व्यक्तींनी त्यांचे राहणीमान उंचावले की आत्मकेंद्रीत न बनता संघटीत होऊन बहुजन समाजाच्या विकासासाठी प्रयत्न करायला हवा, असे प्रतिपादन देवगडचे तहसीलदार जीवन कांबळे यांनी रविवारी जामसंडेमध्ये बोलताना व्यक्त केले. जामसंडेमध्ये रविवारी प्रशिक युवा मंचाच्या पुरस्कार वितरण आणि कवी गजानन पडेलकर यांच्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.संविधानामुळे समाजाला अधिकार आणि कर्तव्य प्राप्त झाले. त्यामुळे शिक्षण दलितांपर्यंत पोहोचले. त्यामुळे बहुजन समाजाचे राहणीमान उंचावले. बहुजन समाजाच्या विकासासाठी बौद्धीक आणि व्यावहारिक पातळीवर प्रयत्न करणे आवश्यक आहे. आत्मकेंद्रीतता ही बहुजनवर्गाच्या विकासाला पूरक गोष्ट नाही असेही ते यावेळी म्हणाले.या कार्यक्रमात बोलताना विद्रोही साहित्यिक दादू मांजरेकर यांनी गौतम बुद्धांनी समतेचा संदेश जगाला दिला. जाती व्यवस्था नष्ट करण्यासाठी त्यांचे विचार आचरणात आणावेत. आपली राज्यघटना म्हणजे जगण्याचे सामर्थ्य आहे असे सांगितले तर साहित्यिक उत्तम पवार यांनी बोलताना वर्तमानकाळात शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आचरणात आणल्याशिवाय आपणास प्रगती करता येणार नाही असे सांगितले. यावेळी मधुकर कांबळे, चंद्रकांत जामसंडेकर, सुनिल जाधव, रामचंद्र कदम, सूर्यकांत साळुंखे, जयचंद शिरगांवकर यांचा प्रशिक युवा मंचाच्यावतीने सन्मान करण्यात आला. यावेळी प्रशिक युवा मंचाचे अध्यक्ष राजेंद्र मुंबरकर, माजी अध्यक्ष अजित जाधव, हिंदळे सरपंच अनुष्का हिंदळेकर, मोहन जामसंडेकर, राजन पडेलकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितेश जाधव यांनी केले तर आभार प्रदर्शन सुनिल जाधव यांनी केले. (वार्ताहर)