शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

घटना बदलण्याचा प्रयत्न

By admin | Updated: November 10, 2015 23:50 IST

भाई जगताप : महाआघाडीचा मंडणगडात विजय मेळावा

मंडणगड : केंद्र शासनाला सत्तेचा माज आल्याने या देशाची घटना बदलण्याचा प्रयत्न नव्हे; तर संघाकडून त्यांचे प्रारुपही तयार आहे, त्यांना हवा तसा इतिहास लिहिण्याचे काम सुरु आहे, पण या देशातील सर्वधर्म समभावाचा, काँग्रेसी विचार शासनाला हे करण्यापासून रोखणार आहे. बिहारमधील निवडणुकीत परिवर्तनाचे वारे वाहू लागले आहेत. देशातील १३० कोटी जनतेचे भवितव्य जनता स्वत: ठरवेल, असे प्रतिपादन मंडणगड येथील विजय मेळाव्यात काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते भाई जगताप यांनी केले. नगरपंचायत निवडणुकीत महाआघाआडीला मिळालेल्या निर्भेळ यशानंतर महाआघाडीच्यावतीने मंडणगड येथे आयोजित करण्यात आलेल्या विजय मेळाव्याला प्रमुख अतिथी म्हणून जगताप उपस्थित होते. यावेळी त्यांनी राज्य व केंद्र शासनावर टीका केली. मंडणगड शहरात महाआघाडीने मिळवलेल्या यशाबद्दल आमदार संजय कदम यांचे कौतुक करताना ते म्हणाले की, येथील जनतेची पंचवीस वर्षांची प्रतीक्षा आता संपली आहे. मतदारांना कुणी गृहीत धरु नका, ते हुशार असतात. ते बदलाच्या प्रतीक्षेत होते, आमदारांच्या रुपाने त्यांना योग्य पर्याय सापडल्याने सर्व बंधने झुगारून लोकांनी महाआघाडीला साथ दिली. राज्य व केंद्र शासनाने जनतेचा भ्रमनिरास केला आहे, त्यामुळे जनता त्यांची जागा दाखवून देणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी आमदार संजय कदम, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष शेखर निकम, जिल्हा परिषद सदस्य अजय बिरवटकर, प्रकाश शिगवण, अस्मिता केंद्रे, स. तु. कदम, रमेश दळवी, जयवंत जालगावकर, भाई पोस्टुरे, वैभव कोकाटे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मुश्ताक मिरकर संतोष मांढरे, राजा लेंढे, समद मांडलेकर, रिपाइंचे सिध्दार्थ कासारे, दादासाहेब मर्चंडे, सुभाष तांबे, गणेश रूखे, सखाराम मर्चंडे आदी मान्यवर उपस्थित होते. मुंझीर दाभीळकर, कादीर बुरोंडकर, संदेश चिले, अनिल रटाटे, अनिल घरटकर, चेतन सातोपे, राकेश साळुंखे, अंकुश सावर्डेकर, गणेश सावर्डेकर, नरेश बैकर, महेश कासारे आदी यावेळी नवनिर्वाचीत नगरसेवकांचा आमदार संजय कदम व भाई जगताप यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. (प्रतिनिधी)आमदारांचे कौतुक : मंडणगड पॅटर्न राज्यातआगामी काळात सर्व स्तरातील निवडणुकांमध्ये विजयश्री खेचून आणण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी व रिपाइं महाआघाडीचा मंडणगड पॅटर्न राज्यात सर्वत्र राबवण्याचा मनोदय प्रदेश काँग्रेस प्रवक्ते आमदार भाई जगताप यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी आमदार संजय कदम यांच्या रणनीतीचे कौतुक केले.आमदारांचे कौतुक : मंडणगड पॅटर्न राज्यातआगामी काळात सर्व स्तरातील निवडणुकांमध्ये विजयश्री खेचून आणण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी व रिपाइं महाआघाडीचा मंडणगड पॅटर्न राज्यात सर्वत्र राबवण्याचा मनोदय प्रदेश काँग्रेस प्रवक्ते आमदार भाई जगताप यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी आमदार संजय कदम यांच्या रणनीतीचे कौतुक केले.प्रतीक्षा संपलीमंडणगडमध्ये गेली २५ वर्षे शिवसेनेचे वर्चस्व होते. मात्र, नगरपालिकेच्या निवडणुकीत सेनेचे पानिपत करत जनतेची २५ वर्षांची प्रतीक्षा संपली आहे.संघाकडून घटना बदलण्याची प्रारूपही तयार आहे.हवा तसा इतिहास लिहिण्याचे काम सुरू. राज्य व केंद्र शासनावर जोरदार टीका. बंधने झुगारून लोकांनी महाआघाडीला दिली साथ.