शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
4
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
5
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
6
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
7
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
8
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
9
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
10
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
11
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
12
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
13
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
14
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
15
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
16
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
17
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
18
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
19
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

बचतगटांचे वर्षभरात तिप्पट कर्ज

By admin | Updated: March 15, 2015 00:20 IST

विक्रमी उचल : महिलांच्या धडपडीला कर्जाचा आधार, उत्पादन-विक्रीत भरघोस वाढ

रहिम दलाल ल्ल रत्नागिरी महिला बचतगटांनी तयार केलेला माल कोकणरत्न बँ्रडने बाजारात विक्रीसाठी आणण्यात येणार आहे. जिल्ह्यात बचतगटांची आर्थिक उलाढाल वाढत असून, त्यांनी चालू आर्थिक वर्षात ३ कोटी २१ लाख ७५ हजार रुपयांच्या कर्जाची उचल केली आहे. ही कर्जाची उचल गतवर्षीपेक्षा तिप्पट आहे. रत्नागिरी जिल्ह्यात बचतगटांची चळवळ आता चांगली फोफावू लागली आहे. दारिद्रय रेषेखालील महिलांची आर्थिक स्थिती सुधारुन त्यांना स्वत:च्या पायावर उभे करण्यासाठी शासनाकडून महिला बचतगटांना आर्थिक मदत करण्यात येत आहे. त्यामुळे आज अनेक महिला बचत गटाच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम होत आहेत. जिल्ह्यात ५२७५ महिला बचत गटांची स्थापना करण्यात आली असून, त्यांची तालुकानिहाय संख्या पुढीलप्रमाणे- मंडणगड- २५०, दापोली- ३३०, चिपळूण-५८५, गुहागर- ४९५, खेड- ५९१, संगमेश्वर- ९९६, रत्नागिरी- ७८९, लांजा- ५१९, राजापूर- ७३० अशी आहे. यामध्ये सुमारे ५० हजार महिलांचा समावेश आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात महिला बचत गटांची स्थापना करण्यात आली असली तरी त्यांपैकी आतापर्यंत केवळ १५० बचतगट सक्षमपणे कार्यरत आहेत. हे बचतगट विविध प्रकारचे खाद्यपदार्थ तयार करुन त्यांची विक्री करतात. तसेच काही बचतगटाच्या महिला वस्तू, कपडे व अन्य वस्तू तयार करुन त्यांची विक्री करतात. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून महिला बचत गटांना सुरुवातीला खेळते भांडवल म्हणून १५ हजार रुपये देण्यात येतात. ही रक्कम परत न करण्याच्या अटीवरुन आर्थिक मदत म्हणून करण्यात येते. त्यानंतर या बचत गटांना बँकेकडून ५० हजार रुपये ते १० लाख रुपयांपर्यंत कर्ज पुरवठा करण्यात येतो. ही माहिती जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. पनवेलकर यांनी दिली. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा जिल्ह्यातील सहा तालुक्यांमध्ये काम करीत आहे. तर महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान रत्नागिरी, लांजा आणि संगमेश्वर यामध्ये कार्यरत आहे. सन २०१३-१४ या आर्थिक वर्षामध्ये महिला बचत गटांनी ८७ लाख रुपये कर्ज घेतले होते. कर्जाची उचल जिल्ह्यातील १०४ महिला बचतगटांनी केली होती. यामध्ये बचतगटांनी जास्तीत जास्त २ लाख रुपयांपर्यंत बचत गटांनी उचल केली होती. त्यांची परतफेडही प्रामाणिकपणे करण्यात येत आहे. कार्यरत असलेल्या बचतगटांची संख्या वाढत चालली असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या बचतगटाच्या माध्यमातून महिलाही स्वत:च्या पायावर उभ्या राहण्यासाठी धडपडत आहेत. कारण चालू आर्थिक वर्षामध्ये कर्ज उचल करण्याऱ्या बचतगटांची संख्या ३५९ झाली आहे. त्यामध्ये जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे ३३७ बचतगट आणि महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान व्यवस्थापन कक्षाच्या २२ बचत गटांचा समावेश आहे. ३३७ बचत गटांनी ३ कोटी १ लाख ७५ हजार रुपये आणि २२ बचत गटांनी २० लाख रुपये अशा एकूण ३ कोटी २१ लाख ७५ हजार रुपयांच्या कर्जाची उचल केली आहे. या बचतगटांकडून विविध खाद्यपदार्थ, इतर वस्तू तयार करण्यात येतात. मात्र, या खाद्यपदार्थांचा तयार करण्यात येणाऱ्या इतर वस्तूंचा दर्जा एकसारखाच जपता यावा, बचत गटांचा संघ स्थापन करण्यात येणार आहे. या संघाच्या माध्यमातून ‘कोकण रत्न’ ब्रँड तयार करण्यात येणार आहे. हा ब्रँड बचतगटांनी तयार केलेल्या मालाच्या विक्रीसाठी वापर करण्यात येणार आहे. त्यामुळे बचत गटांनी तयार केलेल्या मालाचा दर्जा सुधारणार आहे. त्यामुळे महिलांची आर्थिक उन्नती होण्यास मोठा आधार लाभणार आहे.