शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

बचतगटांचे वर्षभरात तिप्पट कर्ज

By admin | Updated: March 15, 2015 00:20 IST

विक्रमी उचल : महिलांच्या धडपडीला कर्जाचा आधार, उत्पादन-विक्रीत भरघोस वाढ

रहिम दलाल ल्ल रत्नागिरी महिला बचतगटांनी तयार केलेला माल कोकणरत्न बँ्रडने बाजारात विक्रीसाठी आणण्यात येणार आहे. जिल्ह्यात बचतगटांची आर्थिक उलाढाल वाढत असून, त्यांनी चालू आर्थिक वर्षात ३ कोटी २१ लाख ७५ हजार रुपयांच्या कर्जाची उचल केली आहे. ही कर्जाची उचल गतवर्षीपेक्षा तिप्पट आहे. रत्नागिरी जिल्ह्यात बचतगटांची चळवळ आता चांगली फोफावू लागली आहे. दारिद्रय रेषेखालील महिलांची आर्थिक स्थिती सुधारुन त्यांना स्वत:च्या पायावर उभे करण्यासाठी शासनाकडून महिला बचतगटांना आर्थिक मदत करण्यात येत आहे. त्यामुळे आज अनेक महिला बचत गटाच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम होत आहेत. जिल्ह्यात ५२७५ महिला बचत गटांची स्थापना करण्यात आली असून, त्यांची तालुकानिहाय संख्या पुढीलप्रमाणे- मंडणगड- २५०, दापोली- ३३०, चिपळूण-५८५, गुहागर- ४९५, खेड- ५९१, संगमेश्वर- ९९६, रत्नागिरी- ७८९, लांजा- ५१९, राजापूर- ७३० अशी आहे. यामध्ये सुमारे ५० हजार महिलांचा समावेश आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात महिला बचत गटांची स्थापना करण्यात आली असली तरी त्यांपैकी आतापर्यंत केवळ १५० बचतगट सक्षमपणे कार्यरत आहेत. हे बचतगट विविध प्रकारचे खाद्यपदार्थ तयार करुन त्यांची विक्री करतात. तसेच काही बचतगटाच्या महिला वस्तू, कपडे व अन्य वस्तू तयार करुन त्यांची विक्री करतात. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून महिला बचत गटांना सुरुवातीला खेळते भांडवल म्हणून १५ हजार रुपये देण्यात येतात. ही रक्कम परत न करण्याच्या अटीवरुन आर्थिक मदत म्हणून करण्यात येते. त्यानंतर या बचत गटांना बँकेकडून ५० हजार रुपये ते १० लाख रुपयांपर्यंत कर्ज पुरवठा करण्यात येतो. ही माहिती जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. पनवेलकर यांनी दिली. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा जिल्ह्यातील सहा तालुक्यांमध्ये काम करीत आहे. तर महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान रत्नागिरी, लांजा आणि संगमेश्वर यामध्ये कार्यरत आहे. सन २०१३-१४ या आर्थिक वर्षामध्ये महिला बचत गटांनी ८७ लाख रुपये कर्ज घेतले होते. कर्जाची उचल जिल्ह्यातील १०४ महिला बचतगटांनी केली होती. यामध्ये बचतगटांनी जास्तीत जास्त २ लाख रुपयांपर्यंत बचत गटांनी उचल केली होती. त्यांची परतफेडही प्रामाणिकपणे करण्यात येत आहे. कार्यरत असलेल्या बचतगटांची संख्या वाढत चालली असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या बचतगटाच्या माध्यमातून महिलाही स्वत:च्या पायावर उभ्या राहण्यासाठी धडपडत आहेत. कारण चालू आर्थिक वर्षामध्ये कर्ज उचल करण्याऱ्या बचतगटांची संख्या ३५९ झाली आहे. त्यामध्ये जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे ३३७ बचतगट आणि महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान व्यवस्थापन कक्षाच्या २२ बचत गटांचा समावेश आहे. ३३७ बचत गटांनी ३ कोटी १ लाख ७५ हजार रुपये आणि २२ बचत गटांनी २० लाख रुपये अशा एकूण ३ कोटी २१ लाख ७५ हजार रुपयांच्या कर्जाची उचल केली आहे. या बचतगटांकडून विविध खाद्यपदार्थ, इतर वस्तू तयार करण्यात येतात. मात्र, या खाद्यपदार्थांचा तयार करण्यात येणाऱ्या इतर वस्तूंचा दर्जा एकसारखाच जपता यावा, बचत गटांचा संघ स्थापन करण्यात येणार आहे. या संघाच्या माध्यमातून ‘कोकण रत्न’ ब्रँड तयार करण्यात येणार आहे. हा ब्रँड बचतगटांनी तयार केलेल्या मालाच्या विक्रीसाठी वापर करण्यात येणार आहे. त्यामुळे बचत गटांनी तयार केलेल्या मालाचा दर्जा सुधारणार आहे. त्यामुळे महिलांची आर्थिक उन्नती होण्यास मोठा आधार लाभणार आहे.