शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
3
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
5
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
6
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
7
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
8
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
9
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
10
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
11
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
12
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
13
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
14
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
15
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
16
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
17
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
18
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
19
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
20
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ

बचतगटांचे वर्षभरात तिप्पट कर्ज

By admin | Updated: March 15, 2015 00:20 IST

विक्रमी उचल : महिलांच्या धडपडीला कर्जाचा आधार, उत्पादन-विक्रीत भरघोस वाढ

रहिम दलाल ल्ल रत्नागिरी महिला बचतगटांनी तयार केलेला माल कोकणरत्न बँ्रडने बाजारात विक्रीसाठी आणण्यात येणार आहे. जिल्ह्यात बचतगटांची आर्थिक उलाढाल वाढत असून, त्यांनी चालू आर्थिक वर्षात ३ कोटी २१ लाख ७५ हजार रुपयांच्या कर्जाची उचल केली आहे. ही कर्जाची उचल गतवर्षीपेक्षा तिप्पट आहे. रत्नागिरी जिल्ह्यात बचतगटांची चळवळ आता चांगली फोफावू लागली आहे. दारिद्रय रेषेखालील महिलांची आर्थिक स्थिती सुधारुन त्यांना स्वत:च्या पायावर उभे करण्यासाठी शासनाकडून महिला बचतगटांना आर्थिक मदत करण्यात येत आहे. त्यामुळे आज अनेक महिला बचत गटाच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम होत आहेत. जिल्ह्यात ५२७५ महिला बचत गटांची स्थापना करण्यात आली असून, त्यांची तालुकानिहाय संख्या पुढीलप्रमाणे- मंडणगड- २५०, दापोली- ३३०, चिपळूण-५८५, गुहागर- ४९५, खेड- ५९१, संगमेश्वर- ९९६, रत्नागिरी- ७८९, लांजा- ५१९, राजापूर- ७३० अशी आहे. यामध्ये सुमारे ५० हजार महिलांचा समावेश आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात महिला बचत गटांची स्थापना करण्यात आली असली तरी त्यांपैकी आतापर्यंत केवळ १५० बचतगट सक्षमपणे कार्यरत आहेत. हे बचतगट विविध प्रकारचे खाद्यपदार्थ तयार करुन त्यांची विक्री करतात. तसेच काही बचतगटाच्या महिला वस्तू, कपडे व अन्य वस्तू तयार करुन त्यांची विक्री करतात. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून महिला बचत गटांना सुरुवातीला खेळते भांडवल म्हणून १५ हजार रुपये देण्यात येतात. ही रक्कम परत न करण्याच्या अटीवरुन आर्थिक मदत म्हणून करण्यात येते. त्यानंतर या बचत गटांना बँकेकडून ५० हजार रुपये ते १० लाख रुपयांपर्यंत कर्ज पुरवठा करण्यात येतो. ही माहिती जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. पनवेलकर यांनी दिली. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा जिल्ह्यातील सहा तालुक्यांमध्ये काम करीत आहे. तर महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान रत्नागिरी, लांजा आणि संगमेश्वर यामध्ये कार्यरत आहे. सन २०१३-१४ या आर्थिक वर्षामध्ये महिला बचत गटांनी ८७ लाख रुपये कर्ज घेतले होते. कर्जाची उचल जिल्ह्यातील १०४ महिला बचतगटांनी केली होती. यामध्ये बचतगटांनी जास्तीत जास्त २ लाख रुपयांपर्यंत बचत गटांनी उचल केली होती. त्यांची परतफेडही प्रामाणिकपणे करण्यात येत आहे. कार्यरत असलेल्या बचतगटांची संख्या वाढत चालली असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या बचतगटाच्या माध्यमातून महिलाही स्वत:च्या पायावर उभ्या राहण्यासाठी धडपडत आहेत. कारण चालू आर्थिक वर्षामध्ये कर्ज उचल करण्याऱ्या बचतगटांची संख्या ३५९ झाली आहे. त्यामध्ये जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे ३३७ बचतगट आणि महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान व्यवस्थापन कक्षाच्या २२ बचत गटांचा समावेश आहे. ३३७ बचत गटांनी ३ कोटी १ लाख ७५ हजार रुपये आणि २२ बचत गटांनी २० लाख रुपये अशा एकूण ३ कोटी २१ लाख ७५ हजार रुपयांच्या कर्जाची उचल केली आहे. या बचतगटांकडून विविध खाद्यपदार्थ, इतर वस्तू तयार करण्यात येतात. मात्र, या खाद्यपदार्थांचा तयार करण्यात येणाऱ्या इतर वस्तूंचा दर्जा एकसारखाच जपता यावा, बचत गटांचा संघ स्थापन करण्यात येणार आहे. या संघाच्या माध्यमातून ‘कोकण रत्न’ ब्रँड तयार करण्यात येणार आहे. हा ब्रँड बचतगटांनी तयार केलेल्या मालाच्या विक्रीसाठी वापर करण्यात येणार आहे. त्यामुळे बचत गटांनी तयार केलेल्या मालाचा दर्जा सुधारणार आहे. त्यामुळे महिलांची आर्थिक उन्नती होण्यास मोठा आधार लाभणार आहे.