शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

बांद्यातील कालव्यात मातीसह झाडी

By admin | Updated: November 20, 2015 00:17 IST

प्रशासनाचे दुर्लक्ष : साफसफाईअभावी कालव्याचा प्रवाह बदलण्याची शक्यता

बांदा : बांदा येथून जाणाऱ्या तिलारी शाखा कालव्याची साफसफाईअभावी पूर्णपणे दुरवस्था झाली असून, ठिकठिकाणी कालव्यात माती कोसळली आहे. यावर्षी कालव्यातून पाणी सोडताना कालव्याची सफाई करणे गरजेचे आहे, अन्यथा कालव्यातील पाण्याचा प्रवाह बदलून तो फुटण्याचीही शक्यता आहे. बांदा परिसरातील पाण्याचे दुर्भिक्ष मिटविण्यासाठी तिलारीचे पाणी या परिसरात शाखा कालव्याच्या माध्यमातून आणण्यात आले आहे. मात्र, ठिकठिकाणी निकृष्ट काम झाल्याने या शाखा कालव्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे गेली कित्येक वर्षे या कालव्यातून पाणी सोडण्यात आले नाही. दरवर्षी या कालव्याची दुरवस्थेत सतत वाढ होत आहे. सटमटवाडी येथे कालव्यावर दरड कोसळल्याने येथील कालवा धोकादायक बनला आहे. शिवाय निकृष्ट बांधकामानेही कालव्याला सुरुवातीपासूनच तडे गेले आहेत. मे २0१0 साली सटमटवाडी येथे पाणी चाचणी घेतानाच कालवा फुटला होता. यावर प्रशासनावर ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला होता. प्रशासन मात्र मूग गिळून गप्पच राहिले. त्यानंतर सटमटवाडी येथे सातत्याने कालव्यावर दरड कोसळल्याने कालव्याचे काम बंद ठेवण्यात आले होते. या कालव्याच्या दुरवस्थेबाबत ‘लोकमत’ने सचित्र वृत्त प्रसिद्ध केले होते. तसेच पावसाळ्यापूर्वी या कालव्यातील दरडीची माती न हटविल्यास कालवा कोसळण्याची शक्यता होती. या वृत्ताची दखल घेत कालवा विभागाने तातडीने कालव्यातील माती पावसाळ्यापूर्वी हटविली होती. मात्र, पावसाळ्यात पुन्हा या कालव्याची दुरवस्था झाली आहे.कालव्यामध्ये जंगली झाडांची वाढ झाली असून, कालव्यामध्ये मोठ्या प्रमाणात कचरा साठला आहे. मात्र, गतवर्षी कालव्याची दुरुस्ती न करताच कालवा विभागाने मे महिन्याच्या अखेरीस या शाखा कालव्यातून डोंगरपाल येथून पाणी सोडले होते. मात्र, पाच वर्षांपूर्वी पाणी सोडताना बांदा-सटमटवाडी येथे कालवा फुटल्याने त्यावेळी कमी प्रमाणात पाणी सोडण्यात आले....अन्यथा पाण्याचा अपव्यययावर्षी पाणीटंचाईची झळ अधिक जाणवणार असल्याने यावर्षी कालव्यातील पाणी लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी होत आहे. मात्र, कालव्याची डागडुजी तसेच साफसफाई करूनच कालवा विभागाने पाणी सोडण्याची गरज आहे. अन्यथा, शेतकऱ्यांसाठी सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा अपव्यय होऊ शकतो. त्यामुळे कालव्यातील कचरा व मातीची साफसफाई तत्काळ करण्याची मागणी स्थानिकांतून होत आहे. कालव्यातील पाणी दूषितकचऱ्यामुळे कालव्यातील पाणी पूर्णपणे दूषित झाले होते. कालव्याची दुरवस्था झाल्याने कालव्यातून काही ठिकाणी पाणी झिरपत असल्याने विहिरींमधील पाणी गढूळ झाल्याची तक्रार काही ग्रामस्थांनी केली होती.