शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
4
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
5
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
6
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
7
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
8
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
9
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
10
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
11
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
12
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
13
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
14
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
15
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
16
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
17
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
18
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
19
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
20
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
Daily Top 2Weekly Top 5

बांद्यातील कालव्यात मातीसह झाडी

By admin | Updated: November 20, 2015 00:17 IST

प्रशासनाचे दुर्लक्ष : साफसफाईअभावी कालव्याचा प्रवाह बदलण्याची शक्यता

बांदा : बांदा येथून जाणाऱ्या तिलारी शाखा कालव्याची साफसफाईअभावी पूर्णपणे दुरवस्था झाली असून, ठिकठिकाणी कालव्यात माती कोसळली आहे. यावर्षी कालव्यातून पाणी सोडताना कालव्याची सफाई करणे गरजेचे आहे, अन्यथा कालव्यातील पाण्याचा प्रवाह बदलून तो फुटण्याचीही शक्यता आहे. बांदा परिसरातील पाण्याचे दुर्भिक्ष मिटविण्यासाठी तिलारीचे पाणी या परिसरात शाखा कालव्याच्या माध्यमातून आणण्यात आले आहे. मात्र, ठिकठिकाणी निकृष्ट काम झाल्याने या शाखा कालव्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे गेली कित्येक वर्षे या कालव्यातून पाणी सोडण्यात आले नाही. दरवर्षी या कालव्याची दुरवस्थेत सतत वाढ होत आहे. सटमटवाडी येथे कालव्यावर दरड कोसळल्याने येथील कालवा धोकादायक बनला आहे. शिवाय निकृष्ट बांधकामानेही कालव्याला सुरुवातीपासूनच तडे गेले आहेत. मे २0१0 साली सटमटवाडी येथे पाणी चाचणी घेतानाच कालवा फुटला होता. यावर प्रशासनावर ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला होता. प्रशासन मात्र मूग गिळून गप्पच राहिले. त्यानंतर सटमटवाडी येथे सातत्याने कालव्यावर दरड कोसळल्याने कालव्याचे काम बंद ठेवण्यात आले होते. या कालव्याच्या दुरवस्थेबाबत ‘लोकमत’ने सचित्र वृत्त प्रसिद्ध केले होते. तसेच पावसाळ्यापूर्वी या कालव्यातील दरडीची माती न हटविल्यास कालवा कोसळण्याची शक्यता होती. या वृत्ताची दखल घेत कालवा विभागाने तातडीने कालव्यातील माती पावसाळ्यापूर्वी हटविली होती. मात्र, पावसाळ्यात पुन्हा या कालव्याची दुरवस्था झाली आहे.कालव्यामध्ये जंगली झाडांची वाढ झाली असून, कालव्यामध्ये मोठ्या प्रमाणात कचरा साठला आहे. मात्र, गतवर्षी कालव्याची दुरुस्ती न करताच कालवा विभागाने मे महिन्याच्या अखेरीस या शाखा कालव्यातून डोंगरपाल येथून पाणी सोडले होते. मात्र, पाच वर्षांपूर्वी पाणी सोडताना बांदा-सटमटवाडी येथे कालवा फुटल्याने त्यावेळी कमी प्रमाणात पाणी सोडण्यात आले....अन्यथा पाण्याचा अपव्यययावर्षी पाणीटंचाईची झळ अधिक जाणवणार असल्याने यावर्षी कालव्यातील पाणी लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी होत आहे. मात्र, कालव्याची डागडुजी तसेच साफसफाई करूनच कालवा विभागाने पाणी सोडण्याची गरज आहे. अन्यथा, शेतकऱ्यांसाठी सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा अपव्यय होऊ शकतो. त्यामुळे कालव्यातील कचरा व मातीची साफसफाई तत्काळ करण्याची मागणी स्थानिकांतून होत आहे. कालव्यातील पाणी दूषितकचऱ्यामुळे कालव्यातील पाणी पूर्णपणे दूषित झाले होते. कालव्याची दुरवस्था झाल्याने कालव्यातून काही ठिकाणी पाणी झिरपत असल्याने विहिरींमधील पाणी गढूळ झाल्याची तक्रार काही ग्रामस्थांनी केली होती.