शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

परिवर्तनवादी चळवळ एका छताखाली

By admin | Updated: July 7, 2015 21:14 IST

आठ चळवळींचा निर्णय : युवक, विद्यार्थ्यांनाही सामावून घेणार

सावंतवाडी : जिल्ह्यातील परिवर्तनवादी चळवळीतील कार्यकर्त्यांनी ‘आम्ही भारतीय’ या विचारमंचाखाली एकत्र येण्याचा निर्णय येथे आयोजित केलेल्या परिवर्तनवादी चळवळीतील कार्यकर्त्यांच्या बैठकीत घेण्यात आला. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना या चळवळीत सहभागी करून घेण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला. येथील श्रीराम वाचन मंदिरात रविवारी परिवर्तनवादी चळवळीतील कार्यकर्त्यांची चळवळ झाली. यावेळी राष्ट्रसेवा दल, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, मानवमुक्ती लढा, सत्यशोधकसमिती, विवेक वाहिनी, श्रीराम वाचन मंदिर, मुक्तांगण, तसेच शिक्षक वाङमय, आदी संघटना ‘आम्ही भारतीय’ या अनौपचारिक विचारमंचात एकत्र आल्या होत्या. यासंदर्भात पाचजणांची अस्थायी समिती स्थापन करण्यात आली. यात अ‍ॅड. संदीप निंबाळकर, प्रा. प्रवीण बांदेकर, प्रा. विनोदसिंह पाटील, डॉ. गोविंद काजरेकर, प्रा. आर. के. संकपाळ यांचा समावेश आहे. बैठकीचे प्रास्ताविक डॉ. काजरेकर यांनी केले. त्यांनी, परिवर्तनवादी चळवळीतील कार्यकर्त्यांनी जिल्हा स्तरावर एकत्र येण्याची संकल्पना मांडली. त्यावर उपस्थितांनी विविध मते मांडून त्यावर सविस्तर चर्चा केली. त्यानुसार सर्वानुमते ‘आम्ही भारतीय’ या नावाने विचारमंच स्थापन करून चळवळ पुढे नेण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी गोपुरी आश्रमाचे प्रा. राजेंद्र मुंबरकर यांनी आपण राबविलेले दृष्टिकोन शिबिर, व्यसनमुक्ती शिबिर यासंबंधी माहिती दिली. तरुण पिढी चांगल्या मार्गाकडे वळावी. ती गोंधळली की, राजकीय मंडळी याचा फायदा घेतात, असे मत मांडले. त्यानुसार महाविद्यालयीन पातळीवर मुलांशी संवाद साधून त्यांना चळवळीत सहभागी करून घेण्याचे ठरविण्यात आले. दरम्यान, साठे साहित्य संमेलनाचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल अ‍ॅड. संदीप निंबाळकर, प्रा. प्रवीण बांदेकर, प्रा. आर. के. संकपाळ, डॉ. गोविंद काजरेकर यांचा सत्कार करण्यात आला. या बैठकीला मंगल परुळेकर, डॉ. शरयू आसोलकर, अप्पाजी गावडे, शशी नेवगी, वीरधवल परब, सचिन देसाई, प्रा. देविदास बोर्डे, लीलाधर घाडी, राजेंद्र कांबळे, नंदू पाटील, डॉ. विजयालक्ष्मी चिंडक, प्रा. एल. पी. पाटील, सुनील भिसे, डॉ. जी. ए. बुवा आदी उपस्थित होते. (वार्ताहर)