शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG 3rd Test: नो आघाडी...नो पिछाडी; लॉर्ड्सच्या मैदानातील टेस्ट मॅचमध्ये पहिल्यांदाच 'टाय'चा ट्विस्ट!
4
समाज कंटकांनी कावड यात्रा मार्गावर टाकले काचेचे तुकडे; भाजप नेत्याचा दावा
5
अनैतिक संबंधांचा संशय, पतीनं अभिनेत्री पत्नीवर आधी 'पेर स्प्रे' मारला, मग चाकूनं सपासप वार केले अन्...
6
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
7
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
8
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
9
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
10
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
11
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
12
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
13
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
14
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
15
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

रेल्वे दुपदरीकरण जूनपासून : गीते

By admin | Updated: May 28, 2015 00:58 IST

महामार्ग चौपदरीकरण प्रारंभ आॅक्टोबरमध्ये

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाचा शुभारंभ आॅक्टोबर २०१५ मध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत होईल. हे काम २०१७ पर्यंत पूर्ण केले जाईल. तसेच कोकण रेल्वेच्या दुपदरीकरणाला मंजुरी मिळाली आहे. या कामाचा प्रारंभ जून २०१५ मध्ये रोहा व सावंतवाडी येथे केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या उपस्थितीत होईल, अशी माहिती केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी येथे दिली.  केंद्र सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरीतील स्वातंत्र्यवीर सावकर नाट्यगृहात बुधवारी आयोजित जनकल्याण पर्व मेळाव्यात प्रमुख वक्ते म्हणून अनंत गीते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर शिवसेना-भाजपचे पदाधिकारी, आमदार उपस्थित होते. त्यावेळी गीते यांनी वर्षभरातील कोकणसाठी केलेल्या कामांचा आढावा घेतला. केंद्रात मोदी सरकार आल्यानंतर केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी सर्वप्रथम ४२०० कोटी खर्चाच्या मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाच्या प्रकल्पास मंजुरी दिली. या महामार्गावर आतापर्यंत हजारो प्रवाशांचा बळी गेला आहे. चौपदरीकरणाने प्रवाशांना सुरक्षित प्रवास करणे शक्य होणार आहे. आधीच्या सरकारने केवळ बीओटी तत्त्वावर हे काम करण्याची घोषणा केली. मात्र, केंद्रात मोदी सरकार आल्यानंतर स्वनिधीतून हे चौपदरीकरणाचे काम मंजूर करण्यात आले. चौपदरीकरणातील पनवेल ते इंदापूर हे ८४ किलोमीटरचे काम आधीच्या सरकारने बीओटी तत्त्वावर करावयास दिले होते. ते अपूर्ण होते. आता ते कामही शासनाने ताब्यात घेतले आहे. या कामाला निधी कमी पडू दिला जाणार नाही. तसेच कमीत कमी विस्थापन व शंभर टक्के पुनर्वसन यावर भर दिला जाणार आहे. आवश्यकता भासल्यास काही ठिकाणी पर्यायी मार्ग बनविण्याचीही तयारी आहे, असे ते म्हणाले.कोकण रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाला येत्या जूनमध्ये प्रारंभ होणार आहे. दुपदरीकरण झाल्यावर या मार्गावरील गाड्यांची संख्या वाढेल व वेळही वाचेल, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)इंदापूर ते झाराप चौपदरीकरण कामाचे दहा टप्पे करण्यात आले आहेत. मोजणी, संपादन काम पूर्ण होताच येत्या आॅक्टोबरमध्ये सर्व टप्प्यांच्या निविदा एकाचवेळी काढल्या जाणार आहेत. एकाचवेळी सर्व टप्प्यांतील रस्ता चौपदरीकरणाची कामे सुरू केली जाणार आहेत.लोटेत २४०० कोटींचा कागदनिर्मिती प्रकल्पजिल्ह्यातील लोटे येथे २४०० कोेटींचा पेपर निर्मिती प्रकल्प उभारला जाणार आहे. त्यासाठी कोकणातील जमिनीतून बांबू उत्पादन घेतले जाणार आहे. तसेच घाटमाथ्यावर व जवळच्या ठिकाणी असलेल्या साखर कारखान्यांतील उसाचे चिपाड हा कच्चा माल म्हणून वापरला जाणार आहे, असे गीते म्हणाले.