शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे दुपदरीकरण जूनपासून : गीते

By admin | Updated: May 28, 2015 00:58 IST

महामार्ग चौपदरीकरण प्रारंभ आॅक्टोबरमध्ये

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाचा शुभारंभ आॅक्टोबर २०१५ मध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत होईल. हे काम २०१७ पर्यंत पूर्ण केले जाईल. तसेच कोकण रेल्वेच्या दुपदरीकरणाला मंजुरी मिळाली आहे. या कामाचा प्रारंभ जून २०१५ मध्ये रोहा व सावंतवाडी येथे केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या उपस्थितीत होईल, अशी माहिती केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी येथे दिली.  केंद्र सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरीतील स्वातंत्र्यवीर सावकर नाट्यगृहात बुधवारी आयोजित जनकल्याण पर्व मेळाव्यात प्रमुख वक्ते म्हणून अनंत गीते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर शिवसेना-भाजपचे पदाधिकारी, आमदार उपस्थित होते. त्यावेळी गीते यांनी वर्षभरातील कोकणसाठी केलेल्या कामांचा आढावा घेतला. केंद्रात मोदी सरकार आल्यानंतर केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी सर्वप्रथम ४२०० कोटी खर्चाच्या मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाच्या प्रकल्पास मंजुरी दिली. या महामार्गावर आतापर्यंत हजारो प्रवाशांचा बळी गेला आहे. चौपदरीकरणाने प्रवाशांना सुरक्षित प्रवास करणे शक्य होणार आहे. आधीच्या सरकारने केवळ बीओटी तत्त्वावर हे काम करण्याची घोषणा केली. मात्र, केंद्रात मोदी सरकार आल्यानंतर स्वनिधीतून हे चौपदरीकरणाचे काम मंजूर करण्यात आले. चौपदरीकरणातील पनवेल ते इंदापूर हे ८४ किलोमीटरचे काम आधीच्या सरकारने बीओटी तत्त्वावर करावयास दिले होते. ते अपूर्ण होते. आता ते कामही शासनाने ताब्यात घेतले आहे. या कामाला निधी कमी पडू दिला जाणार नाही. तसेच कमीत कमी विस्थापन व शंभर टक्के पुनर्वसन यावर भर दिला जाणार आहे. आवश्यकता भासल्यास काही ठिकाणी पर्यायी मार्ग बनविण्याचीही तयारी आहे, असे ते म्हणाले.कोकण रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाला येत्या जूनमध्ये प्रारंभ होणार आहे. दुपदरीकरण झाल्यावर या मार्गावरील गाड्यांची संख्या वाढेल व वेळही वाचेल, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)इंदापूर ते झाराप चौपदरीकरण कामाचे दहा टप्पे करण्यात आले आहेत. मोजणी, संपादन काम पूर्ण होताच येत्या आॅक्टोबरमध्ये सर्व टप्प्यांच्या निविदा एकाचवेळी काढल्या जाणार आहेत. एकाचवेळी सर्व टप्प्यांतील रस्ता चौपदरीकरणाची कामे सुरू केली जाणार आहेत.लोटेत २४०० कोटींचा कागदनिर्मिती प्रकल्पजिल्ह्यातील लोटे येथे २४०० कोेटींचा पेपर निर्मिती प्रकल्प उभारला जाणार आहे. त्यासाठी कोकणातील जमिनीतून बांबू उत्पादन घेतले जाणार आहे. तसेच घाटमाथ्यावर व जवळच्या ठिकाणी असलेल्या साखर कारखान्यांतील उसाचे चिपाड हा कच्चा माल म्हणून वापरला जाणार आहे, असे गीते म्हणाले.