शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

मालवणात वाहतूक कोंडीने हैराण

By admin | Updated: May 14, 2016 23:42 IST

पर्यटकांचा ओघ : अरूंद रस्ता, उन्हाळी सुट्टी, किल्ले सिंधुदुर्गला सर्वाधिक पसंती

मालवण : मालवणात उन्हाळी सुट्टीची मजा लुटण्यासाठी हजारो पर्यटक दाखल झाले आहेत. पर्यटक तसेच चाकरमानी यांनी मालवणनगरी फुलून गेली आहे. पर्यटन व्यवसायही बहरात असून स्कुबा डायव्हिंग, जलक्रीडा तसेच किल्ले सिंधुदुर्ग दर्शनाला पर्यटकांनी अधिक पसंती दिली आहे. बुधवारपासून पर्यटकांनी मालवण ‘हाऊसफुल्ल’ झाल्याचे चित्र आहे. एकीकडे पर्यटन वाढत असताना मात्र अरुंद रस्त्यांअभावी वाहतूक कोंडी मोठी डोकेदुखी ठरत आहे. शनिवारी सकाळपासून पर्यटकांचा ओघ वाढता असल्याने दुपारी तीनच्या सुमारास मालवण भरड ते देऊळवाडा या दीड किलोमीटर अंतरात सुमारे अर्ध्या तासाहून अधिक काळ प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती.दरम्यान, दुपारच्या वेळी मालवणहून मुंबई येथे जाणाऱ्या खासगी गाड्यांमुळे दुपारच्या सत्रात वाहतुकीचा खोळंबा होत असल्याचे बोलले जात आहे. पोलीस व वाहतूक प्रशासनाने याकडे गांभीर्याने पहावे, असाही सूर स्थानिक वाहनधारक व्यक्त करत आहे. मालवणात पर्यटकांनी आठवडाअखेरीस तुफान गर्दी केली आहे. गुरुवार सायंकाळपासूनच पर्यटकांनी मालवण किनारपट्टी गजबजून गेली. अपुरे पार्किंग, अरुंद रस्त्यांमुळे मालवण बाजारपेठ आणि तारकर्ली देवबाग मार्गावर वाहतुकीची मोठी कोंडी दिसून येत होती. पर्यटकांच्या वाहनांची वाढती संख्या लक्षात घेता पोलीस प्रशासनाने अधिक पोलीस कर्मचारी तैनात करावेत, अशीही मागणी होत आहे. मालवण शहरातील अपुरी पार्किंग व्यवस्था, अरुंद रस्ते यामुळे मोठी वाहतूक कोंडी सकाळपासून निर्माण झाली होती. मालवण देऊळवाडा ते बाजारपेठ मार्गावर दिवसभरात ठिकठिकाणी वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण झाला होता. (प्रतिनिधी)खासगी बस वाहतूक कोंडीस कारणीभूत?मालवण येथून मुंबई येथे जाणाऱ्या खासगी बसेस एसटी बसस्थानकानजीक प्रवासी भरतात. दुपारी ३ ते ४ या वेळात किमान सात ते आठ खासगी बसेस प्रवासी भरण्यासाठी थांबत असल्याने रस्त्यांवर दोन्ही बाजूने लांबलचक वाहनाच्या रांगा लागत आहे. शनिवारी दुपारी स्थानिक रिक्षाचालक व खासगी बसचालक यांच्यात बाचाबाची झाली. त्यामुळे प्रवासी भरण्यासाठी खासगी बसेस धारकांनी सागरी मार्गाचा अवलंब करावा, अशी मागणी करताना पोलिसांनी याकडे लक्ष घालावे, अशी मागणी वाहनचालक करत आहेत. खोळंबून रहावे लागत असल्याने साऱ्या प्रकाराबाबत प्रवासी व पर्यटकातून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत होती.