शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटकांची वर्दळ सुरू रेडी येथील स्थिती :

By admin | Updated: September 11, 2014 23:10 IST

सोयीसुविधांबाबत नाराजी

रेडी : पावसाळी हंगामाचा शेवट जवळ आल्याने रेडी गावात पर्यटकांची वर्दळ आता वाढायला सुरुवात झाली आहे. देशी पर्यटकांची पावले आता मोठ्या प्रमाणावर रेडी गावाच्या दिशेने फिरकायला लागली असून पर्यटकांचा हंगाम सुरू झाल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. परंतु रेडी परिसरात येणारे देशी पर्यटक येथे पुरेशा सुखसुविधा उपलब्ध नसल्याने दिवसभर फिरून राहण्यासाठी नजीकच्या गोवा राज्यात जात आहेत.वेंगुर्ले तालुक्यातील रेडी हे गाव पर्यटनाच्या दृष्टीने जगाच्या नकाशावर पोहोचले आहे. रेडी बंदरात चालणाऱ्या मायनिंग आणि खनिज वाहतुकीच्या बंदरामुळे हे बंदर आंतरराष्ट्रीय ख्यातीचे बनत आहे. रेडी गावात आल्यानंतर प्रथम श्री सत्यपुरुषाचे आकर्षक असे मंदिर दृष्टीपथात पडते. तसेच रेडी गावात पुढे आल्यानंतर येथील जागृत आणि भक्तांच्या हाकेला, नवसाला पावणारा स्वयंभू महागणपती, स्वयंभू श्री माऊली मंदिर, श्री सिध्देश्वर मंदिर, येथील स्वच्छ व सुंदर रमणीय सागर किनारा, कनयाळे येथील माड बागायतीमधील हनुमान मंदिर, नवदुर्गा मंदिर, पांडवकालीन कोरलेली हत्तीची सोंड, गुहा, जाते, श्री घंगाळेश्वर मंदिर व कर्पेवाडीतील स्वामी समर्थांचे मंदिर, साईबाबा मंदिर, विठोबा रखुमाई मंदिर व समुद्रानजीक असलेले रेडी बंदर परिसर हे देशी पर्यटकांचे मन वेधून घेत आहेत. पर्यटनाच्या माध्यमातून सध्या विदेशी पर्यटक देवदर्शन व नैसर्गिक आकर्षक पर्यटनस्थळे पाहण्यासाठी रेडीमध्ये दाखल होण्यास सरुवात झाली आहे. येथे येणारे पर्यटक येथील पर्यटनावर बेहद खुश होत आहेत. सध्या कोल्हापूर, सांगली, सातारा, कऱ्हाड, पुणे, बेळगाव, कारवार व गोवा राज्यातील देशी पर्यटकांची रेडी परिसरात वर्दळ वाढायला सुरुवात झाली आहे. या देशी पर्यटकांना येथील पर्यटनाबाबत छेडले असता ते म्हणतात, सिंधुुदुर्ग व रेडी किनारपट्टी म्हणजे निसर्ग सौंदर्याची खाण आहे. येथील स्वच्छता पाहून विदेशातील समुद्रकिनारे फिके वाटतात. येथील समुद्र किनाऱ्यावरील स्वच्छता अशीच कायमस्वरुपी टिकून राहण्यासाठी सर्व पर्यटकांनी व ग्रामस्थांनी प्रयत्नशील रहावे. जेणेकरून आगामी काळात येथील पर्यटन व्यवसायाला चांगले दिवस येतील. (वार्ताहर)वास्तव्यासाठी गोव्याला पसंतीरेडी येथील निसर्ग सौंदर्य पर्यटकांना भारावून टाकते. मात्र, सोयीसुविधांच्या बाबतीत मोठी कमतरता भासत असल्यामुळे देशी पर्यटक मोठ्या प्रमाणावर नाराज असतात. परिणामी ते राहण्यासाठी नजीकच्या गोवा राज्यात जातात. त्यामुळे आगामी काळात येथील प्रशासनाने व पर्यटन विभागाने येथील ग्रामस्थांना विश्वासात घेऊन समुद्र किनारी राहण्यासाठी, खाण्यापिण्यासाठी, चांगल्या सुविधा दिल्या तर भविष्यात सोयीसुविधांच्या अभावामुळे गोव्याला जाणारे पर्यटक येथे वास्तव्य करतील. त्यामुळे स्थानिकांना रोजगार प्राप्ती होणार आहे. मात्र, तशाप्रकारच्या सुखसुविधा देण्यासाठी प्रशासनाने लोकांना हाताशी धरून नियोजन करणे आवश्यक आहे. पर्यटकांचे हे प्रातिनिधिक मत पर्यटनाच्या बाबतीत खूप काही सांगणारे आहे. त्यामुळे आगामी काळात रेडी परिसरात व प्रामुख्याने किनारपट्टी भागात पुरेशा सुखसुविधा निर्माण होणे अत्यंत गरजेचे आहे.