शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री उदय सामंत चौथ्यांदा 'शिवतीर्थ'वर; मनसे प्रमुख राज ठाकरेंची घेतली भेट, कारण काय?
2
सीमेवर बंदुका थंडावल्या, पण एअर इंडिया, गो इंडिगोने विमानफेऱ्या रद्द केल्या; या विमानतळांवर आजही...
3
हिंडन विमानतळावरून बंगळुरू, लुधियाना, नांदेडसाठी आजपासून विमानसेवा सुरू; मुंबई, गोव्यासाठी केव्हा सुरू होणार?
4
Stock Market Today: विक्रमी तेजीनंतर शेअर बाजारात घसरण; ५०० पेक्षा जास्त अंकांनी आपटला, तरीही फार्मा सेक्टरमध्ये तेजी का?
5
सावधान! 'या' नंबरवरून पाकिस्तानी हॅकर्सचा भारतीयांना फोन; सुरक्षा यंत्रणेचा मोठा अलर्ट
6
धक्कादायक! अमृतसरमध्ये विषारी दारूमुळे १२ जणांचा मृत्यू, ५ जणांची प्रकृती गंभीर
7
India retaliatory tariff: चीननंतर भारताचं अमेरिकेला जोरदार प्रत्युत्तर, स्टील-अ‍ॅल्युमिनिअम टॅरिफवर मोठी घोषणा
8
'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारतावर १५ लाख सायबर हल्ले; पाकिस्तान,बांगलादेशसह या ५ देशातील हॅकर्स
9
भीमा कोरेगाव प्रकरण: आज आयोगापुढे शरद पवार हजर राहणार?
10
स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा
11
गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा
12
"ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
14
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
15
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
16
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
17
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
18
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
19
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
20
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय

पर्यटकांची वर्दळ सुरू रेडी येथील स्थिती :

By admin | Updated: September 11, 2014 23:10 IST

सोयीसुविधांबाबत नाराजी

रेडी : पावसाळी हंगामाचा शेवट जवळ आल्याने रेडी गावात पर्यटकांची वर्दळ आता वाढायला सुरुवात झाली आहे. देशी पर्यटकांची पावले आता मोठ्या प्रमाणावर रेडी गावाच्या दिशेने फिरकायला लागली असून पर्यटकांचा हंगाम सुरू झाल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. परंतु रेडी परिसरात येणारे देशी पर्यटक येथे पुरेशा सुखसुविधा उपलब्ध नसल्याने दिवसभर फिरून राहण्यासाठी नजीकच्या गोवा राज्यात जात आहेत.वेंगुर्ले तालुक्यातील रेडी हे गाव पर्यटनाच्या दृष्टीने जगाच्या नकाशावर पोहोचले आहे. रेडी बंदरात चालणाऱ्या मायनिंग आणि खनिज वाहतुकीच्या बंदरामुळे हे बंदर आंतरराष्ट्रीय ख्यातीचे बनत आहे. रेडी गावात आल्यानंतर प्रथम श्री सत्यपुरुषाचे आकर्षक असे मंदिर दृष्टीपथात पडते. तसेच रेडी गावात पुढे आल्यानंतर येथील जागृत आणि भक्तांच्या हाकेला, नवसाला पावणारा स्वयंभू महागणपती, स्वयंभू श्री माऊली मंदिर, श्री सिध्देश्वर मंदिर, येथील स्वच्छ व सुंदर रमणीय सागर किनारा, कनयाळे येथील माड बागायतीमधील हनुमान मंदिर, नवदुर्गा मंदिर, पांडवकालीन कोरलेली हत्तीची सोंड, गुहा, जाते, श्री घंगाळेश्वर मंदिर व कर्पेवाडीतील स्वामी समर्थांचे मंदिर, साईबाबा मंदिर, विठोबा रखुमाई मंदिर व समुद्रानजीक असलेले रेडी बंदर परिसर हे देशी पर्यटकांचे मन वेधून घेत आहेत. पर्यटनाच्या माध्यमातून सध्या विदेशी पर्यटक देवदर्शन व नैसर्गिक आकर्षक पर्यटनस्थळे पाहण्यासाठी रेडीमध्ये दाखल होण्यास सरुवात झाली आहे. येथे येणारे पर्यटक येथील पर्यटनावर बेहद खुश होत आहेत. सध्या कोल्हापूर, सांगली, सातारा, कऱ्हाड, पुणे, बेळगाव, कारवार व गोवा राज्यातील देशी पर्यटकांची रेडी परिसरात वर्दळ वाढायला सुरुवात झाली आहे. या देशी पर्यटकांना येथील पर्यटनाबाबत छेडले असता ते म्हणतात, सिंधुुदुर्ग व रेडी किनारपट्टी म्हणजे निसर्ग सौंदर्याची खाण आहे. येथील स्वच्छता पाहून विदेशातील समुद्रकिनारे फिके वाटतात. येथील समुद्र किनाऱ्यावरील स्वच्छता अशीच कायमस्वरुपी टिकून राहण्यासाठी सर्व पर्यटकांनी व ग्रामस्थांनी प्रयत्नशील रहावे. जेणेकरून आगामी काळात येथील पर्यटन व्यवसायाला चांगले दिवस येतील. (वार्ताहर)वास्तव्यासाठी गोव्याला पसंतीरेडी येथील निसर्ग सौंदर्य पर्यटकांना भारावून टाकते. मात्र, सोयीसुविधांच्या बाबतीत मोठी कमतरता भासत असल्यामुळे देशी पर्यटक मोठ्या प्रमाणावर नाराज असतात. परिणामी ते राहण्यासाठी नजीकच्या गोवा राज्यात जातात. त्यामुळे आगामी काळात येथील प्रशासनाने व पर्यटन विभागाने येथील ग्रामस्थांना विश्वासात घेऊन समुद्र किनारी राहण्यासाठी, खाण्यापिण्यासाठी, चांगल्या सुविधा दिल्या तर भविष्यात सोयीसुविधांच्या अभावामुळे गोव्याला जाणारे पर्यटक येथे वास्तव्य करतील. त्यामुळे स्थानिकांना रोजगार प्राप्ती होणार आहे. मात्र, तशाप्रकारच्या सुखसुविधा देण्यासाठी प्रशासनाने लोकांना हाताशी धरून नियोजन करणे आवश्यक आहे. पर्यटकांचे हे प्रातिनिधिक मत पर्यटनाच्या बाबतीत खूप काही सांगणारे आहे. त्यामुळे आगामी काळात रेडी परिसरात व प्रामुख्याने किनारपट्टी भागात पुरेशा सुखसुविधा निर्माण होणे अत्यंत गरजेचे आहे.