शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
2
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
3
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
4
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
5
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
6
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
7
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
8
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
9
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
10
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
11
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
12
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
13
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
14
"गणित जुळलं की...", अभिनेत्री ऋतुजा बागवे लग्नाबद्दल स्पष्टच बोलली
15
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
16
भारत, पाकिस्तान, अमेरिका अन् जपानमध्ये आपत्ती येणार; बाबा वेंगाची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?
17
“...तोपर्यंत मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळणार नाही”: बाळासाहेब थोरात
18
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!
19
मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ‘हिट’, शेतकरी, धारावी पुनर्वसन आंदोलन याच मार्गाने जाणार?
20
“आज BJP आहे, उद्या बाजी पलटेल, काँग्रेस सत्तेत येईल”; कोणत्या नेत्यांनी व्यक्त केला विश्वास?

पर्यटन बारमाही उत्पन्न देणारा उद्योग

By admin | Updated: February 12, 2015 00:34 IST

आर. पी. निर्मळ : वालावल येथे शेतकरी मेळावा

कुडाळ : शासनाच्या विविध योजनांची सखोल माहिती घेऊन शेतकऱ्यांनी या योजनांचा लाभ घेणे आवश्यक आहे. पर्यटन हा १२ महिने उत्पन्न देणारा उद्योग असून त्याकडे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी वळावे, असे प्रतिपादन तालुका कृषी अधिकारी आर. पी. निर्मळ यांनी केले. वालावल येथे मनोरमा चौधरी चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने रविवारी आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती सदस्य अतुल बंगे होते. यावेळी प्रभारी गटविकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर, वालावलचे सरपंच राजेश प्रभू, शिवसेना शाखाप्रमुख संजोग साळसकर, ट्रस्टचे सचिव संदीप साळसकर, तंटामुक्ती अध्यक्ष घनशाम वालावलकर, आदी उपस्थित होते. मेळाव्याची प्रस्तावना करताना चौधरी यांनी मेळाव्याची उद्दिष्ट्ये शेतकऱ्यांसमोर मांडली. सरपंच राजेश प्रभू यांनी, गावाच्या विकासात कोणतेही राजकारण न आणता ग्रामपंचायतीमार्फत लागणारे संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. कृषी अधिकारी प्रफुल्ल वालावलकर म्हणाले, गावातील तरुणांचे शेतकरी गट बनवून त्यांना इतर राज्यातील शेतीपूरक प्रकल्प दाखविणे आवश्यक आहे. सभाध्यक्ष अतुल बंगे यांनी, लक्ष्मीनारायण तलावातून पाझरणारे पाणी बंद करून त्या पाण्याचा उपयोग बाराही महिने शेतकऱ्यांना कसा होईल, यासाठी केंद्राचे पर्यटनमंत्री रवी नाईक यांच्या माध्यमातून पर्यटनाच्या हेडखाली निधी आणून तलावातील गाळ काढून, त्याचे सुशोभीकरण व चारी बाजूंनी जॉगिंग ट्रॅक करण्याकरिता चौधरी ट्रस्टच्या सहकार्यातून प्रयत्नशील राहण्याचे आश्वासन दिले. शेतकऱ्यांच्यावतीने विष्णू वालावलकर, नाथा हिंदळेकर, मीनानाथ कोचरेकर यांनी विचार मांडले. मेळाव्याचे प्रास्ताविक व आभार संदीप साळसकर यांनी मानले. मेळावा यशस्वी करण्यासाठी दादू कोळंबकर, संतोष मुणगेकर, सुनील करवडकर, सागर वालावलकर, महेन जाधव, चैतन्य वालावलकर यांनी विशेष परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)