शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

तारकर्ली, देवबागमध्ये पर्यटन बंद

By admin | Updated: January 7, 2016 00:39 IST

‘सीआरझेड’खाली कारवाई : मालवणात आज तहसील कार्यालयावर मोर्चा

मालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनाचे प्रमुख केंद्र असलेल्या देवबाग, तारकर्ली, वायरी या गावातील बांधकामांवर सीआरझेड कायद्याच्या नावाखाली महसूल विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे. या विरोधात या तीनही गावातील पर्यटन व्यावसायिकांनी दि. ६ व ७ जानेवारी रोजी आपले पर्यटन व्यवसाय बंद ठेवत निषेध नोंदवला आहे. या बंदला बोटिंग व जलक्रीडा व्यावसायिकांनी पाठिंबा दिला आहे. गुरुवारी सकाळी तहसील कार्यालयावर मोर्चा काढत हे पर्यटन व्यावसायिक आपली भूमिका शासन दरबारी मांडणार आहेत. काँग्रेस पक्षाने या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देत सहभागी होत असल्याचे स्पष्ट केले आहे. तारकर्ली, देवबाग, वायरी या गावातील बांधकामावर सीआरझेड कायद्याच्या नावाखाली कारवाई करण्यात येत आहे. याविरोधात पर्यटन व्यावसायिकांनी बुधवारी बंद पुकारला होता. दरम्यान, तारकर्ली येथील टीटीडीएस या पर्यटन संस्थेने या आंदोलनात आपण सहभागी नसलो तरी आपली कोणतीही विरोधी भूमिका नाही, असे स्पष्ट केले. त्यामुळे बुधवारी किनारपट्टीवर जलक्रीडा व्यवसाय पूर्णपणे बंद होता. मात्र, हॉटेलमध्ये आलेले काही पर्यटक बोटिंगचा आनंद घेत असल्याने हा बंद संमिश्र असल्याची स्थितीही दिसत होती. मात्र, तीनही गावच्या समन्वय समितीच्या वतीने अध्यक्ष बाबू बिरमोळे यांनी बुधवारचा बंद ९० टक्क्यांहून अधिक यशस्वी झाल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)बाबा मोंडकर : कागदपत्रांची पूर्तता...तारकर्ली पर्यटन व्यवसायिक संस्था या बंद आंदोलनात सहभागी झाली नाही. शासनाकडून स्थानिकांचे व्यवसाय, बांधकामे नियमित करण्यासाठी सहकार्य मिळत आहे. व्यावसायिकांनी आवश्यक ती कागदपत्रे व अन्य परवाना पूर्तता केल्यास निश्चितच त्याचा फायदा होणार आहे, असे सांगत संस्थेचे अध्यक्ष बाबा मोंडकर यांनी आम्हा व्यावसायिकांच्या अन्य काही मागण्या आहेत, त्या शासन दरबारी पोहचवण्यासाठी बंद मध्ये सहभागी नसलो तरी व्यवसायिक प्रशासनाकडे निवेदन देतील, असे सांगितले.पर्यटन व्यवसायिकांच्या बंदमध्ये काहींनी सहभाग न दर्शविल्याने या व्यावसायिकांमध्ये फूट पडल्याचे चित्र होते. मात्र, बोटिंग व जलक्रीडा व्यावसायिकांनी या बंदला पाठींबा देत तसेच आपलेही प्रश्न शासन दरबारी मांडण्यासाठी बंदमध्ये सहभाग घेतला. उद्या गुरुवारी पर्यटन व्यवसाय १०० टक्के बंद ठेऊन मोर्चात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तीन गावात बंद आंदोलनतीन गावातील पर्यटन व्यावसायिकांनी एकत्र येऊन हा बंद पुकारला. या बंदमुळे तीन्ही महत्वाच्या गावांमध्ये पर्यटन व्यवसाय बंद होता.