शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन 'सिंदूर'नंतर 'ब्रह्मोस मिसाइल'ची मागणी वाढली, १४-१५ देश रांगा लावून उभे!
2
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
3
आधी हातोड्याने पतीवर वार केले, मग धारदार शस्त्र वापरून संपवून टाकलं! पत्नीचा क्रूरपणा ऐकून हादरून जाल
4
लठ्ठपणाविरोधात सरकार आखतंय नवा प्लॅन; खाद्यप्रेमींसाठी IMP बातमी, समोसा, जिलेबी खाताय तर...
5
'जर तुम्ही रशियाकडे...', उत्तर कोरियाच्या किम जोंग यांचा अमेरिका, जपानला इशारा
6
पैसे बुडणार नाहीत, तर वाढतील; ‘हे’ आहेत गुंतवणूकीचे सुरक्षित पर्याय, गुंतवू शकता तुम्ही पैसा
7
निमिषा प्रियाचा जीव वाचू शकेल? फाशीला उरलेत अवघे २ दिवस! सुप्रीम कोर्टात आज होणार मोठी सुनावणी 
8
Pune Crime: पुण्यात तरुणाची हत्या; पानटपरीवर वाद, थेट कोयताच घातला डोक्यात, हाताची बोटेही तुटली 
9
कराड 'आरटीओ'ला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका, 'त्या' बुलेटचे रजिस्टर करण्याचे आदेश; नेमकं प्रकरण काय?
10
Air India Plane Crash : क्रॅश झालेल्या एअर इंडियाच्या विमानाचे टीसीएम दोनदा बदलले होते; इंधन नियंत्रण स्विच याचाच एक भाग
11
दुबई अन् नेपाळपर्यंत पसरलं होतं छांगुर बाबाचं जाळं; 'नीतू' करायची डील! कोण आहे 'ही' व्यक्ती?   
12
'दुआ में जरुर याद रखना' मृत्यूपूर्वी अभिनेत्रीचे अखेरचे शब्द; Voice Note पहिल्यांदाच समोर
13
...मग तेव्हा उद्धव ठाकरे २५ मिनिटं मोदीजींचे बूट चाटत होते का?; रामदास कदमांचा राऊतांवर हल्ला
14
बंगालच्या उपसागरात १६ दिवस चिनी जहाज लपून बसलेले; ओळख सांगणारी यंत्रणा चालू-बंद करत होते...
15
आजचे राशीभविष्य, १४ जुलै २०२५: नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल, भविष्यात लाभ होतील
16
इकडे चौकशी सुरू; तिकडे बाळाने मिटले डोळे, अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच रडलेले...
17
संपादकीय: गूढ उकलले की वाढले? एअर इंडियाच्या पायलटांवर संशय, बोईंगला वाचविण्याचे प्रयत्न...
18
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
19
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
20
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार

तारकर्ली, देवबागमध्ये पर्यटन बंद

By admin | Updated: January 7, 2016 00:39 IST

‘सीआरझेड’खाली कारवाई : मालवणात आज तहसील कार्यालयावर मोर्चा

मालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनाचे प्रमुख केंद्र असलेल्या देवबाग, तारकर्ली, वायरी या गावातील बांधकामांवर सीआरझेड कायद्याच्या नावाखाली महसूल विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे. या विरोधात या तीनही गावातील पर्यटन व्यावसायिकांनी दि. ६ व ७ जानेवारी रोजी आपले पर्यटन व्यवसाय बंद ठेवत निषेध नोंदवला आहे. या बंदला बोटिंग व जलक्रीडा व्यावसायिकांनी पाठिंबा दिला आहे. गुरुवारी सकाळी तहसील कार्यालयावर मोर्चा काढत हे पर्यटन व्यावसायिक आपली भूमिका शासन दरबारी मांडणार आहेत. काँग्रेस पक्षाने या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देत सहभागी होत असल्याचे स्पष्ट केले आहे. तारकर्ली, देवबाग, वायरी या गावातील बांधकामावर सीआरझेड कायद्याच्या नावाखाली कारवाई करण्यात येत आहे. याविरोधात पर्यटन व्यावसायिकांनी बुधवारी बंद पुकारला होता. दरम्यान, तारकर्ली येथील टीटीडीएस या पर्यटन संस्थेने या आंदोलनात आपण सहभागी नसलो तरी आपली कोणतीही विरोधी भूमिका नाही, असे स्पष्ट केले. त्यामुळे बुधवारी किनारपट्टीवर जलक्रीडा व्यवसाय पूर्णपणे बंद होता. मात्र, हॉटेलमध्ये आलेले काही पर्यटक बोटिंगचा आनंद घेत असल्याने हा बंद संमिश्र असल्याची स्थितीही दिसत होती. मात्र, तीनही गावच्या समन्वय समितीच्या वतीने अध्यक्ष बाबू बिरमोळे यांनी बुधवारचा बंद ९० टक्क्यांहून अधिक यशस्वी झाल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)बाबा मोंडकर : कागदपत्रांची पूर्तता...तारकर्ली पर्यटन व्यवसायिक संस्था या बंद आंदोलनात सहभागी झाली नाही. शासनाकडून स्थानिकांचे व्यवसाय, बांधकामे नियमित करण्यासाठी सहकार्य मिळत आहे. व्यावसायिकांनी आवश्यक ती कागदपत्रे व अन्य परवाना पूर्तता केल्यास निश्चितच त्याचा फायदा होणार आहे, असे सांगत संस्थेचे अध्यक्ष बाबा मोंडकर यांनी आम्हा व्यावसायिकांच्या अन्य काही मागण्या आहेत, त्या शासन दरबारी पोहचवण्यासाठी बंद मध्ये सहभागी नसलो तरी व्यवसायिक प्रशासनाकडे निवेदन देतील, असे सांगितले.पर्यटन व्यवसायिकांच्या बंदमध्ये काहींनी सहभाग न दर्शविल्याने या व्यावसायिकांमध्ये फूट पडल्याचे चित्र होते. मात्र, बोटिंग व जलक्रीडा व्यावसायिकांनी या बंदला पाठींबा देत तसेच आपलेही प्रश्न शासन दरबारी मांडण्यासाठी बंदमध्ये सहभाग घेतला. उद्या गुरुवारी पर्यटन व्यवसाय १०० टक्के बंद ठेऊन मोर्चात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तीन गावात बंद आंदोलनतीन गावातील पर्यटन व्यावसायिकांनी एकत्र येऊन हा बंद पुकारला. या बंदमुळे तीन्ही महत्वाच्या गावांमध्ये पर्यटन व्यवसाय बंद होता.