शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
2
India Pakistan War : भारताने लाहोर ते कराचीपर्यंतच्या ९ शहरांवर इस्रायली ड्रोनने हल्ला केला; घाबरलेल्या पाकिस्तानचा दावा
3
Karachi Bakery: हैदराबादच्या प्रसिद्ध कराची बेकरीविरुद्ध निदर्शने, सर्व दुकानांवर लावला तिरंगा झेंडा...
4
भारताच्या ड्रोन हल्ल्यात हाफिज सईदचा सहकारी ठार, तर मुलगा बेपत्ता
5
भारताचं 'सुदर्शन चक्र' लय भारी! पाकच्या क्षेपणास्त्रांचा 'खेळ खल्लास' करणाऱ्या S-400 ची पॉवरफुल्ल स्टोरी
6
कधी काजल, कधी स्वीटी; २१ वर्षीय गुलशानाचं १२ वेळा लग्न; तरुणांना ‘अशी’ अडकवायची जाळ्यात
7
बारामतीच्या महिलेचे पाचोऱ्याच्या तरुणावर जडलं प्रेम; पण असं काही घडलं की तिघांनी केली आत्महत्या
8
घराजवळ बाँबचा आवाज ऐकल्याने पाकिस्तानी अभिनेता बिथरला, म्हणाला- "आम्हाला शांतता हवी आहे..."
9
Pakistan Video: "इतके नालायक आहेत, ड्रोन हल्ला, पण सांगताहेत की वीज कोसळली", पाकिस्तानी नागरिकाचा व्हिडीओ व्हायरल
10
Operation Sindoor: भारतीय लष्कराचा पाकमध्ये आणखी एक 'धमाका'; लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम केली उद्ध्वस्त
11
भारत-पाकिस्तान तणावामुळे बाजारात दबाव; मिडकॅप-स्मॉलकॅप शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण
12
ऑपरेशन सिंदूरः भारताने पाकिस्तानला दाखवलेत 'तारे', वाहतील का युद्धाचे वारे?; ग्रहस्थिती काय सांगतेय बघा!
13
'ऑपरेशन सिंदूर' भारतीय शौर्याचे प्रतीक, हा शब्द आता.. ट्रेडमार्कवर रिलायन्सचे स्पष्टीकरण
14
"दहशतवादी हल्ल्यामुळे आम्हाला प्रत्युत्तर द्यावं लागलं!"; इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांसमोर एस जयशंकर काय म्हणाले?
15
India pakistan : दोन राज्यात पोलिसांच्या सुट्ट्या रद्द, शाळा बंद; राजस्थान, पंजाबमध्ये हायअलर्ट
16
चहा, डायपर ते सॅनिटायझिंग.. डाबर अनेक प्रॉडक्ट बंद करणार; सीईओंनी स्वतः सांगितलं कारण
17
Sophia Qureshi: बहीण असावी तर अशी! “मी तिच्याद्वारे माझं स्वप्न जगतेय”, कर्नल सोफिया यांचा कुटुंबीयांना अभिमान
18
भारत-पाक तणावादरम्यान सोन्या-चांदीचे दर आपटले; झाली मोठी घसरण, काय आहेत नवे दर?
19
Sanjay Singh : “पाकिस्तानने अमृतसर, होशियारपूरमध्ये क्षेपणास्त्रे डागण्याचा प्रयत्न केला, जो सैन्याने हाणून पाडला”

तारकर्ली, देवबागमध्ये पर्यटन बंद

By admin | Updated: January 7, 2016 00:39 IST

‘सीआरझेड’खाली कारवाई : मालवणात आज तहसील कार्यालयावर मोर्चा

मालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनाचे प्रमुख केंद्र असलेल्या देवबाग, तारकर्ली, वायरी या गावातील बांधकामांवर सीआरझेड कायद्याच्या नावाखाली महसूल विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे. या विरोधात या तीनही गावातील पर्यटन व्यावसायिकांनी दि. ६ व ७ जानेवारी रोजी आपले पर्यटन व्यवसाय बंद ठेवत निषेध नोंदवला आहे. या बंदला बोटिंग व जलक्रीडा व्यावसायिकांनी पाठिंबा दिला आहे. गुरुवारी सकाळी तहसील कार्यालयावर मोर्चा काढत हे पर्यटन व्यावसायिक आपली भूमिका शासन दरबारी मांडणार आहेत. काँग्रेस पक्षाने या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देत सहभागी होत असल्याचे स्पष्ट केले आहे. तारकर्ली, देवबाग, वायरी या गावातील बांधकामावर सीआरझेड कायद्याच्या नावाखाली कारवाई करण्यात येत आहे. याविरोधात पर्यटन व्यावसायिकांनी बुधवारी बंद पुकारला होता. दरम्यान, तारकर्ली येथील टीटीडीएस या पर्यटन संस्थेने या आंदोलनात आपण सहभागी नसलो तरी आपली कोणतीही विरोधी भूमिका नाही, असे स्पष्ट केले. त्यामुळे बुधवारी किनारपट्टीवर जलक्रीडा व्यवसाय पूर्णपणे बंद होता. मात्र, हॉटेलमध्ये आलेले काही पर्यटक बोटिंगचा आनंद घेत असल्याने हा बंद संमिश्र असल्याची स्थितीही दिसत होती. मात्र, तीनही गावच्या समन्वय समितीच्या वतीने अध्यक्ष बाबू बिरमोळे यांनी बुधवारचा बंद ९० टक्क्यांहून अधिक यशस्वी झाल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)बाबा मोंडकर : कागदपत्रांची पूर्तता...तारकर्ली पर्यटन व्यवसायिक संस्था या बंद आंदोलनात सहभागी झाली नाही. शासनाकडून स्थानिकांचे व्यवसाय, बांधकामे नियमित करण्यासाठी सहकार्य मिळत आहे. व्यावसायिकांनी आवश्यक ती कागदपत्रे व अन्य परवाना पूर्तता केल्यास निश्चितच त्याचा फायदा होणार आहे, असे सांगत संस्थेचे अध्यक्ष बाबा मोंडकर यांनी आम्हा व्यावसायिकांच्या अन्य काही मागण्या आहेत, त्या शासन दरबारी पोहचवण्यासाठी बंद मध्ये सहभागी नसलो तरी व्यवसायिक प्रशासनाकडे निवेदन देतील, असे सांगितले.पर्यटन व्यवसायिकांच्या बंदमध्ये काहींनी सहभाग न दर्शविल्याने या व्यावसायिकांमध्ये फूट पडल्याचे चित्र होते. मात्र, बोटिंग व जलक्रीडा व्यावसायिकांनी या बंदला पाठींबा देत तसेच आपलेही प्रश्न शासन दरबारी मांडण्यासाठी बंदमध्ये सहभाग घेतला. उद्या गुरुवारी पर्यटन व्यवसाय १०० टक्के बंद ठेऊन मोर्चात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तीन गावात बंद आंदोलनतीन गावातील पर्यटन व्यावसायिकांनी एकत्र येऊन हा बंद पुकारला. या बंदमुळे तीन्ही महत्वाच्या गावांमध्ये पर्यटन व्यवसाय बंद होता.