शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

शौचालयाचे पाणी नदीत; संताप व्यक्त

By admin | Updated: November 14, 2014 23:18 IST

अजमल पटेल : गोवळकोटमधील प्रकार

चिपळूण : शहरातील गोवळकोट भागातील सार्वजनिक शौचालयाचे पाणी नदीत सोडले जात असल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे. याबाबत नगर परिषद प्रशासनाने योग्य ती खबरदारी घ्यावी, अशी मागणी माजी नगराध्यक्ष अजमल पटेल यांनी केली आहे. सर्वत्र स्वच्छता मोहिमेचा नारा दिला जात आहे. विविध खात्यांचे अधिकारीही हातामध्ये झाडू घेऊ लागले आहेत. प्रत्येकाने आरोग्याची काळजी घेणे काळाची गरज आहे. गोवळकोट व अन्य भागात सध्या मोठमोठ्या इमारतींची बांधकामे सुरु आहेत. यासाठी ठेकेदार परप्रांतीय मजूर घेऊन ही कामे करीत आहेत. ठेकेदाराने संबंधित कामगारांचा शौचालयाचा प्रश्न सोडविणे महत्त्वाचे आहे. मात्र, बांधकामावर काम करणारे काही कामगार सकाळच्या वेळी गोवळकोट जॅकवेल परिसरात शौचास बसतात. तसेच काही मटण, मच्छी विक्रेते नदीपात्रातच कोंबड्यांचे अवशेष टाकत असल्याचे चित्र आहे. या भागात असणाऱ्या सार्वजनिक शौचालयाचे पाणी नदीपात्रातच सोडण्यात आले असल्याने संभाव्य आरोग्यास या पाण्यामुळे धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती पटेल यांनी व्यक्त केली. घर तेथे शौचालय अशी शासनाची भूमिका असून, बांधकाम करणारे व्यावसायिक कामगारांसाठी स्वतंत्र शौचालयाची व्यवस्था करीत नसल्याची स्थिती दिसून येत आहे. या प्रकारामुळे अस्वच्छता वाढली आहे. सार्वजनिक शौचालयांबाबत नगर परिषद प्रशासनाने योग्य ती दखल घेणे गरजेचे आहे. याबाबत प्रांताधिकारी रवींद्र हजारे यांना लवकरच निवेदन देणार असल्याचे पटेल यांनी सांगितले. नगर परिषद प्रशासन व विविध खात्याचे अधिकारी सध्या स्वच्छता मोहिमेतून पुढे येत आहेत. मात्र, नागरिकांनीही या मोहिमेमध्ये सक्रिय सहभाग घेणे गरजेचे आहे, असे पटेल यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. (वार्ताहर)नागरिक संतापले...चिपळूण शहरातील गोवळकोट या गजबजलेल्या भागात सार्वजनिक शौचालयाचे पाणी नदीत सोडल्याने नागरिक संताप व्यक्त करीत आहेत. त्यामुळे आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने पालिका प्रशासनाने त्याची गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. या प्रकाराने नागरिक संतप्त झाले असून, प्रशासनाला जाब विचारणार आहेत.सार्वजनिक शौचालयाचे पाणी नदीत. माजी नगराध्यक्ष अजमल पटेल झाले आक्रमक.पालिका प्रशासनावर हल्लाबोल. स्वच्छता मोहीम सुरू असताना या प्रकाराने नागरिक संतप्त. आरोग्यास धोका निर्माण झाल्यास पालिका जबाबदार. स्वच्छतेसाठी प्रयत्न आवश्यक, प्रशासनावर जबाबदारी मोठी.