शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

कंपनीविरोधातील सुनावणी आज

By admin | Updated: April 6, 2016 00:25 IST

आशापुराचा फैसला : न्यायालयाने दिलेला कालावधी संपला

दापोली : आशापुरा मायनिंगमुळे प्रदूषण होऊन पर्यावरणाची हानी होत असल्याची तक्रार काही ग्रामस्थांनी दिली होती. त्यामुळे कंपनी तात्पुरती बंद ठेवण्याचे आदेश प्रांताधिकारी जयराम देशपांडे यांनी दिले होते. या निर्णयावर आज सुनावणी होती. परंतु आजचा निर्णय उद्यावर गेल्याने उद्या होणाऱ्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.आशापुरा मायनिंग विरोधातील २८ एप्रिल रोजी झालेल्या सुनावणीत कंपनीविरोधात आपल्याला पार्टी करुन घेण्याचा अर्ज वंदे मातरम प्रतिष्ठान या संस्थेने दिला होता. हा अर्ज आज प्रांताधिकाऱ्यांनी फेटाळून लावला. वंदे मातरम प्रतिष्ठान ही संस्था बाहेरची आहे. त्यांचा स्थानिक प्रकरणाशी कसलाही संबंध नाही. त्यामुळे त्यांना पार्टी करण्यात येऊ नये, अशी कंपनीच्या वकिलांनी हरकत घेतल्याने प्रांतांनी दावा फेटाळून लावला.केळशी पंचक्रोशीत अनेक ग्रामस्थांनी जनसुनावणीला हजेरी लावली होती. आज निर्णय अपेक्षित होता. परंतु तक्रारदारांच्या वकिलांनी एक दिवसाची मुदतवाढ मागितली. त्यामुळे आजची सुनावणी उद्यावर गेली. उद्या होणाऱ्या सुनावणीनंतरच कंपनीचे भवितव्य ठरणार आहे. दावा फेटाळला असला तरीही आम्ही कायमस्वरुपी कंपनीला विरोध करणाऱ्याच्या बाजूने राहू, असे वंदे मातरमचे आबास पाटील म्हणाले. यावेळी आशापुरा कंपनी विरोधातील विरोध एकीकडे पाहायला मिळत आहे तर दुसरीकडे कंपनी लवकर सुरु व्हावी. कंपनी बंद असल्यामुळे कामगार व लघु उद्योजकांवर उपासमारीची वेळ येऊ लागल्याने दि. ४ एप्रिल रोजी हजारो कामगार व लघु उद्योजकांनी प्रांत कार्यालयावर मोर्चा काढून कंपनी लवकर सुरु करण्यासंदर्भात निवेदन दिले होते. (प्रतिनिधी)कंपनीला विरोध करणाऱ्या कार्यकर्त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या येऊ लागल्या आहेत. परंतु आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत, आम्ही जनतेच्या हितासाठी रस्त्यावर उतरलोय.- केदार साठे3आशापुरा मायनिंगमुळे वायू प्रदूषण, ध्वनी प्रदूषण होत असल्याची काही ग्रामस्थांची तक्रार आहे. परंतु गेली ८ वर्षे मायनिंग क्षेत्रात काम करणाऱ्या कंपनीला आताच विरोध का केला जातोय, याचे सत्य उद्याच्या सुनावणीमुळे उजेडात येईल.1आशापुरा मायनिंग कंपनीमुळे किती प्रमाणात प्रदूषण होऊन पर्यावरणाचा ऱ्हास होतोय. याबद्दलचा अहवाल प्रदूषण नियंत्रण मंडळाने सादर केला आहे. या अहवालानुसार कंपनीला होणारा विरोध खरोखर योग्य आहे की, सूडबुद्धीने कंपनीला टार्गेट केलं जातंय हे सिद्ध होणार आहे.2महसूल विभागाचा अहवाल यापूर्वीच प्रांत कार्यालयाकडे सादर झाला आहे. त्यामुळे वन विभाग, महसूल विभाग, पर्यावरण विभाग यांच्या अहवालावर सुनावणीची दिशा ठरणार आहे. या अहवालातील नमूद मुद्द्यांवरच आशापुरा कंपनीचे भवितव्य ठरणार आहे.