शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाड्यातील ८५५० पैकी १५१६ गावांतच सापडल्या ‘कुणबी’च्या नोंदी
2
स्वस्ताईचा गुड ॲण्ड सिम्पल टॅक्स! जीएसटीचे ५% आणि १८% असे दोनच दर; विमा पॉलिसींना करसूट, सिमेंटवर १८% जीएसटी
3
Video: पैज लागली, 500 रुपयांसाठी तरुणाची यमुनेच्या पुरात उडी; नंतर बघा काय घडलं?
4
Hyundai ने लॉन्च केले Creta Electric चे नवीन व्हेरिएंट; 510 KM रेंज अन् किंमत फक्त इतकी...
5
घर खरेदीदारांसाठी मोठी भेट! 'या' वस्तूवरील जीएसटीमध्ये मोठी कपात; घर बांधणेही होणार स्वस्त
6
Yamuna Flood: यमुनेचा रौद्रवतार, दिल्लीच्या नाकातोंडात पाणी! घरं पाण्याखाली, रस्तेही बंद; थरकाप उडवणारी दृश्ये
7
३० वर्षांनी गुरु-शनि त्रिदशांश योग: ८ राशींना फायदा, पैसाच पैसा, लाभच लाभ; शुभ-कल्याण घडेल!
8
८ वर्षांत तिप्पट...GST मधून सरकारची बंपर कमाई; नवीन सुधारणांमुळे मोठा फटका बसणार?
9
"तुझ्या चरणी येऊ न शकलेल्या...", भूषण प्रधानने 'लालबागचा राजा'कडे काय मागितलं? होतंय कौतुक
10
चातुर्मासातील पहिला शुक्र प्रदोष: सुख-सुबत्ता-वैभव, ‘असे’ करा व्रत; मंत्र जपाने शिव प्रसन्न!
11
अटीतटीचा सामना, मैदानात वातावरण तापलं, हाणामारीपर्यंत गेलं, मग भज्जीने असं केलं होतं शोएब अख्तरचं गर्वहरण
12
‘खर्रा मिळणार असेल तरच शाळेत येईन’; म्हणणारा योगेश झाला फासेपारधी समाजातील पहिला सेट उत्तीर्ण विद्यार्थी
13
कामगारांच्या कामाचे ९ चे झाले १२ तास, पण ओव्हरटाइमचा मिळणार जादा मोबदला; रजेचेही निकष बदलले
14
अमिताभ बच्चन आणि क्रिती सनॉन यांच्यानंतर कार्तिक आर्यननंही अलिबागमध्ये खरेदी केली जमीन; किती कोटींना झाली डील?
15
२२ षटकारांची आतषबाजी, ठोकल्या ३६७ धावा; धडाकेबाज खेळीमुळे टी२० संघात मिळालं स्थान
16
श्रेयस, यशस्वी अन् शार्दुल... टीम इंडियाच्या स्टार त्रिकुटाच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष
17
"मुंबईत कधी आपलेपणा वाटला नाही...", असं का म्हणाले मनोज वाजपेयी? शहर सोडायचा आला विचार
18
GST Rate Cut: पहिले महिन्याला भरत होता ₹१७,७०० चा हेल्थ इन्शुरन्स प्रीमिअम, आता किती वाचतील; ३६ हजारांच्या टीव्हीवर किती बचत?
19
सर्वसामान्यांना दिलासा देणारे GST चे नवीन दर कधी लागू होणार? अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी दिले उत्तर
20
GST दरातील कपातीनंतर शेअर बाजार सुस्साट; Sensex ५४७ अंकांनी वधारला, या शेअर्समध्ये जोरदार तेजी

मासेमारी हंगामाची आज सांगता

By admin | Updated: May 31, 2016 00:33 IST

नौका सुरक्षित स्थळी : १ जून ते ३१ जुलै बंदी कालावधी

मालवण : देशाच्या पश्चिम किनारपट्टीवरील मासेमारी हंगामाची सांगता मंगळवार ३१ मे रोजी होणार आहे. गतवर्षी शासनाच्या नव्या धोरणानुसार संपूर्ण पश्चिम किनारपट्टीवरील राज्यात १ जून ते ३१ जुलै या ६१ दिवसाच्या मासेमारी बंदी कालावधीला बुधवार १ जूनपासून सुरुवात होणार आहे. किनारपट्टीवरील मासेमारीच्या बहुतांश मोठ्या नौका किनाऱ्यावर सुरक्षित स्थळी आणून ठेवल्या आहेत. तर उर्वरित नौकाही किनाऱ्यावर आणण्याचे काम सुरु आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विचार करता १२१ किमी लांबीच्या किनारपट्टी लाभली आहे. यात मालवण, देवगड व वेंगुर्ले हे तीन तालुके थेट मासेमारी व्यवसायावर अवलंबून आहेत. गतवर्षी शासन निर्णय होण्याअगोदर महाराष्ट्रात १५ आॅगस्ट अथवा नारळी पौर्णिमा या कालावधीपर्यंत मासेमारी बंदी कायम असायची. मात्र महाराष्ट्राच्या लगत असलेल्या गोवा, कर्नाटक, केरळ व गुजरात या राज्यांचा मासेमारी बंदी कालावधी लवकर संपायचा. त्यामुळे बोटींची घुसखोरी होऊन महाराष्ट्राच्या किनाऱ्यावरील मासळीची लयलूट व्हायची. त्यामुळे शासनाकडे किनारपट्टीवर एकाचवेळी मासेमारी बंदी असावी, याबाबत मागणी करण्यात आली. त्यानुसार १ जून ते ३१ जुलै मासेमारी बंदी कालावधी निश्चित करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)आश्वासक सुरूवात : संघर्ष आणि दुष्काळाचा सामनागतवर्षी १ आॅगस्टपासूनच मासेमारीला सुरुवात झाली. सुरुवातीला मोरी, सुरमई, पापलेट या मोठ्या मासळीसह पारंपरिक मच्छिमारांच्या जाळीत तारलीही मिळाली. मात्र मत्स्य हंगामाच्या आश्वासक सुरुवातीनंतर मत्स्य उत्पादन घटले. अनधिकृत मासेमारी, परराज्यातील हायस्पीड मासेमारी ही आव्हाने झेलणाऱ्या मच्छिमारांना आचरा येथील संघर्षालाही सामोरे जावे लागले. त्यात पारंपरिक मच्छिमारांच्या दृष्टीने पर्ससीन मासेमारीवर निर्बंध घालताना नव्या परवान्यांना बंदी घालण्याचा दिलासादायक निर्णय राज्य शासनाने दिला. असे असले तरी मत्स्य दुष्काळाच्या झळा मत्स्य हंगामाच्या अखेरीपर्यंत कायम राहिल्या.बंदी कालावधी ९0 दिवसांचा असावा : तोरसकरगेल्या अनेक वषार्पासून देशभरात सर्वत्र एकाच वेळी मासेमारी बंदी कालावधी असावा यासाठी प्रयत्न सुरु होते. वेगवेगळ्या बंदी कालावधीमुळे मासेमारांची घुसखोरी होऊन बंदी क्षेत्रात मासेमारी व्हायची. मत्स्य बीज नाश होण्याबरोबरच मच्छिमारांत वादही निर्माण व्हायचे. मत्स्य प्रजननासाठी एक महिन्याची अधिक वाढ अपेक्षित आहे. हा कालावधी ९० दिवसाचा व्हावा यासाठी नॅशनल फिश वर्कर्स फोरम, महाराष्ट्र मच्छिमार कृती समिती, मालवण तालुका श्रमिक मच्छिमार संघ व महाराष्ट्रातील मच्छिमार संघटना यापुढेही प्रयत्नशील आहेत, अशी माहिती भाजपा मच्छिमार सेलचे जिल्हाध्यक्ष रविकिरण तोरसकर यांनी दिली आहे.