शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार का? कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण
3
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
4
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
5
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
6
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
7
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
8
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
9
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
10
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
11
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
12
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
13
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
14
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
15
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
16
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
17
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
18
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
19
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
20
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत

मासेमारी हंगामाची आज सांगता

By admin | Updated: May 31, 2016 00:33 IST

नौका सुरक्षित स्थळी : १ जून ते ३१ जुलै बंदी कालावधी

मालवण : देशाच्या पश्चिम किनारपट्टीवरील मासेमारी हंगामाची सांगता मंगळवार ३१ मे रोजी होणार आहे. गतवर्षी शासनाच्या नव्या धोरणानुसार संपूर्ण पश्चिम किनारपट्टीवरील राज्यात १ जून ते ३१ जुलै या ६१ दिवसाच्या मासेमारी बंदी कालावधीला बुधवार १ जूनपासून सुरुवात होणार आहे. किनारपट्टीवरील मासेमारीच्या बहुतांश मोठ्या नौका किनाऱ्यावर सुरक्षित स्थळी आणून ठेवल्या आहेत. तर उर्वरित नौकाही किनाऱ्यावर आणण्याचे काम सुरु आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विचार करता १२१ किमी लांबीच्या किनारपट्टी लाभली आहे. यात मालवण, देवगड व वेंगुर्ले हे तीन तालुके थेट मासेमारी व्यवसायावर अवलंबून आहेत. गतवर्षी शासन निर्णय होण्याअगोदर महाराष्ट्रात १५ आॅगस्ट अथवा नारळी पौर्णिमा या कालावधीपर्यंत मासेमारी बंदी कायम असायची. मात्र महाराष्ट्राच्या लगत असलेल्या गोवा, कर्नाटक, केरळ व गुजरात या राज्यांचा मासेमारी बंदी कालावधी लवकर संपायचा. त्यामुळे बोटींची घुसखोरी होऊन महाराष्ट्राच्या किनाऱ्यावरील मासळीची लयलूट व्हायची. त्यामुळे शासनाकडे किनारपट्टीवर एकाचवेळी मासेमारी बंदी असावी, याबाबत मागणी करण्यात आली. त्यानुसार १ जून ते ३१ जुलै मासेमारी बंदी कालावधी निश्चित करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)आश्वासक सुरूवात : संघर्ष आणि दुष्काळाचा सामनागतवर्षी १ आॅगस्टपासूनच मासेमारीला सुरुवात झाली. सुरुवातीला मोरी, सुरमई, पापलेट या मोठ्या मासळीसह पारंपरिक मच्छिमारांच्या जाळीत तारलीही मिळाली. मात्र मत्स्य हंगामाच्या आश्वासक सुरुवातीनंतर मत्स्य उत्पादन घटले. अनधिकृत मासेमारी, परराज्यातील हायस्पीड मासेमारी ही आव्हाने झेलणाऱ्या मच्छिमारांना आचरा येथील संघर्षालाही सामोरे जावे लागले. त्यात पारंपरिक मच्छिमारांच्या दृष्टीने पर्ससीन मासेमारीवर निर्बंध घालताना नव्या परवान्यांना बंदी घालण्याचा दिलासादायक निर्णय राज्य शासनाने दिला. असे असले तरी मत्स्य दुष्काळाच्या झळा मत्स्य हंगामाच्या अखेरीपर्यंत कायम राहिल्या.बंदी कालावधी ९0 दिवसांचा असावा : तोरसकरगेल्या अनेक वषार्पासून देशभरात सर्वत्र एकाच वेळी मासेमारी बंदी कालावधी असावा यासाठी प्रयत्न सुरु होते. वेगवेगळ्या बंदी कालावधीमुळे मासेमारांची घुसखोरी होऊन बंदी क्षेत्रात मासेमारी व्हायची. मत्स्य बीज नाश होण्याबरोबरच मच्छिमारांत वादही निर्माण व्हायचे. मत्स्य प्रजननासाठी एक महिन्याची अधिक वाढ अपेक्षित आहे. हा कालावधी ९० दिवसाचा व्हावा यासाठी नॅशनल फिश वर्कर्स फोरम, महाराष्ट्र मच्छिमार कृती समिती, मालवण तालुका श्रमिक मच्छिमार संघ व महाराष्ट्रातील मच्छिमार संघटना यापुढेही प्रयत्नशील आहेत, अशी माहिती भाजपा मच्छिमार सेलचे जिल्हाध्यक्ष रविकिरण तोरसकर यांनी दिली आहे.