शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
4
महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
5
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकमा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
6
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
7
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
8
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
9
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
10
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
11
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
12
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
13
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
14
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
15
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
16
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
17
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
18
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
19
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
20
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं

सिंधुदुर्गात आज मराठ्यांची जिद्द दिसणार

By admin | Updated: October 23, 2016 00:33 IST

एक मराठा लाख मराठाचा प्रत्यय येणार : ४ लाख मराठ बांधवांच्या उपस्थितीचा अंदाज

कणकवली : आजपर्यंत मराठा समाज पेटून उठला नव्हता. आता मात्र जिद्दीने एकवटला आहे. मराठ्यांची ही जिद्द रविवारी २३ आॅक्टोबर रोजी सिंधुदुर्गनगरीत दिसणार आहे. या मराठा क्रांती मूक मोर्चात सिंधुदुर्ग जिल्ह्यातून सुमारे ४ लाख लोक उपस्थित राहणार आहेत, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे. ओरोस फाटा येथे हे सर्व मराठा बांधव एकत्र येऊन ओरोस येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून या मूक मोर्चाची सुरुवात होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठा समाजाला संघटित करू मराठ्यांची फौज तयार केली. शूर मावळ्यांना लढाईचे प्रशिक्षण देऊन मुस्लिम राज्यकर्त्यांना सळो की पळो करून सोडले. मुस्लिम जुलूमशाहीविरोधात छत्रपती शिवाजी महाराज लढले. आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. ही क्रांती रायगड किल्ल्यावर झाली.मराठा समाजाला शूरविरांची परंपरा आहे. हा मराठा समाज गेली ६0 वर्षे अन्याय सहन करीत आला आहे. पण हा अन्याय किती दिवस सहन करायचा यालाही मर्यादा आहेत. त्यामुळे मराठ्यांचा सहनशीलतेचा अंत आता संपलेला आहे. त्यामुळे आता मराठा समाज जिद्द हरणार नाही. ज्या प्रमाणे शिवाजी महाराजांनी मुस्लिम राज्यकर्त्यांना महाराष्ट्रातून हाकलून लावले व हिेंदवी स्वराज्याची स्थापना केली त्याचप्रमाणे आता मराठा समाज सरकारला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथील मराठा समाजाच्या एका अल्पवयीन मुलीवर जो अत्याचार झाला व तिचा खून करण्यात आला त्या आरोपींना कडक शिक्षा करावी, अ‍ॅट्रॉसिटी कायद्यात बदल करावा, शेतमालाला हमीभाव मिळण्यासाठी स्वामिनाथन समितीच्या शिफारशी तातडीने अंमलात आणाव्या, मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण मिळावे व कायद्यात बदल करावा, छत्रपती शिवाजी महाराजांचे अरबी समुद्रातील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकाचे काम तातडीने सुरू करावे आदी २0 मागण्या करण्यात आल्या आहेत. ज्या ज्या वेळी मराठा समाजावर अन्याय झाला त्या त्या वेळी मराठ्यांचे कुलदैवत नेहमीच मराठ्यांच्या मदतीला धाऊन आले आहे. मुंबईत मराठा समाजावर ज्या वेळी अन्याय झाला त्या वेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना करून मराठा समाजाला जागृत केले. मराठी तरुणांमध्ये लढण्याची ताकद निर्माण केली. तरुणांच्या चेहऱ्यावर तेज आले आणि सर्व तरुण फौज शिवसेनेत दाखल झाली आणि १९९५ साली विधानसभेवर भगवा फडकला. मराठांची ही परंपरा आहे. न्न्यायदेवता नेहमीच मराठ्यांच्या बाजूने उभी राहिली आहे. (वार्ताहर)