शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्गात आज मराठ्यांची जिद्द दिसणार

By admin | Updated: October 23, 2016 00:33 IST

एक मराठा लाख मराठाचा प्रत्यय येणार : ४ लाख मराठ बांधवांच्या उपस्थितीचा अंदाज

कणकवली : आजपर्यंत मराठा समाज पेटून उठला नव्हता. आता मात्र जिद्दीने एकवटला आहे. मराठ्यांची ही जिद्द रविवारी २३ आॅक्टोबर रोजी सिंधुदुर्गनगरीत दिसणार आहे. या मराठा क्रांती मूक मोर्चात सिंधुदुर्ग जिल्ह्यातून सुमारे ४ लाख लोक उपस्थित राहणार आहेत, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे. ओरोस फाटा येथे हे सर्व मराठा बांधव एकत्र येऊन ओरोस येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून या मूक मोर्चाची सुरुवात होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठा समाजाला संघटित करू मराठ्यांची फौज तयार केली. शूर मावळ्यांना लढाईचे प्रशिक्षण देऊन मुस्लिम राज्यकर्त्यांना सळो की पळो करून सोडले. मुस्लिम जुलूमशाहीविरोधात छत्रपती शिवाजी महाराज लढले. आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. ही क्रांती रायगड किल्ल्यावर झाली.मराठा समाजाला शूरविरांची परंपरा आहे. हा मराठा समाज गेली ६0 वर्षे अन्याय सहन करीत आला आहे. पण हा अन्याय किती दिवस सहन करायचा यालाही मर्यादा आहेत. त्यामुळे मराठ्यांचा सहनशीलतेचा अंत आता संपलेला आहे. त्यामुळे आता मराठा समाज जिद्द हरणार नाही. ज्या प्रमाणे शिवाजी महाराजांनी मुस्लिम राज्यकर्त्यांना महाराष्ट्रातून हाकलून लावले व हिेंदवी स्वराज्याची स्थापना केली त्याचप्रमाणे आता मराठा समाज सरकारला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथील मराठा समाजाच्या एका अल्पवयीन मुलीवर जो अत्याचार झाला व तिचा खून करण्यात आला त्या आरोपींना कडक शिक्षा करावी, अ‍ॅट्रॉसिटी कायद्यात बदल करावा, शेतमालाला हमीभाव मिळण्यासाठी स्वामिनाथन समितीच्या शिफारशी तातडीने अंमलात आणाव्या, मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण मिळावे व कायद्यात बदल करावा, छत्रपती शिवाजी महाराजांचे अरबी समुद्रातील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकाचे काम तातडीने सुरू करावे आदी २0 मागण्या करण्यात आल्या आहेत. ज्या ज्या वेळी मराठा समाजावर अन्याय झाला त्या त्या वेळी मराठ्यांचे कुलदैवत नेहमीच मराठ्यांच्या मदतीला धाऊन आले आहे. मुंबईत मराठा समाजावर ज्या वेळी अन्याय झाला त्या वेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना करून मराठा समाजाला जागृत केले. मराठी तरुणांमध्ये लढण्याची ताकद निर्माण केली. तरुणांच्या चेहऱ्यावर तेज आले आणि सर्व तरुण फौज शिवसेनेत दाखल झाली आणि १९९५ साली विधानसभेवर भगवा फडकला. मराठांची ही परंपरा आहे. न्न्यायदेवता नेहमीच मराठ्यांच्या बाजूने उभी राहिली आहे. (वार्ताहर)