शहरं
Join us  
Trending Stories
1
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
2
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
3
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
4
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
5
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
6
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
7
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
8
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
9
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
10
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
11
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
12
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
13
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
14
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
15
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...
16
धक्कादायक! लिव्ह-इन पार्टनरची केली हत्या, सिग्नलवर गाडी थांबवली, पेट्रोल ओतून पेटवून दिले
17
‘मतचोरीचा अणुबॉम्ब टाकला, आता हायड्रोजन बॉम्ब येणार, त्यानंतर नरेंद्र मोदी...', राहुल गांधींचा निशाणा
18
याला म्हणतात स्टॉक...! झटक्यात ₹३७०० नं वधारला शेअर; एकाच दिवसात गुंतवणूकदारांना केलं मालामाल, आपल्याकडे आहे का?
19
टाटा-महिंद्रामुळे बाजारात पुन्हा तेजी! सेन्सेक्स-निफ्टीची मोठी उसळी; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
'पापा कहते हैं' फेम अभिनेत्रीने सोडली Googleची नोकरी; आता बनली पब्लिसिस ग्रुपची सीईओ

‘त्यावेळी’ संसदेत सुवर्णकाळ होता

By admin | Updated: January 19, 2015 00:22 IST

सुनीलकुमार लवटे : सावंतवाडीत बॅ. नाथ पै स्मृतिदिन कार्यक्रम

सावंतवाडी : बॅ. नाथ पै यांच्या काळात विरोधी पक्षनेता व सत्ताधारी नेता या दोघांमध्ये वैर नसून मतभेद होते. यामुळे एकमतांनी ठराव मंजूर व्हायचे. असा सुवर्णकाळ संसदेत पहायला मिळायचा. त्या काळाचे शिल्पकार बॅ. नाथ पै होते, असे प्रतिपादन साहित्यिक सुनीलकुमार लवटे यांनी केले. बॅ. नाथ पै यांच्या स्मृतिदिनानिमित्त श्रीराम वाचन मंदिर येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी डॉ. जी. ए. बुवा, प्राध्यापक डॉ. एल. हिंगमिरे, सचिव रमेश बोंद्रे आदी उपस्थित होते. यानंतर साहित्यिक सुनीलकुमार लवटे म्हणाले, बॅ. नाथ पै यांच्या स्वप्नामध्ये कोकणचा विकास होता. ते स्वप्न त्यांनी सत्य केले व कोकणचा कॅलिफोर्निया केला. बॅ. नाथ पै कोकणला लाभले, हे कोकणचे सौभाग्य आहे. सन १९५०-६० सालचा कोकण आज त्यांच्या नेतृत्वामुळे समृद्ध कोकण झाला आहे. कोकणात मोठ्या प्रमाणात जे दारिद्र्य होते, ते दूरही झाले आहे. त्याकाळात नेतेमंडळी शाळेला भेट देतेवेळी भाताची पेज वगैरे घेऊन जात होते. आता मात्र तो काळ बदलला आहे, असेही लवटे म्हणाले. कोकण हा जागतिक पातळीवर पोहोचावा, यासाठी त्यांनी कोकणातून रेल्वे आणण्यासाठीच प्रयत्न केले. कोकण हा भाग रेल्वेला जोडला पाहिजे, असेही त्यांचे स्वप्न होते. बॅ. पै यांनी संसदेचा एकही दिवस वाया घालविला नाही. नवे लोकप्रतिनिधित्व घडविण्याची त्यांची ताकद होती. यानंतर त्यांची जागा मधु दंडवते यांनी घेतली. दिल्लीची रेल्वे कोकणाला जोडली व आता ती केरळपर्यंत पोहोचली आहे, असे लवटे यांनी सांगितले. बॅ. नाथ पै हे जागतिक स्तरावर नेतृत्व करणारे होते. ते नाथ पै म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या निधनाने संपूर्ण देश पोरखा झाला आहे. संसदेत बॅ. नाथ पै बोलायचे, तेव्हा पं. जवाहरलाल नेहरूही त्यांचे भाषण ऐकायचे, असे रमेश बोंद्रे म्हणाले. यावेळी बॅ. नाथ पै यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात साहित्यिक सुनीलकुमार लवटे यांच्या हस्ते करण्यात आले. (प्रतिनिधी)स्वप्न अधुरे..!शेतकऱ्यांची वकिली १९६७ मध्ये बॅ. नाथ पै यांनी केली. दक्षिण महाराष्ट्र, उत्तर कर्नाटकमधील कालव्यांचे पाणी शेतामध्ये आणायचे, हे त्यांचे अधुरे स्वप्न होते. कालवे शेतांना जोडल्यास खरोखरच विकास होईल व तेव्हाच बॅ. नाथ पै यांचे स्वप्न पूर्ण होईल व कोकणचा खऱ्या अर्थाने कॅलिफोर्निया होईल, असे यावेळी साहित्यिक सुनीलकुमार लवटे यांनी सांगितले.