शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

कृषी पंपाच्या सव्वा तीन हजार जोडण्या

By admin | Updated: June 27, 2015 00:16 IST

महावितरण : उद्दीष्टापेक्षा अधिक जोडण्या देत कामावर छाप, शेतकऱ्यात समाधान

रत्नागिरी : महावितरण कंपनीकडून गेल्या सहा वर्षात कृषीपंपाच्या ३३८० वीज जोडण्यात देण्यात आल्या आहेत. २००८मध्ये ११८३८ इतक्या कृषी पंपाच्या वीज जोडण्या होत्या. २०१५मध्ये १५२१८ इतक्या जोडण्या झाल्या आहेत. २०१०पासून महावितरण कंपनीने दरवर्षी ५०० जोडण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. मात्र, त्यापेक्षा अधिक जोडण्या दिल्या आहेत.कोकणात भात लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे. जिल्ह्यात प्रामुख्याने ७० हजार ३३४ हेक्टर क्षेत्रावर भातपीक घेण्यात येते. भाताबरोबर नागली तसेच कडधान्य, तृणधान्य व भाजीपाला लागवड करण्यात येते. जिल्ह्यात एकूण ६५ हजार १०९ हेक्टर क्षेत्रावर आंबा पिकाची लागवड करण्यात आली असून, पैकी ५८ हजार ८३७ हेक्टर क्षेत्र उत्पादनक्षम आहे. तसेच ९१ हजार ५३० हेक्टर क्षेत्रावर काजूची लागवड करण्यात आली असून, त्यापैकी ८३ हजार २९२ हेक्टर क्षेत्र उत्पादनक्षम आहे. एकूणच भातशेतीबरोबर बागायतीकडे शेतकऱ्यांचा कल अधिक आहे. आंबा, काजूबरोबर कलिंगड, केळी, पपई यांसारखी शेतीही करण्यात येत आहे. कोकण भौगोलिकदृष्ट्या डोंगरदऱ्यांमध्ये वसलेले असल्यामुळे शेतीसाठी लागणाऱ्या पाण्यासाठी पंप बसवण्यात येतात. कृषी विभागाकडून पंप अनुदानावर देण्यात येत असून, महावितरणकडून जोडण्या देण्यात येतात. गेल्या सहा वर्षात कृषीपंप जोडण्यांमध्ये ३३८० इतकी वाढ झाली असली तरी ५०० पेक्षा अधिक वीज जोडण्या प्रलंबित आहेत. जिल्ह्यातील कातळभागातही माती विकत आणून बागायती फुलवण्यात आली आहे. कातळावर हजारो रुपये खर्चून विहिरी पाडण्यात आल्या आहेत. परंतु अशा ठिकाणी अद्याप कृषी पंपाच्या जोडण्या देण्यास महावितरण असमर्थ ठरले आहे. कातळ भागातील वीजजोडण्यासाठी ठेकेदार उपलब्ध होत नसल्याची समस्या महावितरणपुढे उभी ठाकली आहे. त्यामुळे कृषी विभागाकडून कृषी पंप देऊनसुध्दा त्याला जोडण्या मिळत नसल्यामुळे पंप गंजत असल्याची ओरड सर्वत्र सुरू आहे. ठेकेदाराची समस्या महावितरण मांडत असले तरी त्यावर पर्याय काढणे तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे ५००पेक्षा अधिक जोडण्या प्रलंबित असल्या तरी दरवर्षी ५०० जोडण्याचे उद्दिष्ट महावितरणने पार केले आहे. जिल्ह्याच्या कृषीपंपाची आकडेवारी पाहता रत्नागिरी तालुक्यात सर्वाधिक कृषी पंप आहेत. त्यापाठोपाठ दापोली व गुहागर तालुक्यात पंप आहेत. कृषी पंपाच्या आकडेवारीत रत्नागिरी मागोमाग दापोली व गुहागरची आघाडी आहे. या साऱ्यामध्ये महावितरणची भूमिका महत्वाची ठरली आहे. (प्रतिनिधी)गेल्या सहा वर्षात महावितरणने तालुकानिहाय दिलेल्या जोडण्यातालुका२००८ पर्यंत जोडण्या२००९२०१०२०११२०१२२०१३२०१४२०१५एकूणचिपळूण९०७६१४९४०७०७२८५७५१३५७गुहागर१७५५६९४४६२८९४७१२१६७२२५०खेड३१६९९२१२७२१३३२३४५९दापोली१६९७५३६१६१९५१२११३२५९२२७९मंडणगड५८१३८१३१४३४२१२१३५७५७रत्नागिरी३४३९१००८५८५१८३१२६१७०१४६४१७८संगमेश्वर८१७२३३२३२३९४२४६४४१०२४राजापूर१४२५११५७५७७०७३९५७११७७०लांजा९०११६४३४२२१२२२०९१११४४एकूण११८३८३८०३९३४१४६२८५४५७२३६११५२१८