शहरं
Join us  
Trending Stories
1
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
2
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
3
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
4
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
5
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
6
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
7
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
8
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
9
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
10
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
11
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
12
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
13
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
14
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
15
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
16
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
17
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
18
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
19
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
20
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
Daily Top 2Weekly Top 5

कृषी पंपाच्या सव्वा तीन हजार जोडण्या

By admin | Updated: June 27, 2015 00:16 IST

महावितरण : उद्दीष्टापेक्षा अधिक जोडण्या देत कामावर छाप, शेतकऱ्यात समाधान

रत्नागिरी : महावितरण कंपनीकडून गेल्या सहा वर्षात कृषीपंपाच्या ३३८० वीज जोडण्यात देण्यात आल्या आहेत. २००८मध्ये ११८३८ इतक्या कृषी पंपाच्या वीज जोडण्या होत्या. २०१५मध्ये १५२१८ इतक्या जोडण्या झाल्या आहेत. २०१०पासून महावितरण कंपनीने दरवर्षी ५०० जोडण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. मात्र, त्यापेक्षा अधिक जोडण्या दिल्या आहेत.कोकणात भात लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे. जिल्ह्यात प्रामुख्याने ७० हजार ३३४ हेक्टर क्षेत्रावर भातपीक घेण्यात येते. भाताबरोबर नागली तसेच कडधान्य, तृणधान्य व भाजीपाला लागवड करण्यात येते. जिल्ह्यात एकूण ६५ हजार १०९ हेक्टर क्षेत्रावर आंबा पिकाची लागवड करण्यात आली असून, पैकी ५८ हजार ८३७ हेक्टर क्षेत्र उत्पादनक्षम आहे. तसेच ९१ हजार ५३० हेक्टर क्षेत्रावर काजूची लागवड करण्यात आली असून, त्यापैकी ८३ हजार २९२ हेक्टर क्षेत्र उत्पादनक्षम आहे. एकूणच भातशेतीबरोबर बागायतीकडे शेतकऱ्यांचा कल अधिक आहे. आंबा, काजूबरोबर कलिंगड, केळी, पपई यांसारखी शेतीही करण्यात येत आहे. कोकण भौगोलिकदृष्ट्या डोंगरदऱ्यांमध्ये वसलेले असल्यामुळे शेतीसाठी लागणाऱ्या पाण्यासाठी पंप बसवण्यात येतात. कृषी विभागाकडून पंप अनुदानावर देण्यात येत असून, महावितरणकडून जोडण्या देण्यात येतात. गेल्या सहा वर्षात कृषीपंप जोडण्यांमध्ये ३३८० इतकी वाढ झाली असली तरी ५०० पेक्षा अधिक वीज जोडण्या प्रलंबित आहेत. जिल्ह्यातील कातळभागातही माती विकत आणून बागायती फुलवण्यात आली आहे. कातळावर हजारो रुपये खर्चून विहिरी पाडण्यात आल्या आहेत. परंतु अशा ठिकाणी अद्याप कृषी पंपाच्या जोडण्या देण्यास महावितरण असमर्थ ठरले आहे. कातळ भागातील वीजजोडण्यासाठी ठेकेदार उपलब्ध होत नसल्याची समस्या महावितरणपुढे उभी ठाकली आहे. त्यामुळे कृषी विभागाकडून कृषी पंप देऊनसुध्दा त्याला जोडण्या मिळत नसल्यामुळे पंप गंजत असल्याची ओरड सर्वत्र सुरू आहे. ठेकेदाराची समस्या महावितरण मांडत असले तरी त्यावर पर्याय काढणे तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे ५००पेक्षा अधिक जोडण्या प्रलंबित असल्या तरी दरवर्षी ५०० जोडण्याचे उद्दिष्ट महावितरणने पार केले आहे. जिल्ह्याच्या कृषीपंपाची आकडेवारी पाहता रत्नागिरी तालुक्यात सर्वाधिक कृषी पंप आहेत. त्यापाठोपाठ दापोली व गुहागर तालुक्यात पंप आहेत. कृषी पंपाच्या आकडेवारीत रत्नागिरी मागोमाग दापोली व गुहागरची आघाडी आहे. या साऱ्यामध्ये महावितरणची भूमिका महत्वाची ठरली आहे. (प्रतिनिधी)गेल्या सहा वर्षात महावितरणने तालुकानिहाय दिलेल्या जोडण्यातालुका२००८ पर्यंत जोडण्या२००९२०१०२०११२०१२२०१३२०१४२०१५एकूणचिपळूण९०७६१४९४०७०७२८५७५१३५७गुहागर१७५५६९४४६२८९४७१२१६७२२५०खेड३१६९९२१२७२१३३२३४५९दापोली१६९७५३६१६१९५१२११३२५९२२७९मंडणगड५८१३८१३१४३४२१२१३५७५७रत्नागिरी३४३९१००८५८५१८३१२६१७०१४६४१७८संगमेश्वर८१७२३३२३२३९४२४६४४१०२४राजापूर१४२५११५७५७७०७३९५७११७७०लांजा९०११६४३४२२१२२२०९१११४४एकूण११८३८३८०३९३४१४६२८५४५७२३६११५२१८