शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
2
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
3
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
4
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
5
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
6
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
7
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
8
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
9
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
10
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
11
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
12
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
13
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
14
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
15
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
16
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
17
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
18
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
19
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
20
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी

कृषी पंपाच्या सव्वा तीन हजार जोडण्या

By admin | Updated: June 27, 2015 00:16 IST

महावितरण : उद्दीष्टापेक्षा अधिक जोडण्या देत कामावर छाप, शेतकऱ्यात समाधान

रत्नागिरी : महावितरण कंपनीकडून गेल्या सहा वर्षात कृषीपंपाच्या ३३८० वीज जोडण्यात देण्यात आल्या आहेत. २००८मध्ये ११८३८ इतक्या कृषी पंपाच्या वीज जोडण्या होत्या. २०१५मध्ये १५२१८ इतक्या जोडण्या झाल्या आहेत. २०१०पासून महावितरण कंपनीने दरवर्षी ५०० जोडण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. मात्र, त्यापेक्षा अधिक जोडण्या दिल्या आहेत.कोकणात भात लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे. जिल्ह्यात प्रामुख्याने ७० हजार ३३४ हेक्टर क्षेत्रावर भातपीक घेण्यात येते. भाताबरोबर नागली तसेच कडधान्य, तृणधान्य व भाजीपाला लागवड करण्यात येते. जिल्ह्यात एकूण ६५ हजार १०९ हेक्टर क्षेत्रावर आंबा पिकाची लागवड करण्यात आली असून, पैकी ५८ हजार ८३७ हेक्टर क्षेत्र उत्पादनक्षम आहे. तसेच ९१ हजार ५३० हेक्टर क्षेत्रावर काजूची लागवड करण्यात आली असून, त्यापैकी ८३ हजार २९२ हेक्टर क्षेत्र उत्पादनक्षम आहे. एकूणच भातशेतीबरोबर बागायतीकडे शेतकऱ्यांचा कल अधिक आहे. आंबा, काजूबरोबर कलिंगड, केळी, पपई यांसारखी शेतीही करण्यात येत आहे. कोकण भौगोलिकदृष्ट्या डोंगरदऱ्यांमध्ये वसलेले असल्यामुळे शेतीसाठी लागणाऱ्या पाण्यासाठी पंप बसवण्यात येतात. कृषी विभागाकडून पंप अनुदानावर देण्यात येत असून, महावितरणकडून जोडण्या देण्यात येतात. गेल्या सहा वर्षात कृषीपंप जोडण्यांमध्ये ३३८० इतकी वाढ झाली असली तरी ५०० पेक्षा अधिक वीज जोडण्या प्रलंबित आहेत. जिल्ह्यातील कातळभागातही माती विकत आणून बागायती फुलवण्यात आली आहे. कातळावर हजारो रुपये खर्चून विहिरी पाडण्यात आल्या आहेत. परंतु अशा ठिकाणी अद्याप कृषी पंपाच्या जोडण्या देण्यास महावितरण असमर्थ ठरले आहे. कातळ भागातील वीजजोडण्यासाठी ठेकेदार उपलब्ध होत नसल्याची समस्या महावितरणपुढे उभी ठाकली आहे. त्यामुळे कृषी विभागाकडून कृषी पंप देऊनसुध्दा त्याला जोडण्या मिळत नसल्यामुळे पंप गंजत असल्याची ओरड सर्वत्र सुरू आहे. ठेकेदाराची समस्या महावितरण मांडत असले तरी त्यावर पर्याय काढणे तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे ५००पेक्षा अधिक जोडण्या प्रलंबित असल्या तरी दरवर्षी ५०० जोडण्याचे उद्दिष्ट महावितरणने पार केले आहे. जिल्ह्याच्या कृषीपंपाची आकडेवारी पाहता रत्नागिरी तालुक्यात सर्वाधिक कृषी पंप आहेत. त्यापाठोपाठ दापोली व गुहागर तालुक्यात पंप आहेत. कृषी पंपाच्या आकडेवारीत रत्नागिरी मागोमाग दापोली व गुहागरची आघाडी आहे. या साऱ्यामध्ये महावितरणची भूमिका महत्वाची ठरली आहे. (प्रतिनिधी)गेल्या सहा वर्षात महावितरणने तालुकानिहाय दिलेल्या जोडण्यातालुका२००८ पर्यंत जोडण्या२००९२०१०२०११२०१२२०१३२०१४२०१५एकूणचिपळूण९०७६१४९४०७०७२८५७५१३५७गुहागर१७५५६९४४६२८९४७१२१६७२२५०खेड३१६९९२१२७२१३३२३४५९दापोली१६९७५३६१६१९५१२११३२५९२२७९मंडणगड५८१३८१३१४३४२१२१३५७५७रत्नागिरी३४३९१००८५८५१८३१२६१७०१४६४१७८संगमेश्वर८१७२३३२३२३९४२४६४४१०२४राजापूर१४२५११५७५७७०७३९५७११७७०लांजा९०११६४३४२२१२२२०९१११४४एकूण११८३८३८०३९३४१४६२८५४५७२३६११५२१८