शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
3
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
4
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
5
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
6
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
7
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
8
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
9
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
10
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
11
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
12
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
13
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
14
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
15
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
16
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
17
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
18
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
19
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
20
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नव्या नगरपंचायती हजारो कुळांच्या मुळावर

By admin | Updated: September 18, 2015 23:15 IST

आणखी एक अन्याय : नव्या बदलांमुळे कुळांच्या हक्कावर गदा

शोभना कांबळे-रत्नागिरी  -शासनाने बेदखल कुळांच्या अनेक वर्षांच्या समस्या संपवण्याच्या दृष्टीने मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम १९४८ अंतर्गत सुधारणा अधिनियम लागू करून त्यांना मालकी हक्क मिळवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र, या कायद्याने ग्रामीण भागातील कुळांनाच कूळहक्क शाबित करता येतो. नगरपरिषद अथवा नगरपंचायतीच्या क्षेत्रात येणाऱ्या कुळांसाठी तशी कायद्यात तरतूद नाही. त्यामुळे जिल्ह्यात नव्याने निर्माण झालेल्या या चार नगरपंचायतींच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या कुळांना आता नव्या समस्येला सामोरे जावे लागणार आहे.जिल्ह्यात सुमारे तीन लाख कुळवहिवाटदार आहेत. या बेदखल कुळांना तसेच कुळवहिवाटदारांना आपला हक्क शाबीत करण्यात यावा, त्यांना या जमिनीच्या विक्रीबाबत अधिकार मिळावेत, यासाठी शासनाने मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम १९४८ मध्ये सुधारणा करून तशी तरतूद केली आहे. शासनाच्या या कायद्याने ग्रामीण भागातील कुळांनाच कूळहक्क शाबीत करता येतो. नगरपरिषद अथवा नगरपंचायतीच्या क्षेत्रात येणाऱ्या कुळांसाठी तशी कायद्यात तरतूद नाही. त्यामुळे यावर्षी निर्माण झालेल्या या चार नगरपंचायतींच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या कुळांना आता नव्या समस्येला सामोरे जावे लागणार आहे. जिल्ह्यात नव्याने स्थापन झालेल्या लांजा, देवरूख, गुहागर आणि आता होऊ घातलेल्या मंडणगड या नगरपंचायतींच्या क्षेत्रात येणाऱ्या कुळांना आता आपल्या मालकी हक्कापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. गुहागरमधील असगोली, लांजा शहर, गुहागर शहर, देवरूख शहर तसेच नव्याने नगरपंचायत होऊ घातलेले मंडणगड शहर हे पूर्वी ग्रामीण भागात येत असल्याने येथील कुळांनी वहिवाट शाबीत करण्यासाठी प्रस्ताव दाखल केलेले आहेत. मात्र, या चारही शहरात नगरपंचायत झाल्याने आता ही शहरे ग्रामीण क्षेत्रात न येता नगरपंचायतीच्या शहर क्षेत्रात समाविष्ट झाली आहेत. साहजिकच या चारही शहरातील कूळवहिवाटदारांच्या मालकीची जमीनही आता नगरपंचायतीच्या क्षेत्रात येत असल्याने नगरपंचायतीच्या आकृतीबंधानुसार त्यावर कुळांना हक्क सांगता येणार नाही. त्यामुळे आता ही कुळे अडचणीत आली आहेत.गुहागरमधील असगोली हे गाव आता गुहागर नगरपंचायतीमध्ये समाविष्ट झाले आहे. याबाबत असगोलीतील कुळांनी कोकण आयुक्त राधेश्याम मोपेलवार यांच्या अध्यक्षतेखाली कोकणदौऱ्यावर आलेल्या समितीसमोर आपली ही व्यथा मांडली होती. ही नवीन समस्या निर्माण झाल्याने मोपेलवार यांनी ही समस्या शासनासमोर मांडून लवकरच तिची सोडवणूक करू, अशी ग्वाही दिली होती. मात्र, याबाबत कोणताच निर्णय अद्याप झालेला नसल्याने या कुळांच्या हक्कांबाबतचा निर्णय अजूनही अधांतरीच आहे. (प्रतिनिधी)कुळांच्या हक्काचा निर्णय अधांतरीरत्नागिरी, सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांसाठी मुंबई कूळवहिवाट व शेतजमीन अधिनियम १९४८ लागू करण्यात आला आहे. या कायद्यान्वये कुळांना ते वर्षानुवर्षे कसत असलेल्या जमिनी परत मिळण्याच्या आशा निर्माण झाल्या आहेत. कुळांची वहिवाट असली तरी त्यांना त्या जमीन विकताना अनेक अडचणी येत होत्या. मात्र, आता कूळ हक्काने मिळालेल्या जमिनीची विक्री जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीविना करता येणार आहे. त्यासाठी नजराणा भरणे गरजेचे आहे.या कायद्याने ग्रामीण भागातील कुळांनाच हक्क मिळाला आहे. मात्र, नगरपरिषद अथवा नगरपंचायतीच्या क्षेत्रात येणाऱ्या कुळांसाठी तशी कायद्यात तरतूद नाही. त्यामुळे यावर्षी निर्माण झालेल्या लांजा, गुहागर, देवरूख या तीन आणि अधिसूचना जारी झालेल्या मंडणगड या नगरपंचायतींच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या कुळांच्या हक्काबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.गुहागर नगरपंचायतीच्या कक्षेत असगोली हे गाव येत असल्याने या कायद्याने येथील कुळांसमोर ही समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे या कुळांनी कुळांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आॅगस्ट महिन्यात कोकण दौऱ्यावर आलेले आयुक्त राधेश्याम मोपेलवार यांच्यासमोर ही समस्या मांडली होती. ही नवीन समस्या निर्माण झाल्याने मोपेलवार यांनी शासनासमोर ही समस्या मांडून तिची सोडवणूक करण्याची ग्वाही दिली आहे. मात्र, याबाबत शासन निर्णय काय होईल, ही चिंता या कुळांना सतावत आहे.