शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
2
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
3
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
4
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
5
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
6
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
7
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
8
Jara Hatke: टक्कल पडू नये म्हणून 'या' मंदिरात देवाला अर्पण करतात केसांची बट
9
"चांगली कामगिरी करुनही टीम इंडियात निवड होत नसेल तर..." ईशान किशनने बोलून दाखवली मनातली गोष्ट
10
याला म्हणतात 'धुरंधर'...! या ₹2 च्या शेअरनं गुंतवणूकदारांचं नशीबच बदललं, 5 वर्षांत दिला 19000% चा परतावा
11
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
12
Viral Video: पाच वर्षाच्या चिमुकल्याला फुटबॉलप्रमाणे उडवलं, शेजाऱ्याचं अमानुष कृत्य, घटना कॅमेऱ्यात कैद!
13
Sonam Raghuvanshi : नवा ट्विस्ट! "मी राजाला मारलं नाही, राज माझा भाऊ..."; जामीन अर्जात काय म्हणाली सोनम रघुवंशी?
14
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
15
Kapil Dev On Gautam Gambhir : गौतम गंभीर कोच नव्हे मॅनेजर! कपिल देव यांनी संदर्भासह दिलं स्पष्टीकरण
16
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
17
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
18
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
19
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
Daily Top 2Weekly Top 5

हजारो आंबा-काजू कलमे भस्मसात

By admin | Updated: January 2, 2016 08:28 IST

लाखोंची हानी : नडगिवे, खारेपाटण परिसरात आगीचे तांडव

खारेपाटण : नडगिवे परिसरात शुक्रवारी दुपारी लागलेल्या आगीत सुमारे पाच किलोमीटर परिसरातील हजारो काजू, आंबा कलमे जळून खाक झाली. मोहोर येण्याच्या ऐन हंगामात लागलेल्या या आगीमुळे बागायतदारांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. आग लागलेला परिसर मनुष्यवस्तीपासून लांब असल्याने आग लागल्याचे सुरुवातीला लक्षातच आले नाही. सायंकाळपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले. खारेपाटण ते नडगिवे या परिसरात सुमारे पाच किलोमीटर अंतरात सुकलेल्या गवताने पेट घेतला. धुराचे लोट दिसल्यानंतर ग्रामस्थांची धावपळ उडाली. काजू, आंबा कलमे आगीच्या विळख्यात सापडल्याने बागायतदारांची गाळण उडाली. सर्वांनी धाव घेत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला; परंतु आग मोठ्या परिसरात पसरल्याने ग्रामस्थांना आंबा-काजू कलमे बेचिराख होताना पाहण्याशिवाय गत्यंतर नव्हते. आगीने अंबीचा माळ, आशियेचा टोना, वडाचा टोना, उंबरसखल, कोंडाचे सखल, डगरीचा आंबा, भिवारी सखल, कुंबीयाचा माळ या परिसरात सर्व भस्मसात केले. परिसरातील सुमारे १५ बागायतदारांच्या कलम बागा बेचिराख केल्या. दीपक भिकाजी चव्हाण यांची २०० काजू, १०० सागवान कलमे, दीपक जनार्दन मांजरेकर यांची १०० काजू, १०० सागवान व १० आंबा कलमे, सुदर्शन मांजरेकर यांची काजू आणि सागाची प्रत्येकी १०० कलमे, शशिकांत मांजरेकर यांची काजू, सागवान प्रत्येकी १०० कलमे, गणपत करंगुटकर यांची २०० काजू, १०० सागाची कलमे आणि पक्के बांधकाम केलेली खोपी, अहिल्या मांजरेकर यांची २०० काजू कलमे, सूर्यकांत मांजरेकर यांची १०० काजू कलमे, एकनाथ करंगुटकर यांची २०० काजू कलमे, प्रकाश शिर्सेकर यांची २०० काजू कलमे, मारुती शिर्सेकर यांची ५० काजू कलमे, हेमंत शिर्सेकर यांची काजू, सागाची प्रत्येकी १०० कलमे, चंद्रकांत मांजरेकर यांची १०० काजू कलमे, श्रीधर सावंत यांची ५०० काजू कलमे, सूर्यकांत मांजरेकर यांची साग, काजूची प्रत्येकी १०० कलमे जळून खाक झाली. या आगीमुळे आंबा-काजू उत्पादकांचे अतोनात नुकसान झाले आहे. (वार्ताहर)हातातोंडाशी आलेला घास हिरावलाआता काजू, आंब्याचा हंगाम काही दिवसांत सुरू होईल. सध्या काजू व आंब्याची कलमे मोहोरली आहेत. मात्र, अचानक लागलेल्या या आगीमुळे खारेपाटण, नडगिवे परिसरातील बागायतदारांच्या हातातोंडाशी आलेले पीक बहरायच्या आधीच नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली याबाबतचे कारण रात्री उशिरापर्यंत समजू शकले नाही.हुर्से-बाकाळेतही हजारो कलमे खाकराजापूर : राजापूर तालुक्यातील हुर्से-बाकाळे परिसरात शुक्रवारी सकाळपासून लागलेल्या आगीत हजारो कलमे बेचिराख झाली आहेत. सकाळी आग लागूनही कोणतीही शासकीय यंत्रणा सायंकाळपर्यंत न पोहोचल्याने या आगीचा भडका देवगडच्या दिश्ोने (सिंधुदुर्ग) सरकत आहे. रात्री उशिरापर्यंत ही आग आटोक्यात आली नव्हती. या आगीचा सर्वाधिक फटका पाच मोठ्या बागायतदारांसह अनेक छोट्या बागायतदारांनाही बसला आहे.शुक्रवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास हुर्से-बाकाळे येथे असलेल्या एका बागेला आग लागली. या आगीचे कारण समजू शकले नाही. सोसाट्याचा वारा असल्यामुळे ही आग भडकली व शेजारीच असलेल्या बागेपर्यंत पोहोचली. हळूहळू आगीचा भडका वाढला. ग्रामस्थांना याबाबतची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. याबाबत राजापूर तहसील कार्यालयालाही कळविण्यात आले .आपत्कालीन कक्षाकडून याबाबतची माहिती संबंधितांपर्यंत पोहोचणे आवश्यक होते; मात्र ती पोहोचली नाहीच उलट ज्यांना याबाबतची माहिती कळविण्यात आली होती ती यंत्रणाही रात्रीपर्यंत पोहोचली नाही. त्यामुळे भडकलेली आग आटोक्यात आणण्याचे काम माती टाकून तसेच फांद्यांच्या साहाय्याने सुरू होते. मात्र, त्याला मर्यादा पडत होत्या घटनेची माहिती मिळताच शिवसेनेचे शाखाप्रमुख राजेश कोंडेकर, मंगेश मांजरेकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. गावातील मोहन गावकर, एकनाथ गावकर, हरिश्चंद्र वाडेकर, शैलेश गावकर, रामचंद्र राऊत या बागायतदारांची शेकडो कलमे आगीत भस्मसात झाली आहेत. छोट्या बागायतदारांनाही या आगीचा फटका बसला आहे. रात्री उशिरापर्यंत ही आग पूर्णत: आटोक्यात आली नव्हती.(प्रतिनिधी)