शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs DC : दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकली; पण पावसाच्या बॅटिंगमुळे हैदराबाद फक्त बॉलिंग करून 'आउट'
2
"९० हजार सैनिकांचे पायजमे आजही तिथे टांगलेले आहेत’’, मुनीर आणि पाकिस्तानचं बलूच नेत्याकडून वस्रहरण   
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
4
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
5
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
6
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
7
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
8
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
9
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
10
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
11
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
12
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
13
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
14
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
15
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
16
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
17
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
18
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला
19
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास
20
फायद्याची गोष्ट! 'या' ३ गोष्टी फ्रिजमध्ये ठेवण्याची अजिबात करू नका चूक; कॅन्सरचा वाढेल धोका

चिपळूण तालुक्यातील मतिमंदांच्या निकोप वाढीसाठी आशेची जिद्द

By admin | Updated: August 8, 2014 00:42 IST

सामाजिक चळवळ : २६ वर्षांच्या अथक मेहेनतीनंतर रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर

राजेश कांबळे = अडरे चिपळूण तालुक्यातील बौद्धिकदृष्ट्या आव्हानात्मक असणाऱ्या विद्यार्थ्यांना विशेष शिक्षण आणि प्रशिक्षण देऊन समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे ध्येय घेऊन सुमती जांभेकर यांनी प्रा. इंदुमती पोळ यांच्या सहकार्याने २६ जानेवारी १९८८ रोजी जिद्द मतिमंद मुलांच्या शाळेची स्थापना केली. केवळ दोन विद्यार्थ्यांपासून सुरु करण्यात आलेल्या शाळेत आता ९५ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. २४ वर्षांच्या कालावधीत जिद्दचे मुख्याध्यापक प्रदीप दिवाडकर यांनी सातत्याने नवीन विचार प्रवाहांशी जुळवून घेत शाळेत अंतर्बाह्य विकास घडवला आहे. येथे प्रशिक्षण घेणारे विद्यार्थी समाजातील अन्य विद्यार्थ्यांप्रमाणेच त्यांच्या गुणवत्तेनुसार प्रगती करत आहेत. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी जिद्द सातत्याने नवनवीन शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडात्मक उपक्रम राबवत आहे. क्रीडा विभागात सुनील शिंदे, तर सांस्कृतिक विभागात उमेश कुचेकर यांनी खेळ व कला प्रकारात शाळेचे नाव राष्ट्रीय पातळीपर्यंत उंचावले आहे. जिद्द ही शासनमान्य अनुदानित शाळा असली तरी ४० विद्यार्थी संख्येला अनुदान मिळते. सध्या शाळेत ९५ विद्यार्थी आहेत. समाजातील अनेक दानशूर व्यक्ती, संस्था आर्थिक व वस्तुस्वरुप सहाय्य करुन आमचा भार हलका करण्याचा प्रयत्न करीत आहेत. शिक्षण घेतलेल्या १८ वर्षे पूर्ण झालेल्यांचे आर्थिक पुनर्वसन करणे, प्रशिक्षण देणे व समाजातील उत्पादनशील घटक बनवणे, हा या संस्थेचा हेतू आहे. १९९५ साली जिद्द उद्योग केंद्राची स्थापना करण्यात आली. उद्योग केंद्रात प्रामुख्याने विद्यार्थ्यांना विविध व्यवसायाचे प्रशिक्षण दिले जाते. या जोरावर जिद्द मतिमंद मुलांच्या शाळेतील १६ विद्यार्थ्यांचे पुनर्वसन करण्यात आले आहे. यातील काही विद्यार्थी कंपनीत, टेलरिंंगच्या दुकानात व क्लिनर म्हणून काम करीत आहेत. विद्यार्थ्यांची आवड, शारीरिक व मानसिक क्षमता लक्षात घेऊन त्यांना आकाशकंदील बनविणे, भेटकार्ड, उटणे, लिक्वीड सोप, फिनेल, नागपंचमीसाठी नाग, राख्या तयार करणे, लोकरीचे रुमाल बनवण्याचे प्रशिक्षण देऊन उत्पादन करण्यास शिकवले जाते. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाबरोबरच सामाजिक आणि मानसिक विकास व्हावा, यासाठी झटत आहेत.येथे येणाऱ्या मुलांना स्वत:विषयी अभिमान वाटावा, यासाठी ८ वर्षांपासून जिद्द शाळेत दर महिन्याला विद्यार्थ्यांचे वाढदिवस एकत्ररित्या साजरे केले जातात. विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, स्वाभिमान निर्माण व्हावा, उत्पादन वाढावे, यासाठी ना नफा ना तोटा या तत्त्वावर संस्थेने हा उपक्रम सुरु केला आहे. - सुमती जांभेकरसेक्रेटरी कोवॅस, चिपळूण