शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

राज्यकर्ते बदलले तरी समस्या ‘जैसे थे’

By admin | Updated: June 25, 2015 00:58 IST

राज ठाकरेंचा टोला : मच्छिमारांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न

देवगड : राज्य शासनाची इच्छाशक्ती प्रबळ नसल्याने विकासकामे करू शकत नाहीत. त्यांच्या या नाकर्तेपणामुळे राज्यकर्ते बदलले तरी जनतेच्या मागण्या व जनतेच्या समस्या अजूनही तडीस गेल्या नाहीत. कोकण किनारपट्टीवर परराज्यांतील पर्सनेट मच्छिमार घुसखोरी करून मच्छिमारी करीत आहेत. माझ्या पक्षाकडे एकहाती सत्ता द्या, परराज्यांतील मच्छिमारांची कोकण किनारपट्टीवर येण्याची हिंमतच होणार नाही, अशी ठाम ग्वाही मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी दिली. राज ठाकरे यांनी देवगड येथील शासकीय विश्रामगृह येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. मनसे नेते नितीन सरदेसाई, मनसे कामगार सेना सरचिटणीस शरद सावंत, मनसे सरचिटणीस अविनाश अभ्यंकर, मनविसे अध्यक्ष आदित्य शिरोडकर, कोकण संघटक परशुराम उपरकर, जिल्हा संपर्क अध्यक्ष चेतन कदम, ठाणे जिल्हा संपर्क अध्यक्ष सुधीर जाधव, जिल्हाध्यक्ष शैलेश भोगले यावेळी उपस्थित होते. जिल्हा दौऱ्याच्या सुरुवातीला त्यांनी कुणकेश्वर मंदिराला भेट देऊन श्री देव कुणकेश्वराचे दर्शन घेतले. यावेळी देवस्थान ट्रस्ट व कुणकेश्वर ग्रामपंचायतीच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर देवगड येथील स. ह. केळकर महाविद्यालय येथे भेट दिली. यावेळी मनविसेच्यावतीने त्यांचे कॉलेज प्रवेशद्वार येथे स्वागत करण्यात आले. शिक्षण प्रसारक मंडळ देवगडच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. शिक्षण प्रसारक मंडळ देवगडचे कार्यवाह प्रसाद पारकर यांनी या महाविद्यालयाच्यावतीने शाल व श्रीफळ देऊन राज ठाकरे यांचे स्वागत केले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष जनार्दन तेली, सहकार्यवाह प्रमोद नलावडे, संचालक चंद्रकांत पाळेकर, अमोल जामसंडेकर, आदी उपस्थित होते. देवगड तालुक्यात एकमेव वरिष्ठ महाविद्यालय असून, या महाविद्यालयामध्ये ग्रामीण भागातून प्रवेशासाठी अनेक विद्यार्थी येत असतात. मुंबई विद्यापीठाची विद्यार्थी संख्येची अट असल्याने काही विद्यार्थ्यांना प्रथम वर्ष वाणिज्य शाखेत प्रवेश मिळत नाही. यामुळे या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना प्रवेश मिळण्यासाठी विद्यार्थी संख्या वाढवून मिळावी, अशी मागणी अमोल जामसंडेकर यांनी राज ठाकरे यांच्याकडे केली. देवगड तालुक्यातील मच्छिमार संघटनेचे नेते भाई खोबरेकर, चंद्रकांत पाळेकर, जगन्नाथ कोयंडे, द्विजकांत कोयंडे, ज्ञानेश्वर खवळे यांनी राज ठाकरे यांची भेट घेऊन मच्छिमारांच्या समस्या मांडल्या. आंबा बागायतदारांच्यावतीने सुधीर जोशी यांनी आंब्याला हमीभाव मिळावा, आंबा विक्री केंद्र सुरू करण्यात यावे, आंबा पीक कर्जावरील व्याज माफ करावे या प्रमुख मागण्या राज ठाकरे यांच्याकडे केल्या. पत्रकारांशी संवाद साधताना ठाकरे म्हणाले की, माझा संपूर्ण कोकण दौरा हा पक्ष संघटनेच्या दृष्टिकोनातून असून, जिल्ह्या-जिल्ह्यांमध्ये पक्ष संघटना मजबूत करण्याकडे भर देण्यात येणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पक्ष संघटनेला भरारी घेण्यासाठी कार्यकर्त्यांशी हितगूज करून त्यांना मार्गदर्शन करून पक्ष संघटना वाढीसाठी माझे प्रयत्न असणार आहेत. (प्रतिनिधी) राज ठाकरे-नारायण राणे भेट कणकवलीतील नियोजित कार्यक्रम आटोपल्यानंतर राज ठाकरे यांनी ओम गणेश बंगल्यावर दाखल झालेल्या माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची भेट घेतली. तेथे उभयतात जवळपास पंधरा मिनिटे चर्चा झाली. यावेळी आमदार नीतेश राणे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतीश सावंत उपस्थित होते. चहापान झाल्यानंतर राज ठाकरे हे बंगल्यावरून निघाले.