शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
3
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
4
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
5
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
6
मेहुण्याचा जाच आणि भावाचा राग! दारू पाजली अन् सपासप केले वार; वादाचं कारण ऐकून होईल संताप
7
घटस्फोटानंतर मुलांपासून दूर झाली अभिनेत्री, पतीने ख्रिसमसलाही भेटू दिलं नाही; म्हणाली...
8
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
9
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
10
'धुरंधर'च्या FA9LA गाण्यावर स्वत:च्याच लग्नात नाचला मराठी अभिनेता, सगळे बघतच राहिले, व्हिडीओ व्हायरल
11
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
12
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
13
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
14
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
15
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
16
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
18
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
19
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
20
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ शिक्षण संस्थांची चौकशी करावी

By admin | Updated: August 8, 2016 23:36 IST

ई.बी.सी. सवलत प्रक्रिया : सत्यशोधक विद्यार्थी संघटनेची मागणी

वैभववाडी : जिल्ह्यातील अनेक शिक्षण संस्था कष्टकरी, गरिबांच्या पाल्यांना शासनाच्या ई.बी.सी. सवलतीपासून वंचित ठेवत आहेत. शिक्षण शुल्काच्या नावाखाली बेकायदेशीरपणे मोठ्या रकमा वसूल करीत आहेत. त्यामुळे गरिबांची मुले आर्थिक परिस्थितीअभावी शिक्षण प्रवाहातून बाहेर फेकली जात आहेत. या प्रकाराला शासकीय अधिकारीही जबाबदार आहेत. त्यामुळे शाळा, महाविद्यालयांमध्ये चालू वर्षी ईबीसी सवलतीची प्रक्रिया पूर्ण न करणाऱ्या शिक्षण संस्थांची चौकशी करावी, अशी मागणी सत्यशोधक विद्यार्थी संघटनेने निवेदनाद्वारे केली आहे. सत्यशोधक विद्यार्थी संघटनेने तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्रातील आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या, दीड लाख वार्षिक उत्पन्न असलेल्या विविध घटकांच्या पाल्यांना मोफत शिक्षणाचा कायदा १९५८ पासून अमलात आहे. यानुसार विद्यार्थ्यांचे शिक्षण शुल्क सरकारच्या तिजोरीतून महाविद्यालयांना दिले जाते. त्यामुळे बहुजन समाजातील अनेक पिढ्या शिक्षण प्रवाहात सामील होऊ शकल्या. परंतु, ईबीसी सवलतीबाबतीत जिल्ह्यातील सद्य:स्थिती भयावह आहे. संस्थाचालक, अधिकाऱ्यांच्या युतीमुळे ईबीसी सवलत मिळत नसल्याने आणि शिक्षण शुल्काच्या नावाखाली पैसे देणे शक्य होत नसल्याने विद्यार्थी शिक्षण अर्धवट सोडून देत आहेत. याचा गांभीर्याने विचार करून चालू शैक्षणिक वर्षासाठी जिल्ह्यातील ईबीसी सवलत पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज त्वरित भरण्याची कार्यवाही सुरू करावी. तसेच संस्थांनी घेतलेले शिक्षण शुल्क परत करावे, अशी मागणी संघटनेने केली आहे. (प्रतिनिधी) संस्थाचालक-अधिकाऱ्यांचे लागेबांधे जिल्ह्यात काही संस्थाचालक आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांचे लागेबांधे आहेत. त्यामुळे गेल्या काही वर्षांत अनेक महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांकडून बेकायदा रक्कम घेता यावी, यासाठी ईबीसी सवलतीचे अर्ज भरून देण्याची प्रक्रिया थांबवली आहे. ही प्रक्रिया पूर्णपणे थांबल्यामुळे अनुदानित व विनाअनुदानित महाविद्यालयांतून शिक्षण शुल्कासह विविध कारणांसाठी वेगवेगळ्या पावत्या देऊन, तर काही वेळेस पावती न देता मोठ्या रकमा वसूल केल्या जात आहेत. काही शासकीय अधिकारीही ईबीसी सवलतीची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करीत नाहीत.