शहरं
Join us  
Trending Stories
1
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
2
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
3
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
4
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
5
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित
6
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
7
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
8
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
9
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
11
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
12
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
13
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
14
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
15
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
16
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
17
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
18
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
19
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
20
नोकर भरतीचा गोंधळ आता तरी थांबणार का?; आता केरळच्या धर्तीवर होणार भरती प्रक्रिया

‘त्या’ शिक्षण संस्थांची चौकशी करावी

By admin | Updated: August 8, 2016 23:36 IST

ई.बी.सी. सवलत प्रक्रिया : सत्यशोधक विद्यार्थी संघटनेची मागणी

वैभववाडी : जिल्ह्यातील अनेक शिक्षण संस्था कष्टकरी, गरिबांच्या पाल्यांना शासनाच्या ई.बी.सी. सवलतीपासून वंचित ठेवत आहेत. शिक्षण शुल्काच्या नावाखाली बेकायदेशीरपणे मोठ्या रकमा वसूल करीत आहेत. त्यामुळे गरिबांची मुले आर्थिक परिस्थितीअभावी शिक्षण प्रवाहातून बाहेर फेकली जात आहेत. या प्रकाराला शासकीय अधिकारीही जबाबदार आहेत. त्यामुळे शाळा, महाविद्यालयांमध्ये चालू वर्षी ईबीसी सवलतीची प्रक्रिया पूर्ण न करणाऱ्या शिक्षण संस्थांची चौकशी करावी, अशी मागणी सत्यशोधक विद्यार्थी संघटनेने निवेदनाद्वारे केली आहे. सत्यशोधक विद्यार्थी संघटनेने तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्रातील आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या, दीड लाख वार्षिक उत्पन्न असलेल्या विविध घटकांच्या पाल्यांना मोफत शिक्षणाचा कायदा १९५८ पासून अमलात आहे. यानुसार विद्यार्थ्यांचे शिक्षण शुल्क सरकारच्या तिजोरीतून महाविद्यालयांना दिले जाते. त्यामुळे बहुजन समाजातील अनेक पिढ्या शिक्षण प्रवाहात सामील होऊ शकल्या. परंतु, ईबीसी सवलतीबाबतीत जिल्ह्यातील सद्य:स्थिती भयावह आहे. संस्थाचालक, अधिकाऱ्यांच्या युतीमुळे ईबीसी सवलत मिळत नसल्याने आणि शिक्षण शुल्काच्या नावाखाली पैसे देणे शक्य होत नसल्याने विद्यार्थी शिक्षण अर्धवट सोडून देत आहेत. याचा गांभीर्याने विचार करून चालू शैक्षणिक वर्षासाठी जिल्ह्यातील ईबीसी सवलत पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज त्वरित भरण्याची कार्यवाही सुरू करावी. तसेच संस्थांनी घेतलेले शिक्षण शुल्क परत करावे, अशी मागणी संघटनेने केली आहे. (प्रतिनिधी) संस्थाचालक-अधिकाऱ्यांचे लागेबांधे जिल्ह्यात काही संस्थाचालक आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांचे लागेबांधे आहेत. त्यामुळे गेल्या काही वर्षांत अनेक महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांकडून बेकायदा रक्कम घेता यावी, यासाठी ईबीसी सवलतीचे अर्ज भरून देण्याची प्रक्रिया थांबवली आहे. ही प्रक्रिया पूर्णपणे थांबल्यामुळे अनुदानित व विनाअनुदानित महाविद्यालयांतून शिक्षण शुल्कासह विविध कारणांसाठी वेगवेगळ्या पावत्या देऊन, तर काही वेळेस पावती न देता मोठ्या रकमा वसूल केल्या जात आहेत. काही शासकीय अधिकारीही ईबीसी सवलतीची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करीत नाहीत.