शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार हे महाराष्ट्रातील कट कारस्थानाचा कारखाना, त्यांच्यावर..."; गोपीचंद पडळकरांची बोचरी टीका
2
दिल्ली-मुंबई हल्ल्यात मसूद अजहरचा हात; जैश कमांडर इलियासचा आणखी एक कबुलीजबाब
3
साखर कारखान्याच्या टँकरमध्ये सापडले दोन तरुणांचे मृतदेह, गार्ड आणि अधिकारी गायब  
4
मंत्र्यांच्या बंगल्यांच्या दुरुस्तीसाठी कोटींची उधळपट्टी? कंत्राटदाराने २१ टक्के 'बिलो'ने काम घेतल्याने प्रकार उघडकीस
5
इनरवेअर बनवणाऱ्या शेअरचा जलवा! १०० स्टॉक्समधून एकाच महिन्यात २ लाख रुपयांची कमाई
6
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
7
"आमचे प्रेरणास्रोत..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींना इटलीच्या जॉर्जिया मेलोनी यांच्याकडून खास शुभेच्छा
8
अशक्यही होईल शक्य फक्त जिद्द हवी; १५ वर्षीय दृष्टीहीन करुणाने मिळवलं भारतीय संघात स्थान
9
५% व्याजावर ३ लाख रुपयांपर्यंतचं लोन; 'या' लोकांसाठी आहे मोदी सरकारचं मोठं गिफ्ट
10
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
11
कंपन्या जीएसटी रिकव्हरीच्या मुडमध्ये! २२ सप्टेंबरआधीच शाम्पू, साबण २० टक्के डिस्काऊंटवर विकू लागल्या... 
12
"महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना  हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्या’’, काँग्रेसची मागणी   
13
पत्नीचं अफेअर, पतीला लागली कुणकुण; जळफळाट झाला अन् खुनी खेळ रंगला!
14
सॉवरेन गोल्ड बॉंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! ६ वर्षांत १८३% परतावा, RBI ने जाहीर केली मुदतीपूर्वीची किंमत
15
WiFi कनेक्शन बंद केल्याने पोटच्या लेकानेच केली आईची हत्या; वडील म्हणाले, "मुलाला फाशी द्या"
16
"अमेरिका, युरोपमधून इस्लाम संपुष्टात आणणार’’, ट्रम्प समर्थक महिला नेत्याचं वादग्रस्त विधान  
17
आता जेवढा जीएसटी कमी झालाय ना, तेवढ्याला १९८६ मध्ये बुलेट मिळत होती...
18
बोल्ड लूकसह स्मार्ट फीचर्स! होन्डाची पहिली इलेक्ट्रिक बाईक लॉन्च, एका चार्जवर १३० किमी धावणार
19
लग्नाच्या अवघ्या २०व्या दिवशी नवरी झाली फरार; नवऱ्याला म्हणाली लवकर जाऊन येते अन्...
20
पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील बायोपिकची घोषणा, हा अभिनेता साकारणार भूमिका, पोस्टर रिलीज

राज्यात आघाडीबाबत विचार शक्य : तटकरे

By admin | Updated: August 18, 2015 23:08 IST

संघटनात्मक बदल करून पुनर्रचना करावी लागणार आहे. कोकणच्या दौऱ्यानंतर कोल्हापूर, सांगली, सातारा विभागाचा दौरा त्यानंतर राज्याच्या अन्य भागात दौरा करून मेळावे घेतले जाणार आहेत,

रत्नागिरी : केंद्र व राज्यातील सध्याचे भाजप सरकार जनहितविरोधात निर्णय घेत आहे, त्यामुळे जनतेत प्रक्षोभ आहे. त्यामुळे राज्यात अस्थितरता येऊ नये म्हणून धर्मनिरपेक्षता मानणारे पक्ष पुन्हा एकत्र येऊ शकतात. कॉँग्रेस व राष्ट्रवादीच्या तुटलेल्या आघाडीबाबत योग्य निर्णय होऊ शकतो, असे संकेत राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी रत्नागिरी येथे पत्रकार परिषदेत दिले. राज्यातील पक्षसंघटना मजबूत करण्यासाठीच आपला हा राज्यव्यापी दौरा येथून सुरू केला आहे. संघटनात्मक बदल करून पुनर्रचना करावी लागणार आहे. कोकणच्या दौऱ्यानंतर कोल्हापूर, सांगली, सातारा विभागाचा दौरा त्यानंतर राज्याच्या अन्य भागात दौरा करून मेळावे घेतले जाणार आहेत, असे ते म्हणाले.एबी फॉर्म देऊनही ऐन विधानसभेच्या तोेंडावर उदय सामंत यांनी राष्ट्रवादीला दगा दिला. त्यामुळे काही काळ पक्षात पोकळी निर्माण झाली. मात्र, आता ही पोकळी भरून काढण्याचे काम सुरू झाले आहे. बशीर मुर्तुझा, कुमार शेट्ये, रामभाऊ गराटे व अन्य पक्षनिष्ठ कार्यकर्ते कामाला लागले आहेत. जे पक्ष सोडून व्यक्तीनिष्ठेसाठी अन्य पक्षात गेले ते आता पस्तावले आहेत. त्यांच्यात अस्वस्थता असल्याची माहिती आपल्यापर्यंत आली आहे. त्यामुळे त्यांना खरोखरच त्या निर्णयाबाबत खंत वाटत असेल तर त्यांना पक्षात परतीचा मार्ग मोकळा आहे, असेही तटकरे यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यावरून सध्या वादंग निर्माण झाला आहे. याबाबत पक्षाध्यक्ष शरद पवार यांनीही भाष्य केले आहे. इतिहासातील आक्षेपार्ह लिखाणाला पवार यांचाही आक्षेप आहे. याबाबत पक्षाची भूमिका काय, असे विचारता तटकरे म्हणाले, पुरंदरे यांच्या आक्षेपार्ह लिखाणाबाबत जे पवार बोलले ती पक्षाचीच भूमिका आहे. पवार हे पक्षाचे अध्यक्ष आहेत. त्यांचा राजकीय अनुभव मोठा आहे. त्यामुळे आक्षेपार्ह लिखाण करून कोणी वाद निर्माण करावेत, हे योग्य नाही. त्याची खातरजमा होणे आवश्यक आहे.