शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

गाव करील ते राव न करील!

By admin | Updated: October 19, 2015 23:44 IST

ग्रामस्थांचे श्रमदान : एक कोटी रुपयांहून अधिक रकमेची बचत

रहिम दलाल - रत्नागिरीजिल्ह्यात लोकसहभागातून उभारण्यात आलेल्या बंधाऱ्यांमुळे लाखो लीटर्स पाणी अडविले गेले असून, श्रमदानामुळे शासनाच्या सुमारे एक कोटी रुपयांची बचत झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ११५० बंधाऱ्यांची कामे पूर्ण झाली आहेत. मागील उन्हाळ्यात जिल्ह्यात ९८ गावातील २२७ वाड्यांमध्ये भीषण पाणी टंचाई उद्भवली होती. यंदा जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी असल्याने उन्हाळ्यामध्ये पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. या पाणीटंचाईला सामोरे जाण्यासाठी जिल्हा परिषदेकडून त्यावर आतापासून उपाययोजना करण्याच्या दृष्टीने पावले उचलण्यात आली आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी जिल्ह्यात सुमारे १० हजार वनराई बंधारे बांधण्याचा निर्धार केला आहे. हे बंधारे उभारण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीला उद्दिष्ट देण्यात आले आहे. आॅक्टोबर, २०१५ पासून जिल्ह्यात गावोगावी वनराई, विजय आणि कच्चे बंधारे उभारण्याची मोहीम हाती घेण्यात आली. या बंधाऱ्यांच्या कामांमध्ये स्थानिक ग्रामस्थ, विद्यार्थीवर्ग, शिक्षक, ग्रामसेवक व कृषी विभागाचे अधिकारी सहभागी झाले होते. या मोहिमेमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी देशभ्रतार यांनी काही ठिकाणी बंधाऱ्यांना भेटी देऊन लोकांना प्रोत्साहन दिले. तसेच जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी पी. एन. देशमुख यांनी प्रत्येक तालुक्यामध्ये कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना बरोबर घेऊन प्रत्यक्ष बंधाऱ्यांच्या बांधकामांची पाहणी केली. जिल्ह्यात या बंधाऱ्यांची कामे बहुतांश गावांमध्ये सुरु आहेत. काही गावांमध्ये ८ ते १० बंधारे उभारण्यात आले आहेत. त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी बंधारे उभारण्याचे समोर ठेवलेले उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या दृष्टीने जोरात कामे सुरु आहेत. उभारण्यात आलेल्या बंधाऱ्यांच्या कामांसाठी हजारो हात श्रमदान करीत आहेत. तसेच या बंधाऱ्यांसाठी लागणारे काही साहित्य काही कंपन्यांकडून देण्यात आले आहे. त्यामुळे बंधाऱ्यांसाठीचे साहित्य व मजुरीचा एक कोटीपेक्षा जास्त होणारा शासनाचा खर्च वाचला आहे. तसेच लाखो लीटर्सच्या पाण्याची बचतही झाली आहे. या बंधाऱ्यांमुळे उन्हाळ्याच्या दिवसांत पाणीटंचाईवर मात करण्यासाठी मोठी मदत होणार आहे.तालुकावनराई बंधारेमंडणगड१२४दापोली१६१खेड१७७चिपळूण१६३गुहागर१३७संगमेश्वर१३७रत्नागिरी २४लांजा११८राजापूर११२एकूण११५०आवश्यक साहित्य काही कंपन्यांकडून देण्यात आले आहे. त्यामुळे बंधाऱ्यांसाठीचे साहित्य व मजुरीचा एक कोटीपेक्षा जास्त होणारा शासनाचा खर्च वाचला आहेयुध्दपातळीवर काम : मोठे संकट टळणार?लोकसहभागातून जिल्ह्यात उभारण्यात येणाऱ्या बंधाऱ्यांमुळे पाणीटंचाईचे मोठे संकट दूर होण्यास मदत होणार आहे. या बंधाऱ्यावर होणारा कोट्यवधीचा खर्च वाचणार आहे. अनेक गावांमध्ये असे बंधारे बांधण्यात आले आहेत.