शहरं
Join us  
Trending Stories
1
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
2
India Pakistan War :"हमने भेजे कश्मीर में मुजाहिद...", दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारावेळी नमाज पठण करणाऱ्या अब्दुल रौफच्या व्हिडिओने पाकिस्तानचा पर्दाफाश
3
मृत्यूने गाठण्यापूर्वी 'ती' "मला जगायचंय" एवढेच म्हणत राहिली अन् अखेरचा घेतला श्वास
4
ट्रम्पनी म्हटलं खूप छान, चीननं केलं उलट काम; असं काय चाललंय ज्याचा भारतावर थेट होऊ शकतो परिणाम?
5
India Pakistan War:भारत - पाकिस्तानमधील तणाव निवळतोय, रात्री कोणताही हल्ला झाला नाही; लष्कराने दिली माहिती
6
वडिलांना लग्नाला का बोलावलं नाही? प्रतीकने अखेर खरं कारण सांगितलंच, म्हणाला- "आईची इच्छा होती की..."
7
भारत-पाकिस्तान तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेनं खरंच मध्यस्थी केली? जाणून घ्या, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
8
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
9
मुलांसाठी Post Office ची खास स्कीम, गॅरंटीड रिटर्न; विमा कव्हरसह बोनसही, अनेकांना याबद्दल कल्पनाही नाही
10
कुठलाही भारतीय पायलट ताब्यात नाही, आमच्या एका विमानाचं नुकसान; पाक लष्कराची कबुली
11
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
12
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
13
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
14
हेअर ट्रान्सप्लांट करणं इंजिनिअरच्या जीवावर बेतलं; इंफेक्शनमुळे मृत्यू, डॉक्टरवर गुन्हा दाखल
15
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
16
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
17
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
18
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
19
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
20
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू

गाव करील ते राव न करील!

By admin | Updated: October 19, 2015 23:44 IST

ग्रामस्थांचे श्रमदान : एक कोटी रुपयांहून अधिक रकमेची बचत

रहिम दलाल - रत्नागिरीजिल्ह्यात लोकसहभागातून उभारण्यात आलेल्या बंधाऱ्यांमुळे लाखो लीटर्स पाणी अडविले गेले असून, श्रमदानामुळे शासनाच्या सुमारे एक कोटी रुपयांची बचत झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ११५० बंधाऱ्यांची कामे पूर्ण झाली आहेत. मागील उन्हाळ्यात जिल्ह्यात ९८ गावातील २२७ वाड्यांमध्ये भीषण पाणी टंचाई उद्भवली होती. यंदा जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी असल्याने उन्हाळ्यामध्ये पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. या पाणीटंचाईला सामोरे जाण्यासाठी जिल्हा परिषदेकडून त्यावर आतापासून उपाययोजना करण्याच्या दृष्टीने पावले उचलण्यात आली आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी जिल्ह्यात सुमारे १० हजार वनराई बंधारे बांधण्याचा निर्धार केला आहे. हे बंधारे उभारण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीला उद्दिष्ट देण्यात आले आहे. आॅक्टोबर, २०१५ पासून जिल्ह्यात गावोगावी वनराई, विजय आणि कच्चे बंधारे उभारण्याची मोहीम हाती घेण्यात आली. या बंधाऱ्यांच्या कामांमध्ये स्थानिक ग्रामस्थ, विद्यार्थीवर्ग, शिक्षक, ग्रामसेवक व कृषी विभागाचे अधिकारी सहभागी झाले होते. या मोहिमेमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी देशभ्रतार यांनी काही ठिकाणी बंधाऱ्यांना भेटी देऊन लोकांना प्रोत्साहन दिले. तसेच जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी पी. एन. देशमुख यांनी प्रत्येक तालुक्यामध्ये कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना बरोबर घेऊन प्रत्यक्ष बंधाऱ्यांच्या बांधकामांची पाहणी केली. जिल्ह्यात या बंधाऱ्यांची कामे बहुतांश गावांमध्ये सुरु आहेत. काही गावांमध्ये ८ ते १० बंधारे उभारण्यात आले आहेत. त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी बंधारे उभारण्याचे समोर ठेवलेले उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या दृष्टीने जोरात कामे सुरु आहेत. उभारण्यात आलेल्या बंधाऱ्यांच्या कामांसाठी हजारो हात श्रमदान करीत आहेत. तसेच या बंधाऱ्यांसाठी लागणारे काही साहित्य काही कंपन्यांकडून देण्यात आले आहे. त्यामुळे बंधाऱ्यांसाठीचे साहित्य व मजुरीचा एक कोटीपेक्षा जास्त होणारा शासनाचा खर्च वाचला आहे. तसेच लाखो लीटर्सच्या पाण्याची बचतही झाली आहे. या बंधाऱ्यांमुळे उन्हाळ्याच्या दिवसांत पाणीटंचाईवर मात करण्यासाठी मोठी मदत होणार आहे.तालुकावनराई बंधारेमंडणगड१२४दापोली१६१खेड१७७चिपळूण१६३गुहागर१३७संगमेश्वर१३७रत्नागिरी २४लांजा११८राजापूर११२एकूण११५०आवश्यक साहित्य काही कंपन्यांकडून देण्यात आले आहे. त्यामुळे बंधाऱ्यांसाठीचे साहित्य व मजुरीचा एक कोटीपेक्षा जास्त होणारा शासनाचा खर्च वाचला आहेयुध्दपातळीवर काम : मोठे संकट टळणार?लोकसहभागातून जिल्ह्यात उभारण्यात येणाऱ्या बंधाऱ्यांमुळे पाणीटंचाईचे मोठे संकट दूर होण्यास मदत होणार आहे. या बंधाऱ्यावर होणारा कोट्यवधीचा खर्च वाचणार आहे. अनेक गावांमध्ये असे बंधारे बांधण्यात आले आहेत.