शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

कोकण विकासाला दिशा मिळणार

By admin | Updated: April 13, 2016 23:36 IST

प्रमोद जठार : स्वतंत्र पर्यटन विकास महामंडळाची घोषणा; देवेंद्र फडणवीस यांचे कोकणवर विशेष लक्ष

मालवण : कोकणासाठी स्वतंत्र पर्यटन विकास महामंडळाची घोषणा करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोकणावर विशेष लक्ष दिले आहे. पर्यटन महामंडळाच्या माध्यमातून पर्यटनाला वेगळी दिशा मिळणार असून, गेली ६० वर्षे रखडलेला कोकण विकासाचा ‘बॅकलॉग’ भरून काढण्याचे काम भाजप युती शासनाच्या माध्यमातून केले जाणार आहे. जे सिंधुदुर्गाच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांना जमले नाही ते विदर्भच्या विद्यमान मुख्यमंत्र्यांनी कोकण पर्यटन महामंडळ स्थापन करून दाखविले असल्याचा चिमटा भाजप जिल्हाध्यक्ष माजी आमदार प्रमोद जठार यांनी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे नाव न घेता काढला.दरम्यान, आगामी निवडणुकांत शिवसेनेसोबत भाजपकडून युती करण्यात येणार नसल्याचे स्पष्ट केले. देशात व राज्यात सत्तास्थानी असलेल्या भाजप पक्षाचे १३ करोडपेक्षा जास्त सभासद आहेत. त्यामुळे आगामी कालखंडात लोकप्रतिनिधींची वाढ करणे व संघटना मजबुतीकरण हा विकासाबरोबरच भाजपचा अजेंडा राहणार आहे. कुडाळ नगरपंचायतीबरोबर जिल्ह्यातील आगामी सर्व निवडणुकीत भाजपचाच झेंडा फडकेल, असा विश्वासही जठार यांनी व्यक्त केला.मालवण पिंपळपार येथील किल्ले प्रेरणोत्सव कार्यालय येथे आयोजित पत्रकार परिषदेत जठार बोलत होते. यावेळी प्रदेश सदस्य विलास हडकर, भाऊ सामंत, विजय केनवडेकर, आप्पा लुडबे, गणेश कुशे, संदीप शिरोडकर, पंकज पेडणेकर, संतोष पाताडे, आदी उपस्थित होते. कोकणचा तीन हजार ५५ कोटींचा पर्यटन विकास आराखडा बनविण्यात आला आहे. एशियन डेव्हलपमेंट बँक यासाठी अल्पदराने कर्जपुरवठा करणार आहे. स्वदेश दर्शन पर्यटन सेवा अधिनियम व अन्य माध्यमातून मोठ्या प्रमाणात पर्यटन विकास व रोजगार निर्मिती होणार आहे, असे सांगताना मुख्यमंत्र्यांचा हा निर्णय कोकणसाठी नवी विकासाची दालने असून, कोकणी जनतेच्यावतीने त्यांचे आभार मानत असल्याचे जठार यांनी सांगितले. मालवण भुयारी गटार योजना रखडली आहे. हे नगरपरिषदेचे अपयश आहे. यात भ्रष्टाचारही झाला आहे. योग्य पाठपुरावा न झाल्याने योजना रखडली व खड्डेमय रस्त्यातून मालवणी जनतेला त्रास देण्याचे काम सुरू आहे. आगामी काळात मालवण नगरपरिषदेवर झेंडा फडकविताना भुयारी गटार योजनेबरोबरच अन्य विकास योजनांसाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे जठार यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)मंत्रिमंडळाची हजेरीकिल्ले सिंधुदुर्गचा ३५० वा वर्धापनदिन २२ एप्रिलपासून सिंधुदुर्ग महोत्सव म्हणून महाराष्ट्र शासन प्रेरणोत्सव समिती मालवणच्या सहभागातून करीत आहे. या महोत्सवाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र्र फडणवीस यांच्यासह केंद्र्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, केंद्रीय पर्यटनमंत्री महेश शर्मा, राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगुंटीवार, शिक्षण व सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत, ज्येष्ठ अभिनेते दिग्दर्शक राज दत्त यांची उपस्थिती राहणार आहे. तसेच अन्य मंत्री यांना निमंत्रित करण्यात आल्याचे प्रमोद जठार यांनी सांगितले.‘सी-वर्ल्ड’बाबत गतिमान कार्यवाहीजठार म्हणाले, मालवण तालुक्यातील वायंगणी तोंडवळी येथे प्रस्तावित सी-वर्ल्ड प्रकल्पाबाबत वर्षभरापूर्वी कमी जागेची घोषणा करणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र्र फडणवीस यांच्यावतीने प्रकल्पाबाबत गतिमान हालचाली सुरु करण्यात आल्या आहेत. ३५० एकर जागेत प्रकल्प साकारण्यासाठी अंतिम आराखडा तयार करण्याची कार्यवाही सुरु झाली आहे. प्रकल्पाबाबत प्रकल्प ठिकाण व अन्य माहिती जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांना येत्या दहा दिवसांत प्रकल्प माहिती अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. येत्या काही महिन्यांत आराखडा निश्चित करून सर्वांना विश्वासात घेताना जागेची भूसंपादन प्रक्रियाही हाती घेण्यात येईल.