शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

माळीणसारखे संकट कळणेवरही येईल

By admin | Updated: August 3, 2014 22:47 IST

उपरकर : मायनिंगवाल्यांना केसरकरांचा वरदहस्त

कसई दोडामार्ग : पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील माळीण गावावर डोंगरकडा कोसळल्याने संपूर्ण गाव गाडले जाऊन मनुष्यहानीही झाली. कळणे गावातही मायनिंग प्रकल्प सुरू असून डोंगर पोखरले जात आहेत. हे डोंगर कधीही कोसळून माळीण गावाप्रमाणेच दुर्घटना घडू शकते, असे मत मनसेचे कोकण संघटक परशुराम उपरकर यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकातून व्यक्त केले आहे. तसेच मायनिंगवाल्यांवर आमदार दीपक केसरकरांचा वरदहस्त असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कळणे मायनिंगसारखे विनाशकारी मायनिंग प्रकल्प असेच सुरू राहिल्यास दोडामार्ग तालुक्यातील मायनिंगग्रस्त गावांवर माळीण गावाप्रमाणेच दुर्दैैवी परिस्थिती ओढवू शकते. सावंतवाडी, दोडामार्ग तालुक्यात अनेक ठिकाणी सुरू असलेल्या मायनिंग प्रकल्पांसाठी वृक्षांची तोड केली जात आहे. डोंगरच्या डोंगर नाहीसे केले जात आहेत. मायनिंगमधून मिळणाऱ्या पैशांच्या हव्यासापोटी वृक्षतोड केली, तर उघड्याबोडक्या जमिनीची प्रचंड धूप होते आणि दरडी कोसळून जीवित व वित्तहानी होण्याची शक्यता असते. सावंतवाडी, दोडामार्ग तालुक्यात अगोदरच मायनिंगसाठी प्रचंड प्रमाणात वृक्षतोड केल्याने जमिनीची धूप झालेली आहे. त्यात करून याच प्रकारचे आणखी ५० विनाशकारी प्रकल्प या दोन्ही तालुक्यात प्रस्तावित आहेत. मायनिंग माफिया स्वत:च्या आर्थिक लाभासाठी पर्यावरणाचा विध्वंस करत असून या सर्व माफियांवर आमदार दीपक केसरकर यांचा वरदहस्त आहे. त्यामुळे उद्या माळीण गावासारखी परिस्थिती उद्भवली आणि मायनिंगच्या हव्यासापायी दोडामार्ग तालुक्यातील एखादे गाव दरड कोसळून गाडले गेले, तर त्याला सर्वस्वी जबाबदार आमदार केसरकरच असतील. माधव गाडगीळ यांना आपल्या सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावात मायनिंग होण्याची आपली इच्छा आहे, असे आमदार केसरकर यांनी लिहिलेले गुप्त पत्र गाडगीळांनी इंटरनेटवर उघड केल्याने केसरकरांचा खरा चेहरा समोर आला आहे. जनतेने भरघोस मतांनी निवडून दिल्यानंतर स्वत:च्या स्वार्थासाठी मतदारसंघातील जनतेच्या जीवाशी खेळणाऱ्या केसरकरांना सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील सुज्ञ जनता कधीही माफ करणार नाही, असे म्हटले आहे.आतापर्यंत महाराष्ट्रात मुरुड-जंजिरा, डहाणू तालुका, माथेरान व महाबळेश्वर पाचगणी हे चार टापू इको-सेन्सिटिव्ह म्हणून जाहीर झालेले आहेत. परंतु तिकडचे लोक झोपड्यांमध्ये राहतात का, बैलगाड्यांतून फिरतात का? याची खातरजमा करण्यासाठी पुढील पंधरावड्यात सावंतवाडी, दोडामार्ग तालुक्यातील जी गावे इकोसेन्सिटिव्ह जाहीर झाली आहेत, त्या गावातील प्रत्येकी ४ प्रतिनिधींना मनसेतर्फे महाबळेश्वर येथे नेण्यात येणार आहे. त्यानंतर याबाबतचा पर्दाफाश होईल, अशी माहिती देत ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ विश्वंभर चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत पर्यावरण परिषदेचे आयोजन करण्यात येणार असल्याचे उपरकर यांनी म्हटले आहे. (वार्ताहर)