शहरं
Join us  
Trending Stories
1
"भाजपाने पेरलेल्या विषाला..."; प्रवीण गायकवाड प्रकरणावरून संजय राऊत यांनी व्यक्त केला संताप
2
IND vs ENG : वॉशिंग्टन सुंदरनं घेतली इंग्लंडची फिरकी; टीम इंडियासमोर १९३ धावांचे आव्हान
3
दुर्गम जंगलातील खोल गुहेमध्ये २ मुलींसह सापडली रशियन महिला, विठ्ठल मूर्तीची करायची पूजा, तपासामधून धक्कादायक माहिती उघड  
4
Video: बापरे!! पर्यटक समोर असताना चित्ता अचानक माणसांसारखा दोन पायांवर उभा राहिला अन्...
5
लातुरात ड्रग्ज विक्री नेटवर्कचा उलगडा! आणखी तिघांना अटक; चार दिवसांची पाेलिस काेठडी
6
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
7
नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत
8
ठाणे: जि.प., पं. समित्यांचा निवडणूक प्रभाग रचना मसुदा प्रसिद्ध; हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत
9
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
10
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
11
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
12
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे
13
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं
14
भारतीय लष्कराकडून पुन्हा एकदा ड्रोन स्ट्राईक, अनेक अतिरेकी ठार झाल्याचा दावा
15
युनूस सरकार बघ्याच्या भूमिकेत; ढाक्यात हिंदू व्यावसायिकाची निर्घृण हत्या; हल्लेखोर मृतदेहावर नाचले
16
रस्त्याने जात असताना कारवर पडले दगड, भयंकर भूस्खलनातून थोडक्यात बचावले माजी मुख्यमंत्री
17
रिंकू राजगुरूचा सिंपल पण स्टायलिश लूक, फोटो नाही तर कॅप्शनने वेधलं सर्वांच लक्ष
18
प्रियकरासोबत पत्नी वारंवार पळून जायची; घटस्फोट घेतला अन् दुधाने अंघोळ करुन आनंद साजरा केला
19
Video: IAS अधिकाऱ्याची परीक्षा हॉलमध्ये विद्यार्थ्याला मारहाण; कॉपी केल्याचा आरोप
20
IND vs ENG : 'गलीतली साडेसाती' संपली; जैस्वालचा 'यशस्वी' झेल! दुसऱ्यांदा रेड्डीच्या जाळ्यात फसला क्रॉउली (VIDEO)

माळीणसारखे संकट कळणेवरही येईल

By admin | Updated: August 3, 2014 22:47 IST

उपरकर : मायनिंगवाल्यांना केसरकरांचा वरदहस्त

कसई दोडामार्ग : पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील माळीण गावावर डोंगरकडा कोसळल्याने संपूर्ण गाव गाडले जाऊन मनुष्यहानीही झाली. कळणे गावातही मायनिंग प्रकल्प सुरू असून डोंगर पोखरले जात आहेत. हे डोंगर कधीही कोसळून माळीण गावाप्रमाणेच दुर्घटना घडू शकते, असे मत मनसेचे कोकण संघटक परशुराम उपरकर यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकातून व्यक्त केले आहे. तसेच मायनिंगवाल्यांवर आमदार दीपक केसरकरांचा वरदहस्त असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कळणे मायनिंगसारखे विनाशकारी मायनिंग प्रकल्प असेच सुरू राहिल्यास दोडामार्ग तालुक्यातील मायनिंगग्रस्त गावांवर माळीण गावाप्रमाणेच दुर्दैैवी परिस्थिती ओढवू शकते. सावंतवाडी, दोडामार्ग तालुक्यात अनेक ठिकाणी सुरू असलेल्या मायनिंग प्रकल्पांसाठी वृक्षांची तोड केली जात आहे. डोंगरच्या डोंगर नाहीसे केले जात आहेत. मायनिंगमधून मिळणाऱ्या पैशांच्या हव्यासापोटी वृक्षतोड केली, तर उघड्याबोडक्या जमिनीची प्रचंड धूप होते आणि दरडी कोसळून जीवित व वित्तहानी होण्याची शक्यता असते. सावंतवाडी, दोडामार्ग तालुक्यात अगोदरच मायनिंगसाठी प्रचंड प्रमाणात वृक्षतोड केल्याने जमिनीची धूप झालेली आहे. त्यात करून याच प्रकारचे आणखी ५० विनाशकारी प्रकल्प या दोन्ही तालुक्यात प्रस्तावित आहेत. मायनिंग माफिया स्वत:च्या आर्थिक लाभासाठी पर्यावरणाचा विध्वंस करत असून या सर्व माफियांवर आमदार दीपक केसरकर यांचा वरदहस्त आहे. त्यामुळे उद्या माळीण गावासारखी परिस्थिती उद्भवली आणि मायनिंगच्या हव्यासापायी दोडामार्ग तालुक्यातील एखादे गाव दरड कोसळून गाडले गेले, तर त्याला सर्वस्वी जबाबदार आमदार केसरकरच असतील. माधव गाडगीळ यांना आपल्या सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावात मायनिंग होण्याची आपली इच्छा आहे, असे आमदार केसरकर यांनी लिहिलेले गुप्त पत्र गाडगीळांनी इंटरनेटवर उघड केल्याने केसरकरांचा खरा चेहरा समोर आला आहे. जनतेने भरघोस मतांनी निवडून दिल्यानंतर स्वत:च्या स्वार्थासाठी मतदारसंघातील जनतेच्या जीवाशी खेळणाऱ्या केसरकरांना सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील सुज्ञ जनता कधीही माफ करणार नाही, असे म्हटले आहे.आतापर्यंत महाराष्ट्रात मुरुड-जंजिरा, डहाणू तालुका, माथेरान व महाबळेश्वर पाचगणी हे चार टापू इको-सेन्सिटिव्ह म्हणून जाहीर झालेले आहेत. परंतु तिकडचे लोक झोपड्यांमध्ये राहतात का, बैलगाड्यांतून फिरतात का? याची खातरजमा करण्यासाठी पुढील पंधरावड्यात सावंतवाडी, दोडामार्ग तालुक्यातील जी गावे इकोसेन्सिटिव्ह जाहीर झाली आहेत, त्या गावातील प्रत्येकी ४ प्रतिनिधींना मनसेतर्फे महाबळेश्वर येथे नेण्यात येणार आहे. त्यानंतर याबाबतचा पर्दाफाश होईल, अशी माहिती देत ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ विश्वंभर चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत पर्यावरण परिषदेचे आयोजन करण्यात येणार असल्याचे उपरकर यांनी म्हटले आहे. (वार्ताहर)