शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

जिल्हा परिषद पद भरतीत कोणताही घोटाळा नाही

By admin | Updated: December 15, 2015 23:31 IST

शेखर सिंह यांचे स्पष्टीकरण : वैद्यकीय चाचणीनंतरच अंतिम उमेदवार यादी

सिंधुदुर्गनगरी : जिल्हा परिषद भरती प्रक्रियेत कोणताही घोटाळा झाला नसल्याचा स्पष्ट निर्वाळा मंगळवारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह यांनी दिला. या भरतीतील सर्व उमेदवारांचे गुण बुधवारी जाहीर करण्यात येणार आहेत. तसेच वैद्यकीय चाचणी झाल्यानंतरच अंतिम उमेदवार निवड यादी जाहीर करण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले.जिल्हा परिषदेतील विविध ६९ पदांसाठी लेखी परीक्षा घेण्यात आली. त्यानंतर उमेदवारांच्या अंतरिम निवड याद्या जाहीर करण्यात आल्या होत्या. त्यातील परिचर संवर्गाच्या यादीमध्ये बदल करून ती नव्याने लावण्यात आल्यामुळे ही भरती संशयाच्या भोवऱ्यात सापडली होती. त्यातच समांतर आरक्षणाअन्वये उमेदवारांची अंतरिम निवडसूची लावण्यात आल्यामुळेही संभ्रमावस्था निर्माण झाली होती. या संदर्भात शेखर सिंह यांची भेट घेतली असता त्यांनी यासंदर्भात स्पष्टीकरण दिले. एकूणच या भरती प्रक्रियेसंदर्भात बोलताना शेखर सिंह यांनी ही प्रक्रिया कशी राबविली गेली याची संक्षिप्त माहिती दिली. परिचर संवर्गातील अंतरिम यादी जेव्हा जाहीर करण्यात आली त्याचवेळी २०१४ मध्ये निघालेल्या समांतर आरक्षणासंदर्भातील शासन निर्णयाचा अवलंब करण्याचे राहून गेले होते. त्यामुळे तांत्रिक बाब म्हणून ही यादी बदलावी लागली. मुळात या शासन निर्णयातील निर्देशदेखील संदिग्ध असल्यामुळे आपण ग्रामविकास मंत्रालयाशीसुद्धा संपर्क साधला. दरम्यान २००७ मध्ये राजस्थानमधील एका प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयाने समांतर आरक्षणासंदर्भात दिलेल्या कायदेशीर व स्पष्ट अशा निर्देशानुसार अवलंब करून या अंतरिम यादीमध्ये बदल करण्यात आले व समांतर आरक्षणाचा फायदा संबंधित उमेदवाराला मिळाला. यामध्ये प्रथम निवड सूचित जाहिर झालेल्या उमेदवाराच्या नावामुळे ‘त्या’ उमेदवाराला आपण निवडलो गेल्याचे समाधान झाले व दुसऱ्याच यादीत ती थेट प्रतिक्षा यादीवर गेल्याचे समजल्यावर तिचा विरस होणे स्वाभाविक आहे हे मी मान्य करतो. मात्र समांतर आरक्षणाची काटेकोर अंमलबजावणी केली नसती तर कदाचित काही उमेदवारांवर अन्याय झाला असता. या भरतीतदेखील जोपर्यंत कागदपत्रांची छाननी व वैद्यकीय चाचणी होत नाही तोपर्यंत अंतिम यादी जाहिर होणार नाही. या परीक्षेचे पेपर आपण स्वत: २४ तास डोळ्यात तेल घालून काढले असून त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा घोटाळा झालेला नाही, असे सिंह यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)युवासेनेचा आंदोलनाचा इशाराविविध पदांसाठी जिल्हापरीषदेच्या वतीने घेण्यात आलेली भरती प्रकिया संशय निर्माण करणारी आहे. त्या मुळे या भरती प्रक्रियेला तात्काळ स्थगिती देवून पारदर्शक पध्दतीने भरती प्रक्रिया घेण्यात यावी. अन्यथा युवा सेनेच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा युवा सेनेचे जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट यांनी जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह यांना दिला आहे. आज युवा सेनेच्या शिष्ठमंडळाने जिल्ह्याचे मुख्य कार्यकार अधिकारी यांची भेट घेत निवेदन सादर केले. यावेळी युवा सेना तालुकाप्रमुख शेखर गावडे, तानाजी पालव, संकेत सावंत, श्रीकृष्ण कदम, योगेश तावडे, शेखर परब, निर्नाश महाडेश्वर, प्रणव वर्दम, प्रसाद पालव, गंगाराम पालव, नवरत्न पालव आदी उपस्थित होते.