शहरं
Join us  
Trending Stories
1
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
2
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
3
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
4
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
5
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
6
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
7
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
8
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
9
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
10
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय
11
पत्नीकडे फोन, बँक खात्याचे पासवर्ड मागणे हा घरगुती हिंसाचार, छत्तीसगड उच्च न्यायालय
12
व्यवस्थापन कोट्यातील जागांसाठी विद्यार्थ्यांची लूट; विद्यापीठाने देखरेख समिती नेमावी : युवा सेना
13
व्हिजन डाॅक्युमेंटसाठीचा मसुदा इंग्रजीत! शिक्षणतज्ज्ञांमध्ये आश्चर्य; इंग्रजीला देण्यात आलेल्या प्राधान्याबद्दल आता टीका
14
नवी मुंबई महापालिका राज्यात पहिली; मीरा-भाईंदर देशातले ‘सर्वांत स्वच्छ शहर’
15
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
16
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
17
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
18
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
19
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
20
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी

साखर कारखाना उभारणीत राजकारण नाही

By admin | Updated: July 29, 2014 23:00 IST

विजय सावंत : २५ आॅगस्टपूर्वी भूमिपूजन, सर्वपक्षीय नेत्यांची उपस्थिती

कणकवली : शिडवणे येथील साखर कारखान्याचे भूमिपूजन २५ आॅगस्टपर्यंत करण्यात येणार असून या भूमिपूजन सोहळ्यास माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे उपस्थित राहणार आहेत. शेतकऱ्यांसाठीच हा कारखाना असून त्याच्या उभारणीमध्ये कोणतेही राजकारण आणले जाणार नाही, असे सावंत शुगर अ‍ॅग्रो प्रॉडक्ट लिमिटेडचे संस्थापक चेअरमन आमदार विजय सावंत यांनी स्पष्ट केले. येथील संपर्क कार्यालयात मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत विजय सावंत बोलत होते. ते म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तसेच बेरोजगार तरुणांना या कारखान्यामुळे आर्थिक उन्नतीची संधी मिळणार आहे. शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी सध्या गाववार बैठका घेण्यात येत आहेत. जिल्ह्यामधील ऊस आजूबाजूचे साखर कारखाने वेळेत घेत नसल्यामुळे शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान होत आहे.  त्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हक्काचा साखर कारखाना मिळावा यासाठी हा कारखाना सुरु करण्यात येत आहे. शेतकऱ्यांचे शेअर्सही या कारखान्यात असणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात १.३० लाख टन ऊस उत्पादन होते. परंतु कारखान्यात ऊसाचे एकावेळी गाळप करण्यासाठी ३ ते ४ टन ऊसाची आवश्यकता असते. त्यामुळे कोल्हापूर येथील ऊस शेतकऱ्यांचीही १ आॅगस्ट रोजी बैठक घेऊन त्यांना या कारखान्याला ऊस देण्यासाठी उद्युक्त करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील शेतकरी ऊस लागवडीकडे वळत असून मुबलक पाणी नसल्यामुळे काही मर्यादा येत आहेत. ऊसाला पाणीपुरवठा होण्यासाठी धरणालगत कालवे होेणे गरजेचे आहे. देवधर प्रकल्प तसेच नाधवडे प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यास त्याठिकाणी असलेली १२ हजार एकर जमीन ओलिताखाली येवू शकेल. या कारखान्यात मे २०१५ मध्ये प्रायोगिक तत्वावर ऊस गाळप करण्यात येणार असून नोव्हेंबर २०१५ मध्ये हंगामी गाळप घेतले जाणार  आहे. (वार्ताहर)कारखाना उभारणीतील अडचणी दूरराणे व्हेंचर विरूद्ध शासन असा दावा न्यायालयात सुरु आहे. या दाव्याशी आपला काहीही संबंध नाही. आपण उभारत असलेल्या साखर कारखान्याबाबत अडचणी दिल्लीतून दूर झाल्या आहेत. त्यामुळे आता कोणताही अडथळा येणार नसल्याचे आमदार सावंत यांनी सांगितले.सूत गिरणी उभारण्याचा मानसकणकवली तालुक्यातील तिवरे येथे सूतगिरणी उभारण्याचा आपला मानस आहे. त्याठिकाणी कापसापासून सूत व सुतापासून कापड तयार होणार आहे. त्यानंतर गारमेंट फॅक्टरीमध्ये कपडे तयार होतील. कळसुलीजवळील शिरवल येथे रेडिमेड गारमेंटच्या इमारतीचे काम सुरु केले असून कणकवली, देवगड, वैभववाडी या भागामध्ये १८ गारमेंट फॅक्टरी सुरु करण्यात येणार आहेत.