शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाने भारताला SU-57 लढाऊ विमानांची ऑफर दिली, त्याचे फिचर अन् महत्त्व जाणून घ्या
2
Ladki Bahin Yojana: २६ लाख लाडक्या बहिणींची नावे गायब, ४९०० कोटींचा महाघोटाळा; अजित पवारांच्या बहिणीचा गंभीर आरोप 
3
३५० सीसीवरील मोटरसायकलचा जीएसटी वाढला; KTM, Triumph अन् Aprilia ने मोठा निर्णय घेतला...
4
घराशेजारच्या किराणा दुकानांमध्ये ‘GST बचत उत्सवा’चा लाभ नाहीच; ग्राहकांचा झाला अपेक्षाभंग
5
"महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा, आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घ्या’ काँग्रेसची मागणी  
6
Ghaziabad Encounter: गाझियाबाद एन्काउंटरची इतिहासात नोंद, असं वेगळं काय घडलं? 
7
VIRAL : एका झटक्यात महिला झाली कोट्यधीश; ChatGPTने पालटलं नशीब! वाचून व्हाल हैराण
8
अर्जुन तेंडुलकर राहुल द्रविडच्या मुलाला भिडला; समित द्रविड पहिल्यांदाच खेळला, पण... 
9
मराठी माणसाचं दुकान हडपल्याचा गुन्हा; 'त्या' परप्रांतीयाला शिंदेसेनेकडून जबाबदारी, पक्षात नाराजी
10
"गरबा कार्यक्रमांच्या प्रवेशद्वारावर गोमूत्र ठेवावं, गैर-हिंदूंना..."; धीरेंद्र शास्त्रींचं मोठं विधान
11
मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी, राज ठाकरेंविरोधातील याचिकेवर उच्च न्यायालयाचे प्रश्नचिन्ह
12
दिल्लीतील रस्त्यावर मध्यरात्री चकमकीचा थरार, माया गँगच्या म्होरक्याविरोधात STF ची मोठी कारवाई
13
जीएसटीच्या पहिल्याच दिवशी मारुतीने २५,००० गाड्या विकल्या; ८० हजार लोकांची इन्क्वायरी...
14
वयाच्या २९व्या वर्षी वेगवान गोलंदाज निवृत्त; वकील बनण्यासाठी क्रिकेटशी तोडलं नातं!
15
Muhurat Trading 2025 Date and Time: वेळ लिहून ठेवा! या मुहूर्तावर शेअर बाजारात होणार धनवर्षा; १ तासासाठी उघडणार मार्केट
16
मुसळधार पावसाने कोलकात्याला झोडपले, अनेक भागात पाणी साचले, मेट्रो विस्कळीत, ५ जणांचा मृत्यू
17
निमिषा प्रियासारखंच प्रकरण; १९ वर्षांपासून सौदी अरेबियाच्या तुरुंगात असलेला अब्दुल रहीम सुटणार!
18
"मी तुमचा मोठा चाहता...", रितेश देशमुखने प्रसाद ओकचं केलं कौतुक; गंमतीत म्हणाला...
19
"बिग बॉसचं मला काही विचारू नका", भाऊ अमालबद्दल विचारताच अरमान मलिक भडकला, व्हिडीओ व्हायरल
20
महिला पोलीस अधिकाऱ्याने वर्दीवरील बॅज फेकून मारला; Video व्हायरल, घटनेची दुसरी बाजू आली समोर

मासिक सभेत अधिकाऱ्यांची आवश्यकता नाही

By admin | Updated: July 11, 2015 00:15 IST

सदस्य संतापले : मालवण सभापती, उपसभापतींनी अधिकाऱ्यांकडून प्रश्न सोडवून घ्यावेत

मालवण : पंचायत समितीच्या बैठकीत वारंवार प्रश्न उपस्थित करूनही विकासाचे प्रश्न प्रलंबित राहतात. यावरुन पंचायत समिती सदस्य व अधिकारी यांच्यात वारंवार खटके उडतात. जर मासिक सभांमध्ये प्रश्नच सुटत नसतील तर अधिकाऱ्यांची गरजच काय? असा संतप्त सवाल पंचायत समिती सदस्य प्रसाद मोरजकर यांनी केला. सदस्यांनी उपस्थित केलेले तालुक्यातील प्रश्न सभापती व उपसभापती यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून सोडवून घ्यावे, अशी भूमिका पंचायत समिती सदस्य प्रसाद मोरजकर यांनी मांडली. अधिकारी हे सभेचा भाग आहे. त्यांना डावलून चालणार नाही असे सभापती सीमा परुळेकर यांनी सांगितले. तर गटविकास अधिकारी पराडकर यांनी सदस्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडवले जातील. सभेनंतर पंधरवड्यात आढावा बैठकही घेतली जाईल असे सांगितले.मालवण पंचायत समितीची मासिक सभा सभापती सीमा परुळेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी उपसभापती देवानंद चिंदरकर, गटविकास अधिकारी राजेंद्र पराडकर, सदस्य प्रसाद मोरजकर, संजय ठाकूर, राजेंद्र प्रभुदेसाई, उदय दुखंडे, भाग्यता वायंगणकर,श्रद्धा केळुसकर, चित्रा दळवी, हिमाली अमरे आदी उपस्थित होते. दरम्यान ग्रामविकास अधिकारी पराग गुंजाटे यांना सभेच्या सुरुवातीला श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी मालवण ग्रामीण रुग्णालयात नियुक्ती देण्यात आलेले कणकवली आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. शिकलगार १५ आॅगस्ट पूर्वी हजर न झाल्यास उपोषणास बसू असा इशारा उपसभापती देवानंद चिंदरकर यांनी दिला. तर पालकमंत्री सावंतवाडी रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची बदली थांबवू शकतात तर मालवणातील ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना सेवा, अधिकाऱ्यांची नियुक्ती गरजेनुसार झालीच पाहिजे असेही चिंदरकर यांनी सांगितले. यावर गटविकास अधिकारी पराडकर यांनी पंचायत समिती मासिक सभेत पदाधिकाऱ्यांनी इशारे देणे योग्य नाही अशी सूचना केली.गोळवण डिकवल बौद्धवाडी येथील नळपाणी योजनेचा प्रश्न उपस्थित केला. संबंधित ग्रामपंचायतीने तत्काळ कोटेशन सादर करावे अशा सूचना उपसभापती चिंदरकर यांनी केल्या. मसुरे बेलाचीवाडी हा मार्ग खड्डेमय झाल्याने बांधकाम विभागाने लक्ष देऊन तातडीने रस्ता दुरुस्ती करावी अशी मागणी संजय ठाकूर यांनी केली. तालुक्यातील वीज प्रश्न गंभीर बनला आहे. ग्रामस्थांनी आंदोलने करावी लागतात. तरी तालुक्यातील वीज प्रश्न सोडवण्यासाठी अधिकारी, ग्रामस्थांची बैठक व्हावी अशी मागणी उदय दुखंडे यांनी केली. तालुक्यातील शिरवंडे गाव हागणदारी मुक्त झालेला नाही यासाठी सदस्य व ग्रामपंचायतीने पुढाकार घावा. तसेच शौचालय बांधणीसाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. शाळांना दिलेल्या संगणकांमुळे किती मुले साक्षर झालीत? त्याचा योग्य वापर होतो का ? असाही सवाल उदय दुखंडे यांनी उपस्थित केला. मच्छिमारावरील अन्यायाचा व पोलीस कारवाईची निषेध नोंदवण्यात आला आहे. (वार्ताहर)अंगणवाड्यांत किती चिक्की, चटई, ताटे आली ?महाराष्ट्रात अंगणवाड्यांत पुरवण्यात आलेली चिक्की, चटई व ताटे यांचा पुरवठा वादाच्या भोवऱ्यात असताना तालुक्यात किती चिक्की, चटई व ताटे अंगणवाडीतील मुलांसाठी आली याची विचारणा उपसभापती चिंदरकर यांनी केली. यावर एकात्मिक बालविकास अधिकारी श्रीराम शिरसाट यांनी अद्यापपर्यंत कोणताही पुरवठा झाला नसल्याचे सांगितले.