शहरं
Join us  
Trending Stories
1
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
2
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
3
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
4
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
5
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
6
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)
7
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
8
आठवड्यातून नेमका किती वेळा रेफ्रिजरेटर बंद करावा, कशामुळे होऊ शकतो लवकर खराब?
9
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
10
चाळीशी ओलांडली तरी मुक्ता बर्वे का आहे सिंगल? या विवाहित दिग्दर्शकावर होतं अभिनेत्रीचं क्रश
11
"बाई आणि बाटली..." शरद पोंक्षेंकडून मुलाला दोन महत्त्वाचे सल्ले, म्हणाले "नाहीतर करिअरची वाट"
12
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
13
भारताचा संघ Asia Cup 2025 मध्ये सहभागी होणार? BCCI ने दिली महत्त्वाची ताजी अपडेट
14
Shrikant Shinde On Rahul Gandhi: 'राहुल गांधींना देशभक्तीपेक्षा राजकारणात रस' श्रीकांत शिंदेंचा टोला
15
"मला आतापर्यंत भेटलेला सर्वात मेहनती भारतीय"; दिव्यांग रिक्षा चालकाला पाहून व्लॉगर भावुक
16
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
17
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
18
बाजारात चढ-उतार! इन्फोसिससह 'हे' शेअर्स घसरले; तुमच्या पोर्टफोलिओवर काय परिणाम?
19
Mumbai: नाल्यात अडकलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
20
"त्यांनी माझं पॅकअप केलं होतं..", आमिर खानमुळे 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची गेली नोकरी

मासिक सभेत अधिकाऱ्यांची आवश्यकता नाही

By admin | Updated: July 11, 2015 00:15 IST

सदस्य संतापले : मालवण सभापती, उपसभापतींनी अधिकाऱ्यांकडून प्रश्न सोडवून घ्यावेत

मालवण : पंचायत समितीच्या बैठकीत वारंवार प्रश्न उपस्थित करूनही विकासाचे प्रश्न प्रलंबित राहतात. यावरुन पंचायत समिती सदस्य व अधिकारी यांच्यात वारंवार खटके उडतात. जर मासिक सभांमध्ये प्रश्नच सुटत नसतील तर अधिकाऱ्यांची गरजच काय? असा संतप्त सवाल पंचायत समिती सदस्य प्रसाद मोरजकर यांनी केला. सदस्यांनी उपस्थित केलेले तालुक्यातील प्रश्न सभापती व उपसभापती यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून सोडवून घ्यावे, अशी भूमिका पंचायत समिती सदस्य प्रसाद मोरजकर यांनी मांडली. अधिकारी हे सभेचा भाग आहे. त्यांना डावलून चालणार नाही असे सभापती सीमा परुळेकर यांनी सांगितले. तर गटविकास अधिकारी पराडकर यांनी सदस्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडवले जातील. सभेनंतर पंधरवड्यात आढावा बैठकही घेतली जाईल असे सांगितले.मालवण पंचायत समितीची मासिक सभा सभापती सीमा परुळेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी उपसभापती देवानंद चिंदरकर, गटविकास अधिकारी राजेंद्र पराडकर, सदस्य प्रसाद मोरजकर, संजय ठाकूर, राजेंद्र प्रभुदेसाई, उदय दुखंडे, भाग्यता वायंगणकर,श्रद्धा केळुसकर, चित्रा दळवी, हिमाली अमरे आदी उपस्थित होते. दरम्यान ग्रामविकास अधिकारी पराग गुंजाटे यांना सभेच्या सुरुवातीला श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी मालवण ग्रामीण रुग्णालयात नियुक्ती देण्यात आलेले कणकवली आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. शिकलगार १५ आॅगस्ट पूर्वी हजर न झाल्यास उपोषणास बसू असा इशारा उपसभापती देवानंद चिंदरकर यांनी दिला. तर पालकमंत्री सावंतवाडी रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची बदली थांबवू शकतात तर मालवणातील ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना सेवा, अधिकाऱ्यांची नियुक्ती गरजेनुसार झालीच पाहिजे असेही चिंदरकर यांनी सांगितले. यावर गटविकास अधिकारी पराडकर यांनी पंचायत समिती मासिक सभेत पदाधिकाऱ्यांनी इशारे देणे योग्य नाही अशी सूचना केली.गोळवण डिकवल बौद्धवाडी येथील नळपाणी योजनेचा प्रश्न उपस्थित केला. संबंधित ग्रामपंचायतीने तत्काळ कोटेशन सादर करावे अशा सूचना उपसभापती चिंदरकर यांनी केल्या. मसुरे बेलाचीवाडी हा मार्ग खड्डेमय झाल्याने बांधकाम विभागाने लक्ष देऊन तातडीने रस्ता दुरुस्ती करावी अशी मागणी संजय ठाकूर यांनी केली. तालुक्यातील वीज प्रश्न गंभीर बनला आहे. ग्रामस्थांनी आंदोलने करावी लागतात. तरी तालुक्यातील वीज प्रश्न सोडवण्यासाठी अधिकारी, ग्रामस्थांची बैठक व्हावी अशी मागणी उदय दुखंडे यांनी केली. तालुक्यातील शिरवंडे गाव हागणदारी मुक्त झालेला नाही यासाठी सदस्य व ग्रामपंचायतीने पुढाकार घावा. तसेच शौचालय बांधणीसाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. शाळांना दिलेल्या संगणकांमुळे किती मुले साक्षर झालीत? त्याचा योग्य वापर होतो का ? असाही सवाल उदय दुखंडे यांनी उपस्थित केला. मच्छिमारावरील अन्यायाचा व पोलीस कारवाईची निषेध नोंदवण्यात आला आहे. (वार्ताहर)अंगणवाड्यांत किती चिक्की, चटई, ताटे आली ?महाराष्ट्रात अंगणवाड्यांत पुरवण्यात आलेली चिक्की, चटई व ताटे यांचा पुरवठा वादाच्या भोवऱ्यात असताना तालुक्यात किती चिक्की, चटई व ताटे अंगणवाडीतील मुलांसाठी आली याची विचारणा उपसभापती चिंदरकर यांनी केली. यावर एकात्मिक बालविकास अधिकारी श्रीराम शिरसाट यांनी अद्यापपर्यंत कोणताही पुरवठा झाला नसल्याचे सांगितले.