शहरं
Join us  
Trending Stories
1
हिमाचल प्रदेश: बिलासपूरमध्ये बसवर डोंगराचा ढिगारा कोसळला, १५ जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
निलेश घायवळचा पाय खोलात;बनावट पासपोर्ट प्रकरणासह आतापर्यंत ४ गुन्हे दाखल
3
भूस्खलन होऊन बसवर कोसळली दरड, १८ जणांचा मृत्यू, पण ३ मुलं आश्चर्यकारकरीत्या बचावली  
4
Dharashiv: मोठी बातमी! तातडीने मदत द्या, मागणी करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे!
5
Bigg Bossचं घर सील, सर्व स्पर्धकांना लवकरच काढणार बाहेर, समोर आलं असं कारण 
6
ICC Womens World Cup 2025 : हेदर नाइटचा हिट शो! इंग्लंडनं बांगलादेशला पराभूत करत भारताला दिला धक्का
7
कस्तुरबा रुग्णालयातील पुस्तक वाटप प्रकरणाला वेगळं वळण, किशोरी पेडणेकरांचा तक्रारदारालाच प्रतिप्रश्न, म्हणाल्या...
8
धक्कादायक!! विरारमध्ये दोन तरूणांनी एकत्र संपवलं जीवन, १८व्या मजल्यावरून मारली उडी
9
अभिषेक शर्मा ICC पुरस्काराच्या शर्यतीत; त्याला कुलदीपसह झिम्बाब्वेचा गडी देणार टक्कर!
10
भर वर्गात महिलेसोबत आक्षेपार्ह चाळे करताना सापडला शिक्षक, मुलांनी रेकॉर्डे केला व्हिडीओ, कुठे घडली घटना
11
...अन् रागाच्या भरात पृथ्वी शॉनं विकेट घेणाऱ्या मुशीर खानवर उगारली बॅट; नेमकं काय घडलं? (VIDEO)
12
मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ
13
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाचा ठाण्यात निषेध, मूक निदर्शने
14
६८ कोटींचा रस्ता ३ वर्षांपासून पूर्ण होईना; कल्याण-अंबरनाथ रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त
15
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
16
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, म्हणाली- "सगळे मला ट्रोल करत सुटलेत..."
17
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
18
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
19
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
20
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण

वसाहतीसाठी स्थानिकांवर अन्याय नको

By admin | Updated: December 21, 2015 00:45 IST

सदानंद चव्हाण : नागपूर अधिवेशनात मार्गताम्हाणे औद्योगिक क्षेत्राबाबत तारांकित प्रश्न

चिपळूण : मार्गताम्हाणे औद्योगिक क्षेत्राकरिता भूसंपादनाची प्रक्रिया सुरु आहे. याबाबत ६ (अ)ची नोटीस काढून शेतकऱ्यांच्या सातबारा उतारावर भूसंपादनाचा पेन्सील शेरा लिहिण्यात आला आहे. या औद्योगिक क्षेत्रासाठी चिपळूण व गुहागर तालुक्यातील १४ गावांतील जमीन संपादीत होत आहे. त्यात शेतकऱ्यांच्या बागायती जमिनी, शेतजमिनी व विकसित होणाऱ्या जमिनी जात असल्यामुळे स्थानिकांचा या एमआयडीसीला प्रचंड विरोध आहे. याबाबत आमदार सदानंद चव्हाण यांनी नागपूर अधिवेशनामध्ये तारांकित प्रश्नाद्वारे हा विषय सभागृहात उपस्थित करताना याप्रश्नी स्थानिकांवर अन्याय करू नये, अशी मागणी केली.या प्रकल्पासाठी स्थानिकांच्या आंबा व काजू बागायतींच्या बहुमोल जमिनी जात असून, स्थानिक शेतकरी भूमीहीन होणाऱ्या मार्गावर आहेत. तसेच लगतच्या लोटे एमआयडीसी येथील प्रदूषणकारी कारखान्यांमुळे दाभोळखाडी, वाशिष्ठी नदी यांच्याबरोबर परिसरात होत असलेले प्रदूषण पाहता स्थानिक जनतेमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. त्यामुळे संबंधित १४ गावातील ग्रामसभांमार्फत ठराव व निवेदने शासनाला देऊन आपला विरोध दर्शवला होता. स्थानिक जनतेवर अन्याय न होता ही एमआयडीसी रद्द करुन संबंधित शेतकऱ्यांच्या ७/१२ उताऱ्यावरील पेन्सील नोंदी काढून टाकणार का? असा प्रश्न आमदार सदानंद चव्हाण यांनी सभागृहात उपस्थित केला. या प्रश्नात स्थानिकांवर कोणत्याही प्रकारे अन्याय होऊ नये, असे ते म्हणाले.उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी यावर सांगितले की, या औद्योगिक क्षेत्रासाठी भूसंपादनाची कार्यवाही उपविभागीय अधिकारी, चिपळूण यांच्यामार्फत सुरु असून, त्याला संबंधित खातेदार व ग्रामस्थ यांचा विरोध होत आहे. या संदर्भात शासन स्तरावर बैठका घेण्यात आल्या आहेत. भविष्यात कोकणात प्रदूषणकारी कारखाने येणार नाहीत, असे आपले धोरण असल्यामुळे नियोजित औद्योगिक वसाहतीमध्ये कोणत्याही परिस्थितीत प्रदूषणकारी कारखाने येणार नाहीत.भूसंपादन करतेवेळी बागायती व गावठाणाच्या जागा बाधीत होणार नाहीत व सक्तीचे भूसंपादन करण्यात येणार नाही, अशा प्रकारचे नियोजन करण्यात येईल. पुर्नसर्वेक्षण करुन स्थानिक ग्रामस्थ, शेतकरी व स्थानिक लोकप्रतिनिधी यांना विश्वासात घेऊन मार्गताम्हाणे औद्योगिक वसाहतीबाबत निर्णय घेण्यात येईल, असे सांगितले. (प्रतिनिधी)सातबारा उताऱ्यावर भूसंपादनाचा पेन्सिल शेरा.मार्गताम्हाणे औद्योगिक क्षेत्राकरिता भूसंपादनाची प्रक्रिया सुरु.चिपळूण व गुहागर तालुक्यातील १४ गावांतील जमीन होतेय संपादीत.बागायती, शेतजमिनी बाधित होणार असल्याने स्थानिकांचा जोरदार विरोध.स्थानिक शेतकरी भूमीहीन होण्याच्या मार्गावर.