शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

वसाहतीसाठी स्थानिकांवर अन्याय नको

By admin | Updated: December 21, 2015 00:45 IST

सदानंद चव्हाण : नागपूर अधिवेशनात मार्गताम्हाणे औद्योगिक क्षेत्राबाबत तारांकित प्रश्न

चिपळूण : मार्गताम्हाणे औद्योगिक क्षेत्राकरिता भूसंपादनाची प्रक्रिया सुरु आहे. याबाबत ६ (अ)ची नोटीस काढून शेतकऱ्यांच्या सातबारा उतारावर भूसंपादनाचा पेन्सील शेरा लिहिण्यात आला आहे. या औद्योगिक क्षेत्रासाठी चिपळूण व गुहागर तालुक्यातील १४ गावांतील जमीन संपादीत होत आहे. त्यात शेतकऱ्यांच्या बागायती जमिनी, शेतजमिनी व विकसित होणाऱ्या जमिनी जात असल्यामुळे स्थानिकांचा या एमआयडीसीला प्रचंड विरोध आहे. याबाबत आमदार सदानंद चव्हाण यांनी नागपूर अधिवेशनामध्ये तारांकित प्रश्नाद्वारे हा विषय सभागृहात उपस्थित करताना याप्रश्नी स्थानिकांवर अन्याय करू नये, अशी मागणी केली.या प्रकल्पासाठी स्थानिकांच्या आंबा व काजू बागायतींच्या बहुमोल जमिनी जात असून, स्थानिक शेतकरी भूमीहीन होणाऱ्या मार्गावर आहेत. तसेच लगतच्या लोटे एमआयडीसी येथील प्रदूषणकारी कारखान्यांमुळे दाभोळखाडी, वाशिष्ठी नदी यांच्याबरोबर परिसरात होत असलेले प्रदूषण पाहता स्थानिक जनतेमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. त्यामुळे संबंधित १४ गावातील ग्रामसभांमार्फत ठराव व निवेदने शासनाला देऊन आपला विरोध दर्शवला होता. स्थानिक जनतेवर अन्याय न होता ही एमआयडीसी रद्द करुन संबंधित शेतकऱ्यांच्या ७/१२ उताऱ्यावरील पेन्सील नोंदी काढून टाकणार का? असा प्रश्न आमदार सदानंद चव्हाण यांनी सभागृहात उपस्थित केला. या प्रश्नात स्थानिकांवर कोणत्याही प्रकारे अन्याय होऊ नये, असे ते म्हणाले.उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी यावर सांगितले की, या औद्योगिक क्षेत्रासाठी भूसंपादनाची कार्यवाही उपविभागीय अधिकारी, चिपळूण यांच्यामार्फत सुरु असून, त्याला संबंधित खातेदार व ग्रामस्थ यांचा विरोध होत आहे. या संदर्भात शासन स्तरावर बैठका घेण्यात आल्या आहेत. भविष्यात कोकणात प्रदूषणकारी कारखाने येणार नाहीत, असे आपले धोरण असल्यामुळे नियोजित औद्योगिक वसाहतीमध्ये कोणत्याही परिस्थितीत प्रदूषणकारी कारखाने येणार नाहीत.भूसंपादन करतेवेळी बागायती व गावठाणाच्या जागा बाधीत होणार नाहीत व सक्तीचे भूसंपादन करण्यात येणार नाही, अशा प्रकारचे नियोजन करण्यात येईल. पुर्नसर्वेक्षण करुन स्थानिक ग्रामस्थ, शेतकरी व स्थानिक लोकप्रतिनिधी यांना विश्वासात घेऊन मार्गताम्हाणे औद्योगिक वसाहतीबाबत निर्णय घेण्यात येईल, असे सांगितले. (प्रतिनिधी)सातबारा उताऱ्यावर भूसंपादनाचा पेन्सिल शेरा.मार्गताम्हाणे औद्योगिक क्षेत्राकरिता भूसंपादनाची प्रक्रिया सुरु.चिपळूण व गुहागर तालुक्यातील १४ गावांतील जमीन होतेय संपादीत.बागायती, शेतजमिनी बाधित होणार असल्याने स्थानिकांचा जोरदार विरोध.स्थानिक शेतकरी भूमीहीन होण्याच्या मार्गावर.