शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरद पवार उलगडलेलं, पण न उमजलेलं कोडं, तर अजित पवार...'; CM फडणवीसांचे 'रॅपिड फायर' उत्तरे, शिंदे-ठाकरेंबद्दल काय म्हणाले? 
2
पुराचा धसका! चिखलातील स्वप्नांचा शोध..; पिकेच नाही तर मातीही वाहून गेल्याने भविष्य संकटात
3
भारतीय औषध उद्योगाला ‘ट्रम्प’ झटका! १०.५ अब्ज डॉलरची निर्यात धोक्यात, अमेरिकेलाही बसणार झळ
4
Maharashtra Rain Alert: पुन्हा अतिवृष्टीचे संकट? आज, उद्या 'या' जिल्ह्यांत पाऊस घालणार धुमाकूळ, IMD सतर्कतेचा इशारा
5
Happy Birthday Google! २७ वा वाढदिवस साजरा करतोय गुगल! तुम्हाला Google चा फुल फॉर्म माहितीये का आणि कसं पडलं हे नाव?
6
२५ जण, ६ वाहनं... १ मिनिटात ९ कोटींवर डल्ला; दागिन्यांच्या दुकानात फिल्मी स्टाईल दरोडा
7
'शार्क टँक' फेम अश्नीर ग्रोव्हरला 'बिग बॉस १९'कडून ईमेल, वाइल्ड कार्ड एन्ट्रीची ऑफर; म्हणाला- "आधी सलमान खानला..."
8
TATA च्या बहुप्रतिक्षित आयपीओची तारीख अखेर ठरली, 'या' दिवशी मिळणार गुंतवणूकीची संधी, चेक करा डिटेल्स
9
"उद्ध्वस्त एअरबेस, जळालेले हँगर हा तुमचा विजय?"; भारताची पाकिस्तानला सणसणीत चपराक
10
काळाचा घाला! गुरुग्राममधील भीषण अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू, थारचा चक्काचूर
11
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केली तर २४ महिन्यांनंतर किती रुपये मिळतील? पटापट पाहा कॅलक्युलेशन
12
केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी, प्रस्ताव मिळताच मदतनिधी देणार; PM नरेंद्र मोदींचं आश्वासन
13
चैतन्यनंदचे काळे कारनामे! मुलींची निवड करुन त्यांना कसं बनवायचा गुलाम?, खळबळजनक खुलासा
14
राज्यातील ८९ फार्मसी महाविद्यालयांची मान्यता रद्द; तंत्रशिक्षण विभागाचा मोठा निर्णय
15
आजचे राशीभविष्य, २७ सप्टेंबर २०२५: जमीन, घर अथवा वाहन खरेदीसाठी आजचा दिवस अनुकूल नाही
16
ठाण्यात भाजपा-शिंदेसेनेत संघर्ष; एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षतेत बैठकीला गणेश नाईकांचा ‘बहिष्कार’
17
आधी नगरपालिका की जिल्हा परिषद?;निवडणूक आयोगाची दोन्हींसाठी तयारी सुरू
18
कुजबुज! ओल्या दुष्काळात काजू-बदामची चर्चा; शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी अन् राजकीय चिखलफेक
19
१६५ तोळे सोने, दोन किलो चांदी अन् ११ लाख राेख देऊनही छळ; मायानगरी मुंबईत विवाहितेचा गर्भपात
20
मढ बेट बनावट नकाशा प्रकरणाची गहाळ फाइल शोधा, अन्यथा गुन्हा दाखल करा; हायकोर्टाचे निर्देश

सेना-भाजपमध्ये कोणतेही वाद नाहीत : दानवे

By admin | Updated: June 23, 2015 00:48 IST

आम्ही शिवसेनेशी सुसंवाद साधू, चर्चा करु व पंतप्रधानांकडे ते मांडू, परंतु, आमच्यात यावरुन वाद नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी कोकणातही भाजप विशेष लक्ष देणार

चिपळूण : शिवसेना-भाजपची गेली २५ वर्ष युती आहे. युतीत कोणताही वाद नाही. एखाद्या विषयावर आमचे एकमत नसणे हा काही वाद नाही. जैतापूर प्रकल्पाबाबत त्यांची व आमची भूमिका एकमेकांना माहित आहे. त्यामुळे तो काही वादाचा मुद्दा नाही असे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी पत्रकार परिषदेत केले. भारतीय जनता पक्षाचे राज्यभर महासंपर्क अभियान सुरु आहे. याची सुरुवात कोकणातून होत आहे. महाड, चिपळूण व कुडाळ असे तीन ठिकाणी कार्यक्रम होत आहेत. आपला हा दोन दिवसाचा कोकण दौरा असून राज्यात भाजपाने १ कोटी ५ लाख सदस्य नोंदणी केली आहे. आता या सदस्यांशी संपर्क अभियान सुरु केले आहे. आम्ही घरोघरी जावून त्यांच्याशी संपर्क करणार आहोत. त्यांची माहिती घेवून ओळख करुन घेणार आहोत. सरकार व पक्ष यांच्यात समन्वय साधून भविष्यात भाजपच्या वाढीसाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. त्याचा फायदा होईल असे दानवे यांनी स्पष्ट केले. सेना-भाजप वादाबाबत ते म्हणाले, आमच्यात वादच नाहीत. जैतापूर प्रकल्पाबाबत दोन वेळा बैठका झाल्या. जैतापूरबाबतची आमची भूमिका शिवसेनेला माहित आहे. हा प्रकल्प आम्ही पूर्ण करणारच त्याला त्यांचा विरोध आहे. वीजेची मागणी व पुरवठा यामध्ये साम्य राखायचे असेल तर जैतापूर प्रकल्प होणे गरजेचे आहे. त्यामध्ये कोणता मुद्दा त्यांचा अडचणीचा आहे याबाबत आम्ही शिवसेनेशी सुसंवाद साधू, चर्चा करु व पंतप्रधानांकडे ते मांडू, परंतु, आमच्यात यावरुन वाद नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी कोकणातही भाजप विशेष लक्ष देणार असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)