शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
3
आमदार, खासदार विकत घ्यायला पैसे आहेत पूल बांधायला नाही? मावळ दुर्घटनेवरुन राऊतांचा सवाल
4
Post Office च्या 'या' स्कीममध्ये हवी तितकी खाती उघडू शकता, हमी परताव्यासह मिळेल Tax मध्येही सूट
5
इंग्लंडविरूद्धच्या टेस्टसाठी शार्दुल ठाकूरला 'प्लेइंग ११'मध्ये संधीची शक्यता, 'या' खेळाडूला डच्चू?
6
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
7
Israel-Iran War : भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
8
"आई कुठे काय करते मला सोडायची नव्हती पण...", संजनाची भूमिका साकारलेल्या दिपाली पानसरेने सांगितलं नेमकं कारण
9
"मंत्रालयातून उडी मारावी लागेल अशी वेळ.."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याची बिकट अवस्था, म्हणाला- "वय झाल्यामुळे.."
10
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
11
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
12
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
13
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
14
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
15
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
16
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
17
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
18
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
19
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
20
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण

पुरातत्वीय वारसास्थळांमध्ये केळशीची प्राचीन वाळूटेकडीही नाही!

By admin | Updated: September 26, 2016 23:16 IST

कोकणची उपेक्षाच : हजारो वर्षांचा इतिहास जागतिक स्तरावर बेदखलच--पर्यटनदिन विशेष

चिपळूण : निश्चित कालमापन असलेली त्सुनामीनिर्मित जगातील एकमेव वाळूची टेकडी ठरलेल्या, पुरातत्त्व संशोधक डॉ. अशोक मराठे संशोधित कोकण किनारपट्टीवरील दापोली तालुक्यातील केळशी येथील टेकडीचा समावेश, सध्या तिला पोहोचू लागलेल्या हानीच्या पार्श्वभूमीवर जागतिक पुरातत्त्वीय वारश्यात होण्याची गरज आहे. जागतिक पुरातत्त्वीय वारसास्थळांमध्ये नॅरोगेज नेरळ -माथेरानची टॉयट्रेनवगळता हजारो वर्षांचा इतिहास असलेल्या कोकणातील एकाही स्थळाचा समावेश नाही.गुहागरजवळच्या पालशेत गावी ९० हजार वर्षांपूर्वीची मानवनिर्मित हत्यारे त्यांना सापडली. केळशी-आंजर्लेपासून विजयदुर्ग-सिंधुदुर्ग किल्ल्यापर्यंत डॉ. मराठे यांना साधारणत: आठ हजार वर्षांपूर्वीचे मानवनिर्मित बांधकाम खोल समुद्रात सापडले. पणजीच्या नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ ओशनोग्राफीने त्यास दुजोरा दिला आहे.गुहागर - दापोली खाडी किनाऱ्यावर कर्दे गावी नवव्या शतकात बुडालेली पुरातन बोट मिळाली. जोग नदीच्या मुखाजवळ बिरवाडी गावात दहाव्या शतकातील घर मिळाले. गुहागरात प्राचीन असंख्य कालवे आहेत. आंतरराष्ट्रीय समुद्रतज्ज्ञ डॉ. सारंग कुलकर्णी यांनी जगभरातील समुद्रतळाचे सौंदर्य न्याहाळून कोकणात समुद्रतळाशी जगापेक्षा वेगळी समृद्धी असल्याचे सिद्ध केले आहे. वाळूच्या टेकडीचे केळशी गाव भारजा नदीच्या दक्षिणेला वसले आहे. नदीच्या मुखाजवळील प्रदेशात आणि किनाऱ्यालगत जुन्या वस्तीचे अवशेष सापडतात. हे अवशेष सुमारे १८ मीटर वाळूच्या थराखाली आढळले आहेत. प्रा. श्रीकांत कार्लेकर यांनी १९९०मध्ये या टेकडीचा शोध लावला. गत दशकात डॉ. अशोक मराठे यांनी याबाबतचे सर्व समावेशक संशोधन पुढे आणले. वाळूच्या टेकडीच्या तळापासून चार मीटर उंचीवर मिळालेल्या कोळशाचे कर्ब-१४ पद्धतीने कालमापन केले असता ११७० ते ११९० वर्षांपूर्वी काळ मिळाला आहे. केळशी येथे केलेल्या शोधनकार्यात काही भांडी, घडे आणि खापरं मोठ्या प्रमाणावर मिळाली. गोलाकार काचेच्या भांड्यांचे आणि काचेच्या पेल्यांचे तुकडे व बांगड्यांचे तुकडे सापडले. तीस वर्षे वयाच्या दोन माणसांच्या कवट्या आणि एका लहान बालकाचा सांगाडाही मिळाला. अशाच उत्खननात टेकडीच्या पायथ्याशी जेथे आज भरतीचे पाणी दीड मीटर उंचीपर्यंत येते, तेथे १.२ मी. व्यासाची जांभ्या दगडात बांधलेली विहीर आढळून आली आहे. या विहिरीच्या आत आणि आसपास मिळणाऱ्या खापरांवरून ही विहीर शिलाहार काळातील (इ.स. १०००) असल्याचे स्पष्ट झाले आहे. पृष्ठवंशिय आणि पाठीचा कणा असलेल्या प्राण्यांची हाडे इथल्या शोधनकार्यात सापडली. त्यात पाळीव गुरे, म्हैस, हरिण, समुद्री कासव व मासे यांचा समावेश आहे. वाळूच्या टेकडीच्या माथ्यावर गाडल्या गेलेल्या दोन कवट्यांच्या जवळच तांब्याची सहा नाणी सापडली. ही नाणी चांगल्या स्थितीत असून त्या वरील मजकूरही सुस्पष्ट आहे. अल सुलतान अहमदशाह बिन अहमद बिन अल हसन अल बहामनी ८३७ असा मजकूर त्यावर आहे. त्यामुळे ही नाणी बहामनी सुलतान अहमदशाह पहिला यांनी हिजरी सन ८३७ म्हणजेच इ. स. १४३३ मध्ये वापरात आणलेली आहेत हे नक्की झाले. केळशी गावाचा उल्लेख इतिहासात अनेक ठिकाणी आढळतो. सारे उल्लेख १६०१ नंतरचे आहेत. केळशी येथील विहिरीच्या पुराव्यावरून आणि आजूबाजूच्या पुरातत्त्वीय अवशेषावरून इ. स. १५ व्या शतकापर्यंत समुद्राची पातळी ही तीन ते चार मीटरने कमीच होती हे नक्की होते. ही सर्वच ठिकाणे बेदखल राहिली आहेत. (प्रतिनिधी)रस्ता नेण्याचे हट्टामुळे टेकडीचा ऱ्हास समुद्र किनाऱ्यावरून रस्ता नेण्याचे हट्टामुळे टेकडीचा ऱ्हास झाल्याची स्पष्ट भूमिका केळशीतील ज्येष्ठ कार्यकर्ते मनोहर वर्तक यांनी मांडली आहे. केळशी खाडी, साखरी, आतगाव, आंबोलीमार्गे वेसवीकडे जातो. या जुन्या मार्गावरील गावांना मुख्य प्रवाहात या रस्त्यामुळे आणणे शक्य होणार होते.टेकडी निसर्गापुढे हतबलपुलाची जागा बदलली जाऊन उंची कमी झाली असती, पर्यायाने खर्च कपात झाली असती. परंतु वर्तमान वाळू टेकडीचा ऱ्हास करणारा, रेवस-रेड्डी रस्ता हा बेलेश्वर मंदिरापासून पश्चिमेकडे वळविला गेला.रस्ता अगदी घरांना लागून आला, घरांना धोका निर्माण झाला. रस्ता नेताना रस्त्याकरिता केवडा, मारवेल, सुरु या झाडांचे असलेले जंगल जेसीबीने मुळापासून नष्ट केले गेले.