शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
3
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
4
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
5
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
6
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
7
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
8
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
9
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
10
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
11
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
12
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
13
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
15
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
16
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
17
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
18
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
19
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
20
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!

वाईट प्रवृत्तीच्या नाशासाठी एकत्रित काम करावे लागेल

By admin | Updated: July 16, 2014 23:16 IST

दीपक केसरकर : शिवसेना प्रवेशाच्या घोषणेनंतर जिल्ह्यात शिवसेनेकडून जंगी स्वागत

वाईट प्रवृत्तीच्या नाशासाठी एकत्रित काम करावे लागेलदीपक केसरकर : शिवसेना प्रवेशाच्या घोषणेनंतर जिल्ह्यात शिवसेनेकडून जंगी स्वागतकणकवली : जिल्ह्यातील वाईट प्रवृत्तीचा नाश करण्यासाठी शिवसेना-भाजपाला एकत्रित काम करावे लागेल. माझी समजूतदारपणाची भूमिका असून सावंतवाडीची विधानसभेची जागा दुसऱ्याला द्यावी असा उद्धव ठाकरेंनी निर्णय घेतल्यास आपली कोणतीही हरकत नाही, असे प्रतिपादन आमदार दीपक केसरकर यांनी केले. येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शिवसेना प्रवेशाचा निर्णय जाहीर केल्यानंतर जिल्ह्यात दाखल झालेल्या केसरकर यांचे कणकवली शिवसैनिकांनी जंगी स्वागत केले. जिल्हाप्रमुख वैभव नाईक, उपजिल्हाप्रमुख अभय शिरसाट, आबू पटेल, राजू शेटये, एकनाथ नारोजी, महिला आघाडीप्रमुख स्रेहा तेंडुलकर, श्रेया परब, तालुकाप्रमुख सचिन सावंत, बबन शिंदे, विलास साळसकर, अशोक रावराणे, राजन नाईक, रूपेश राऊळ, विवेक आरोलकर, जिल्हा परिषद सदस्य रमाकांत ताम्हाणेकर, अ‍ॅड.हर्षद गावडे, राजू राठोड, नगरसेवक सुशांत नाईक, शब्बीर मणियार, नंदू शिंदे, शैलेश तावडे, अनंत पिळणकर आदी उपस्थित होते. आमदार केसरकर म्हणाले की, मी जेव्हा राष्ट्रवादीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला तेव्हा भाजपाकडून मला निमंत्रण मिळाले होते. राज्याबाहेरील एका मोठ्या नेत्याने माझ्याबरोबर चर्चा केली होती. परंतु राणेप्रवृत्तीला विरोध करण्याची ताकद शिवसेनेतच आहे. खासदार विनायक राऊत यांच्या माध्यमातून ते दिसून आले. आपला महायुतीला पूर्ण पाठिंबा आहे. राष्ट्रवादीतून बाहेर पडण्यापूर्वी प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्याशी माझी प्रदीर्घ चर्चा झाली होती. आज अजित पवार यांनी माझ्या सहकाऱ्यांना बोलावून घेतले आहे. राष्ट्रवादीतील माझे सहकारीही कुठल्याही स्थितीत दहशतवादी प्रवृत्तीला पाठिंंबा देणार नाहीत. उद्धव ठाकरे हे संयमी नेतृत्व आहे. तेवढेच निर्णय घेताना ते कठोर आहेत. स्थानिकांचे रक्षण करून विकास झाला पाहिजे. लोकांना विश्वासात घेतल्यास प्रकल्पांना विरोध होत नाही. विकासासाठी येथे कारखाने नाहीत, बचतगटांच्या हाताला काम नाही, मी करेन तोच विकास असे म्हणणाऱ्यांना हद्दपार करायचे असेल तर विधानसभेच्या तीनही जागा जिंकाव्या लागतील, असे केसरकर म्हणाले. (प्रतिनिधी)५ आॅगस्टला प्रवेश राष्ट्रवादी कॉँग्रेसला रामराम ठोकला असला तरी आमदारकीचा राजीनामा २३ जुलै रोजी सादर करणार आहे. माझ्या मतदारसंघाचा दौरा करून राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत प्रवेशामागील भूमिका मांडणार असून ५ आॅगस्ट रोजी शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे आमदार दीपक केसरकर यांनी सांगितले. राजकारण सोडणार होतोलोकसभा निवडणुकीनंतर खरे तर मला राजकारणातून निवृत्त व्हायचे होते. मात्र, माझ्याबरोबर दहशतवादाविरोधातील लढाई लढलेल्या सहकाऱ्यांनी आणि जनतेने मला त्यापासून परावृत्त केले. आम्ही या लढाईत तुमच्यासोबत राहिलो आता अर्ध्यावर लढाई सोडू शकत नाही, असे सर्वांचे म्हणणे होते. त्यामुळे आपण राजकारण सोडले नाही.