शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

वाईट प्रवृत्तीच्या नाशासाठी एकत्रित काम करावे लागेल

By admin | Updated: July 16, 2014 23:16 IST

दीपक केसरकर : शिवसेना प्रवेशाच्या घोषणेनंतर जिल्ह्यात शिवसेनेकडून जंगी स्वागत

वाईट प्रवृत्तीच्या नाशासाठी एकत्रित काम करावे लागेलदीपक केसरकर : शिवसेना प्रवेशाच्या घोषणेनंतर जिल्ह्यात शिवसेनेकडून जंगी स्वागतकणकवली : जिल्ह्यातील वाईट प्रवृत्तीचा नाश करण्यासाठी शिवसेना-भाजपाला एकत्रित काम करावे लागेल. माझी समजूतदारपणाची भूमिका असून सावंतवाडीची विधानसभेची जागा दुसऱ्याला द्यावी असा उद्धव ठाकरेंनी निर्णय घेतल्यास आपली कोणतीही हरकत नाही, असे प्रतिपादन आमदार दीपक केसरकर यांनी केले. येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शिवसेना प्रवेशाचा निर्णय जाहीर केल्यानंतर जिल्ह्यात दाखल झालेल्या केसरकर यांचे कणकवली शिवसैनिकांनी जंगी स्वागत केले. जिल्हाप्रमुख वैभव नाईक, उपजिल्हाप्रमुख अभय शिरसाट, आबू पटेल, राजू शेटये, एकनाथ नारोजी, महिला आघाडीप्रमुख स्रेहा तेंडुलकर, श्रेया परब, तालुकाप्रमुख सचिन सावंत, बबन शिंदे, विलास साळसकर, अशोक रावराणे, राजन नाईक, रूपेश राऊळ, विवेक आरोलकर, जिल्हा परिषद सदस्य रमाकांत ताम्हाणेकर, अ‍ॅड.हर्षद गावडे, राजू राठोड, नगरसेवक सुशांत नाईक, शब्बीर मणियार, नंदू शिंदे, शैलेश तावडे, अनंत पिळणकर आदी उपस्थित होते. आमदार केसरकर म्हणाले की, मी जेव्हा राष्ट्रवादीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला तेव्हा भाजपाकडून मला निमंत्रण मिळाले होते. राज्याबाहेरील एका मोठ्या नेत्याने माझ्याबरोबर चर्चा केली होती. परंतु राणेप्रवृत्तीला विरोध करण्याची ताकद शिवसेनेतच आहे. खासदार विनायक राऊत यांच्या माध्यमातून ते दिसून आले. आपला महायुतीला पूर्ण पाठिंबा आहे. राष्ट्रवादीतून बाहेर पडण्यापूर्वी प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्याशी माझी प्रदीर्घ चर्चा झाली होती. आज अजित पवार यांनी माझ्या सहकाऱ्यांना बोलावून घेतले आहे. राष्ट्रवादीतील माझे सहकारीही कुठल्याही स्थितीत दहशतवादी प्रवृत्तीला पाठिंंबा देणार नाहीत. उद्धव ठाकरे हे संयमी नेतृत्व आहे. तेवढेच निर्णय घेताना ते कठोर आहेत. स्थानिकांचे रक्षण करून विकास झाला पाहिजे. लोकांना विश्वासात घेतल्यास प्रकल्पांना विरोध होत नाही. विकासासाठी येथे कारखाने नाहीत, बचतगटांच्या हाताला काम नाही, मी करेन तोच विकास असे म्हणणाऱ्यांना हद्दपार करायचे असेल तर विधानसभेच्या तीनही जागा जिंकाव्या लागतील, असे केसरकर म्हणाले. (प्रतिनिधी)५ आॅगस्टला प्रवेश राष्ट्रवादी कॉँग्रेसला रामराम ठोकला असला तरी आमदारकीचा राजीनामा २३ जुलै रोजी सादर करणार आहे. माझ्या मतदारसंघाचा दौरा करून राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत प्रवेशामागील भूमिका मांडणार असून ५ आॅगस्ट रोजी शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे आमदार दीपक केसरकर यांनी सांगितले. राजकारण सोडणार होतोलोकसभा निवडणुकीनंतर खरे तर मला राजकारणातून निवृत्त व्हायचे होते. मात्र, माझ्याबरोबर दहशतवादाविरोधातील लढाई लढलेल्या सहकाऱ्यांनी आणि जनतेने मला त्यापासून परावृत्त केले. आम्ही या लढाईत तुमच्यासोबत राहिलो आता अर्ध्यावर लढाई सोडू शकत नाही, असे सर्वांचे म्हणणे होते. त्यामुळे आपण राजकारण सोडले नाही.