शहरं
Join us  
Trending Stories
1
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
2
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
3
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
4
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
5
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
6
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
7
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
8
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
9
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
10
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
11
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
12
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
13
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
14
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
15
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
16
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
17
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
18
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
19
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
20
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 

देवगडच्या विकासासाठी एकविचाराने काम करण्याची गरज

By admin | Updated: July 3, 2016 23:04 IST

नीतेश राणे : देवगड येथे कोकण माती प्रतिष्ठानतर्फे गुणवंतांचा सत्कार

देवगड : देवगडचा विकास करण्यासाठी आपण व्हीजन तयार केले असून ज्यावेळी देवगडला २४ तास पाणी मिळेल त्याचवेळी खऱ्या अर्थाने देवगडचा विकास झाला असे म्हणता येईल. यासाठी राजकीय चष्मा बाजूला ठेवून विकासाकडे बघण्याची गरज असून जामसंडे देवगडच्या विकासासाठी कुठलीही तडजोड करणार नाही. तसेच स्थानिक विकासासाठी एकविचाराने खांद्याला खांदा लावून काम करण्याची गरज आहे. देवगड जामसंडे शहरातील जनतेने काय चूक केली की, देवगड तालुका २९ वर्षे मागासलेला राहीला असल्याचे मत आमदार नीतेश राणे यांनी येथे व्यक्त केले. देवगड येथील इंद्रप्रस्थ सभागृहात कोकण माती प्रतिष्ठान देवगड व सिंंधुरत्न फाऊंडेशन सिंंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने येथे समाजातील विविध मान्यवरांचा सत्कार तसेच विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, कोकणमाती प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश गायकवाड, प्रकाश राणे, डॉ. मिलिंद कुळकर्णी, अ‍ॅड. अविनाश माणगांवकर, बाळ खडपे, डॉ. सुनील आठवले, निशिकांत साटम, सभापती रवींद्र जोगल, संजय बोंबडी, चारूदत्त सोमण आदी उपस्थित होते. राणे म्हणाले की, २९ वर्षे देवगडचा विकास खुंटला असून हा आपणाला आता भरून काढायचा आहे. स्थानिक विकासाची तळमळ नसल्यानेच यापूर्वी असे कार्यक्रम झाले नाहीत. देवगड विकासासाठी पक्षविरहित संवाद साधण्यासाठी आपण आलो आहोत. येथील प्रश्न मांडण्याची तळमळ, विकासात्मक प्रश्न मांडण्याची जिद्द बाळगुन आपण काम करीत आहोत. केवळ घोषणाबाजी पेक्षा स्थानिक विकासाप्रती किती निष्ठा आहे हे महत्वाचे आहे. विकासासाठी दृष्टी बदलण्याची गरज आहे. पायाभूत सुविधाच नसतील तर आदर्श गाव कसा तयार होणार? स्थानिक प्रश्नासाठी जनतेने आपल्यावर टाकलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. स्थानिक, मूळ प्रश्नांना विरोधक बगल देत वारंवार घोषणाबाजी करीत आहेत. आमचा पराभव करण्याची भाषा करून येथील आरोग्य, पाणी प्रश्न सुटणार आहेत का असा प्रश्नही त्यांनी विचारला. यावेळी त्यांनी विमानतळाच्या विषयावरून पालकमंत्री दीपक केसरकर यांना तर मेट्रोच्या विषयावरून प्रमोद जठार यांच्यावर टिप्पणी केली. यावेळी देवगड जामसंडे शहर विकासावर निशिकांत साटम, दत्ता सामंत, डॉ. सुनिल आठवले, चारूदत्त सोमण, सुरेश सोनटक्के आदींनी आपली मते मांडली. यावेळी विविध मान्यवरांचा तसेच विद्यार्थ्यांचा गुणगौरव आमदार नीतेश राणे यांच्या हस्ते झाला. देवगडवरील संकेतस्थळाचे उद्घाटनही त्यांनी केले. तसेच या कार्यक्रमाच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेचे बक्षिस वितरणही त्यांच्या हस्ते झाले. प्रास्ताविक प्रकाश गायकवाड यांनी केले. सुत्रसंचालन करून आभार श्रीजित मराठे यांनी मानले. यावेळी घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. निबंध स्पर्धेत संजीव राऊत, नीलेश जाधव अनुक्रमे प्रथम व द्वितीय आले. तर संजय धुरी व डॉ. सुनील आठवले यांना विभागून तृतीय क्रमांक दिला. विनायक अपराज व श्रेयशी शिरसाट यांना उत्तेजनार्थ मिळाला. तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींचाही सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. (प्रतिनिधी)