शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सुप्रीम कोर्टाला विचारले १४ प्रश्न; नेमकं काय घडलं?
2
लष्करी जवानाकडे हेरॉईन सापडले; श्रीनगरहून पंजाबला करत होता तस्करी, अटकेमुळे खळबळ
3
हृदयद्रावक! डोक्यावरती अक्षता पडल्या अन् दुसऱ्याच दिवशी सकाळी नववधूला मृत्यूने गाठलं
4
Maharashtra Politics :'फडणवीसांनी डोनाल्ड ट्रम्प यांनाच कुलदैवत मानावं', संजय राऊतांची भाजपावर टीका
5
Mumbai: मेट्रो-३ च्या प्रवासात मोबाइलला 'नो नेटवर्क', प्रवाशांची उडते तारांबळ, तिकीट काढण्यासाठी मार्गदर्शक सूचना...
6
वेळ काय, तुम्ही बोलता काय...; कर्नल सोफिया यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या विजय शाहंना कोर्टाने फटकारलं
7
४० हजारांचं पॅकेज, ५ तासांची सर्जरी... हेअर ट्रान्सप्लांट करणाऱ्या अनुष्काबद्दल धक्कादायक खुलासे
8
तुर्कीच्या सफरचंदावर घातलेली बंदी पाकिस्तानींना झोंबली; पुण्याच्या सुयोग झेंडेंना धमक्यांचे फोनवर फोन
9
हेअर ट्रांसप्लांटमुळे दोघांचा मृत्यू; ही सर्जरी खरंच सुरक्षित आहे का? जाणून घ्या सविस्तर माहिती...
10
दोन्ही मुलांना मैदानात उतरवलं, भारताचंही नाव घेतलं! इम्रान खानच्या खेळीनं पाकच्या राजकारणात खळबळ  
11
रोहित शर्मा 'भलतेच काहीतरी' वाटावे असे बोलून गेला, मग लगेच असं दिलं स्पष्टीकरण (VIDEO)
12
ट्रम्प यांचं टॅरिफ लागून अवघा काही वेळही झाला नाही आणि भरला सरकारचा खजिना, कुठून आला पैसा?
13
जर एखाद्या देशाने 'Nuclear' हल्ल्याचा निर्णय घेतला तर त्याची प्रक्रिया काय, वेळ किती लागतो? 
14
कोंकणा सेन शर्मा घटस्फोटानंतर पुन्हा प्रेमात? ७ वर्ष लहान अभिनेत्याला डेट करत असल्याच्या चर्चा
15
पाकिस्तानला लोनवर लोन... चीनसोबत अमेरिकेची वाढती मैत्री तर नाही ना कारण? भारताचं टेन्शन काय?
16
Datta Upasana: जगातील एकमेव दत्तहस्त पूजास्थान; जिथे दत्त महाराजांच्या हाताचे छाप उमटले!
17
"ती भारताबाहेर गेली अन्...", दिग्दर्शकाने सांगितलं 'रेड २'मध्ये इलियानाला न घेतल्याचं कारण
18
नेहा पेंडसेच्या लेकींना पाहिलंत का?, फॅमिलीसोबत बालीत करतेय व्हॅकेशन एन्जॉय
19
रुपाली गांगुलीला सेटवर कुत्रा चावला? 'अनुपमा' फेम अभिनेत्रीचा राग अनावर, म्हणाली- "हात जोडून सांगते.."
20
ऑपरेशन सिंदूर: पाकमधील गुप्तहेरांकडून सिग्नल आला, भारतीय सैन्याने पाच दिवस आधीच हल्ला चढवला

२७ शाळांमध्ये शिक्षक नाहीत

By admin | Updated: September 26, 2014 23:34 IST

शैक्षणिक सत्र : पालकांची चिंता वाढली, अभ्यासक्रम अपूर्ण राहण्याची भीती

रत्नागिरी : पहिले शैक्षणिक सत्र संपले तरी जिल्ह्यातील २७ शाळांमध्ये अद्याप एकाही शिक्षकाचा पत्ता नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात दिसून येत आहे. जवळच्या गावातील किंवा वाडीतील शिक्षकांकडे संबंधित शाळांची जबाबदारी तात्पुरत्या स्वरूपात सुपूर्द करण्यात आल्याने पालकवर्ग चिंताग्रस्त झाला आहे.सर्व शिक्षा अभियानांतर्गत व आरटीई कायद्यानुसार शिक्षण सक्तीचे करण्यात आले. एकीकडे शिक्षणाचा प्रसार शासन करीत आहे. शाळांचा दर्जा सुधारण्याचा प्रयत्न सुरू आहे. असे असताना दुसरीकडे विद्यार्थी शाळेत असताना शिक्षकांचाच पत्ता नाही. शाळेचे पहिले शैक्षणिक सत्र संपले आहे. काही शाळांमध्ये सहामाही परीक्षा सुरू झाल्या आहेत, तर जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये एक तारखेपासून सहामाई परीक्षा सुरू होणार आहेत. परीक्षा तोंडावर असताना संबंधित शाळांमध्ये अद्याप शिक्षकांची नियुक्ती करण्यात आलेली नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाईल का, अशी भीती पालकांच्या मनात निर्माण झाली आहे.इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतच्या शाळेत पटसंख्येनुसार शिक्षकांची नियुक्ती करण्यात येते. काही शाळांमध्ये एकापेक्षा अधिक शिक्षक आहेत. परंतु जिल्ह्यातील २७ शाळांमध्ये शिक्षक नसल्यामुळे बाजूच्या शाळेतील शिक्षकांकडे अतिरिक्त जबाबदारी सोपविण्यात आली आहे. पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना अध्यापन करण्याबरोबरच इतर विविध शैक्षणिक उपक्रम राबवावे लागतात. त्यामुळे शैक्षणिक अध्यापन तसेच विविध शैक्षणिक व प्रशासकीय कामकाज पूर्ण करीत असताना अतिरिक्त शाळांमधील शिक्षकांचे अध्यापन कसे पूर्ण करायचे हा प्रश्न शिक्षकांसमोर उभा ठाकला आहे. छोट्या विद्यार्थ्यांसाठी पूर्ण वेळ द्यावा लागतो, परंतु तसे होत नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य अंधारात दिसून येत आहे.रत्नागिरी जिल्ह्यात दोन हजार ७४८ शाळा असून, ९ हजार ५०० इतकी शिक्षकांची संख्या आहे. मंडणगड व लांजा तालुक्यात प्रत्येकी एक, दापोली, खेड, चिपळूण तालुक्यात प्रत्येकी दोन राजापूर तालुक्यात चार, रत्नागिरी तालुक्यात १५ मिळून एकूण २७ शाळांमध्ये शून्य शिक्षक दिसून येत आहेत. अन्य तालुक्यांपेक्षा रत्नागिरी तालुक्यात शून्य शिक्षकांच्या सर्वाधिक शाळा आहेत. शैक्षणिक सत्र संपले असून, लवकरच सहामाही परीक्षा सुरू होणार आहेत. परंतु शिक्षकांची आस्थापना सूची ३० सप्टेंबर रोजी जाहीर होणार आहे. संबंधित शिक्षकांची सूची मंजूर झाल्यानंतरच जिल्ह्यातील रिक्त शिक्षकांची पदे मंजूर करण्यात येणार आहेत. त्यानंतर शून्य शिक्षक असलेल्या शाळांवरील शिक्षकांच्या नियुक्त्या केल्या जातील, असे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)