शहरं
Join us  
Trending Stories
1
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
2
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
3
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
4
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
5
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
6
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
7
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
8
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
9
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
10
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
11
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
12
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
13
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
14
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
15
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
16
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
17
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
18
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
19
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
20
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस

देशात लोकशाहीविरोधी वातावरण वाढतंय

By admin | Updated: November 18, 2016 23:53 IST

दक्षिणायन संवाद यात्रा : लेखक, सामाजिक कार्यकर्त्यांच्या चर्चेतील सूर

 कणकवली : देशात दिवसेंदिवस लोकशाही विरोधी वातावरण वाढत आहे. धार्मिक उन्माद चालू असून त्या विरोधात आवाज उठविण्यासाठीच दक्षिणायन यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. जनतेला गृहीत धरून राजकीय व्यक्ती सत्ता राबवित आहेत. तसेच सत्ताधारी धार्मिक उन्माद वाढविणाऱ्यांना प्रोत्साहन देत आहेत, असा सूर सामाजिक कार्यकर्ते, नामवंत लेखक तसेच पत्रकारांंच्या चर्चेत उमटला. ज्येष्ठ भाषातज्ज्ञ, विचारवंत डॉ. गणेश देवी यांनी देशातील असहिष्णू वातावरणाविरोधात ‘दक्षिणायन यात्रा’ देशात सुरू केली आहे. त्याअंतर्गत बहुभाषिक राष्ट्रीय दक्षिणायन संमेलन १८ ते २० नोव्हेंबर या कालावधीत मडगाव येथे होत आहे. यात सहभागी होणाऱ्यांची संवादयात्रा मुंबई ते गोवा अशी आयोजित करण्यात आली आहे. या संवाद यात्रेतील ज्येष्ठ मानसोपचार तज्ज्ञ डॉ. आशिष देशपांडे, समीक्षक मंदार काळे, पत्रकार युवराज मोहिते, यूथ मोटीव्हेटर आशुतोष शिर्के, सामाजिक कार्यकर्ते राजन इंदुलकर आदींनी समाजयात्रेच्या निमित्ताने वागदे येथील गोपुरी आश्रमाच्या सभागृहात नागरिकांशी गुरुवारी संवाद साधला. यावेळी युवराज मोहिते म्हणाले, देशात लोकशाही विरोधी आज जे वातावरण निर्माण झाले आहे; त्याविरुद्ध लोकांना बोलावेसे वाटत आहे. त्यासाठी समविचारी लोकांनी एकत्र येणे गरजेचे आहे. विशिष्ठ विचार लादला जाण्याच्या प्रकारातून माणसाच्या मूलभूत हक्कांवरच गदा येत आहे. अनेक निर्बंध लादले जात आहेत. विकासाचे चित्र उभे करण्यात येत असले तरी दुसऱ्या बाजूला माणसांच्या स्वातंत्र्याची मुस्कटदाबी केली जात आहे. यावेळी मोहिते यांनी, धर्म आणि श्रद्धेच्या नावाखाली अंधश्रद्धेचे वर्चस्व ठेऊन माणसालाच दाबले जात आहे. त्यामुळे बुवाबाजी वाढली असल्याचे मत व्यक्त केले. येथे वेगळा विचार करणाऱ्याला गुन्हेगार ठरविण्यात येत आहे. यातूनच डॉ. नरेंद्र दाभोळकर, कॉ. गोविंद पानसरे, डॉ. कलबुर्गी यांची हत्या करण्यात आली. या सगळ्यामागे राजकारण आहे. हे आता विचार करणाऱ्या वर्गाने समजून घेण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले. मंदार काळे, आशुतोष शिर्के, राजन इंदुलकर आदींनीही यावेळी विचार मांडले. यावेळी झालेल्या चर्चेत डॉ. शमिता बिरमोळे, इंद्रजीत खांबे, अर्पिता मुंबरकर, विनायक सापळे, शशिकांत कांबळी आदींनी भाग घेतला. (प्रतिनिधी)