शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
2
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
3
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
4
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
5
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
6
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
7
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
8
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
9
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
10
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
11
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
12
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
13
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
14
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
15
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
16
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
17
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
18
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
19
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
20
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?

देशात लोकशाहीविरोधी वातावरण वाढतंय

By admin | Updated: November 18, 2016 23:53 IST

दक्षिणायन संवाद यात्रा : लेखक, सामाजिक कार्यकर्त्यांच्या चर्चेतील सूर

 कणकवली : देशात दिवसेंदिवस लोकशाही विरोधी वातावरण वाढत आहे. धार्मिक उन्माद चालू असून त्या विरोधात आवाज उठविण्यासाठीच दक्षिणायन यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. जनतेला गृहीत धरून राजकीय व्यक्ती सत्ता राबवित आहेत. तसेच सत्ताधारी धार्मिक उन्माद वाढविणाऱ्यांना प्रोत्साहन देत आहेत, असा सूर सामाजिक कार्यकर्ते, नामवंत लेखक तसेच पत्रकारांंच्या चर्चेत उमटला. ज्येष्ठ भाषातज्ज्ञ, विचारवंत डॉ. गणेश देवी यांनी देशातील असहिष्णू वातावरणाविरोधात ‘दक्षिणायन यात्रा’ देशात सुरू केली आहे. त्याअंतर्गत बहुभाषिक राष्ट्रीय दक्षिणायन संमेलन १८ ते २० नोव्हेंबर या कालावधीत मडगाव येथे होत आहे. यात सहभागी होणाऱ्यांची संवादयात्रा मुंबई ते गोवा अशी आयोजित करण्यात आली आहे. या संवाद यात्रेतील ज्येष्ठ मानसोपचार तज्ज्ञ डॉ. आशिष देशपांडे, समीक्षक मंदार काळे, पत्रकार युवराज मोहिते, यूथ मोटीव्हेटर आशुतोष शिर्के, सामाजिक कार्यकर्ते राजन इंदुलकर आदींनी समाजयात्रेच्या निमित्ताने वागदे येथील गोपुरी आश्रमाच्या सभागृहात नागरिकांशी गुरुवारी संवाद साधला. यावेळी युवराज मोहिते म्हणाले, देशात लोकशाही विरोधी आज जे वातावरण निर्माण झाले आहे; त्याविरुद्ध लोकांना बोलावेसे वाटत आहे. त्यासाठी समविचारी लोकांनी एकत्र येणे गरजेचे आहे. विशिष्ठ विचार लादला जाण्याच्या प्रकारातून माणसाच्या मूलभूत हक्कांवरच गदा येत आहे. अनेक निर्बंध लादले जात आहेत. विकासाचे चित्र उभे करण्यात येत असले तरी दुसऱ्या बाजूला माणसांच्या स्वातंत्र्याची मुस्कटदाबी केली जात आहे. यावेळी मोहिते यांनी, धर्म आणि श्रद्धेच्या नावाखाली अंधश्रद्धेचे वर्चस्व ठेऊन माणसालाच दाबले जात आहे. त्यामुळे बुवाबाजी वाढली असल्याचे मत व्यक्त केले. येथे वेगळा विचार करणाऱ्याला गुन्हेगार ठरविण्यात येत आहे. यातूनच डॉ. नरेंद्र दाभोळकर, कॉ. गोविंद पानसरे, डॉ. कलबुर्गी यांची हत्या करण्यात आली. या सगळ्यामागे राजकारण आहे. हे आता विचार करणाऱ्या वर्गाने समजून घेण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले. मंदार काळे, आशुतोष शिर्के, राजन इंदुलकर आदींनीही यावेळी विचार मांडले. यावेळी झालेल्या चर्चेत डॉ. शमिता बिरमोळे, इंद्रजीत खांबे, अर्पिता मुंबरकर, विनायक सापळे, शशिकांत कांबळी आदींनी भाग घेतला. (प्रतिनिधी)