शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

...तर नगरसेवकपदाचा राजीनामा द्या

By admin | Updated: October 12, 2015 00:56 IST

मतदारांकडून निषेध : प्रभागात आयोजित बैठकीत व्यक्त केल्या भावना

कणकवली : काँग्रेस नेते नारायण राणे यांनी कणकवली नगरपंचायतीच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक १ मधून दिलेल्या चार उमेदवारांना तेथील मतदारांनी भरघोस मतांनी निवडून दिले होते. मात्र, या मतदारांच्या भावनांचा विचार न करता ८ आॅक्टोबरला झालेल्या नगराध्यक्षा निवडीत अ‍ॅड. प्रज्ञा खोत यांनी गद्दारी करीत आपल्याच प्रभागातील नगरसेविकेच्या विरोधात मतदान केले. हा आमचा अपमान असून याचा आम्ही निषेध करीत आहोत. त्या स्वाभिमानी असतील तर त्यांनी आपल्या नगरसेवकपदाचा राजीनामा द्यावा; अन्यथा आम्हाला वेगळे प्रयत्न करावे लागतील. तसेच संदेश पारकर जी निशाणी देतील, त्याच्यावर पुन: निवडून येऊन दाखवावे, अशा संतप्त भावना व्यक्त करणारा ठराव प्रभाग १ मधील मतदारांनी रविवारी झालेल्या बैठकीत केल्याची माहिती नगरसेवक किशोर राणे यांनी दिली.कणकवली नगराध्यक्ष निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या घडामोडींचे पडसाद अजूनही कणकवली शहरात उमटत आहेत. रविवारी येथील मातोश्री मंगल कार्यालयात अ‍ॅड. प्रज्ञा खोत नगरसेविका म्हणून निवडून आलेल्या प्रभाग क्रमांक १ मधील मतदारांनी बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी अनेक मतदारांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. तसेच काही ठरावही घेण्यात आले. यावेळी नगरसेवक किशोर राणे, गौतम खुडकर, नगरसेविका सुविधा साटम, विठ्ठल देसाई, संदीप राणे, अजय गांगण, भूपेश राणे, शांताराम राणे, मनोहर राणे, खेमाजी राणे, सोनू देसाई, विजय पवार, सोनू कामतेकर, जावेद शेख, संदीप घाडी, नितीन मेस्त्री, बाबूराव कांबळी, महेंद्र जाधव, चारुदत्त साटम, राजन परब यांच्यासह सुमारे शंभर मतदार उपस्थित होते.या बैठकीनंतर नगरसेवक किशोर राणे यांनी बैठकीत चर्चा झालेल्या मुद्यांबाबत तसेच घेतलेल्या ठरावांबाबत पत्रकारांना माहिती दिली.ते म्हणाले, कणकवली ग्रामपंचायत असताना सरपंच म्हणून पुतळोजी राणे यांना संधी मिळाली होती. सन २0१0 मध्ये मला उपनगराध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी दिली होती, तर त्यानंतर नगराध्यक्ष म्हणून अ‍ॅड. खोत यांना संधी देण्यात आली होती. मात्र, या बाबींचा खोत यांना विसर पडला आहे. ग्रामीण भागाला पुन्हा प्रतिनिधित्व देण्यासाठी नारायण राणे यांनी सुविधा साटम यांना नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी दिली होती. परंतु, खोत यांनी त्यांच्याविरोधी मतदान केले. नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ चारही उमेदवारांनी एकत्रितपणे फोडून विकासाचे वचन मतदारांना देवासमोर दिले होते. त्यातीलच एका नगरसेविकेने सहकाऱ्यांबरोबरच मतदारांशी गद्दारी केली आहे. नगराध्यक्ष निवडणुकीत संदेश पारकर यांनी पडद्यामागून कूटनीतीचा अवलंब केला. त्यामुळे ग्रामीण भागातील मतदार यानंतर कधीही त्यांना साथ देणार नाहीत. तसेच आपला अपमान सहन करणार नाहीत, अशा भावना अनेक मतदारांनी व्यक्त केल्या असल्याचे राणे यांनी सांगितले. (वार्ताहर)आपल्या प्रभागातील मतदारांना विश्वासात घेऊन त्यांनी हा निर्णय घ्यायला हवा होता; पण तसे झाले नाही. त्यांच्या हट्टी स्वभावामुळे शहरातील लोकांना सध्या खड्ड्यांतून प्रवास करावा लागतो आहे.ज्या कार्र्यकर्त्यांनी निवडणुकीत त्यांचा प्रचार केला होता, त्यांनाही त्या ओळखत नाहीत. किरकोळ कामांसाठी अनेकवेळा नगरपंचायत कार्यालयात त्यांना फेऱ्या माराव्या लागत आहेत. हे योग्य नव्हे. इतर तीन नगरसेवकांनी आपली जनसेवा सुरु ठेवली आहे. मात्र, निवडून आल्यानंतर तीन ते चारच वेळा खोत यांनी प्रभागाला भेट दिली असेल. त्यामुळे त्यांना येथील समस्या कशा समजणार ? असाही प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला.