शहरं
Join us  
Trending Stories
1
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
2
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
3
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
4
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
5
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस
6
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
7
राज ठाकरेंचा मुद्दा, आशिष शेलारांनी दिले उत्तर; आभार मानत म्हणाले, 'त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याबद्दल...'
8
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
9
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
10
स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा
11
छांगूर बाबाने मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन ठेवली नाही
12
सकाळ, दुपार, रात्र... दिवसातून ३ वेळा पराठा खाल्ला तर काय होईल, आरोग्यावर कसा होतो परिणाम?
13
'माझा व्हिडीओ मॉर्फ करून बनवला,अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार'; संजय शिरसाटांचा इशारा
14
८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी केव्हापर्यंत लागू होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत करुन घेणं गरजेचं
15
भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल
16
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
17
Astrology: जोडीदार 'क्लिक' होत नाही अशी तरुणांची सबब; हा ग्रहांचा परिणाम समजावा का?
18
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
19
IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराजनं सांगितलं त्याच्या आगळ्यावेगळ्या सेलिब्रेशनमागचं कारण!
20
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 

Sindhudurg: समुद्राने गिळली २० फूट किनारपट्टी, तळाशील भागातील घरांना धोका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2025 16:08 IST

समुद्र आणि मुख्य रस्त्यामध्ये केवळ दहा फुटाचे अंतर बाकी

आचरा : मालवण तालुक्यातील तळाशील किनारपट्टीचा सुमारे पंधरा ते वीस फूट भूभाग समुद्राने गिळंकृत केला आहे. मुख्य रस्ता आणि समुद्र यामध्ये केवळ दहा फुटांचे अंतर राहिले असून, १५ घरांसह मुख्य रस्त्यालाही धोका निर्माण झाला आहे. याबाबत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी माजी सरपंच संजय केळूसकर यांनी केली आहे.एका बाजूने खाडीने आणि दुसऱ्या बाजूने समुद्राने वेढलेल्या तोंडवळी तळाशील भागाला पावसाळ्यात येणाऱ्या उधाणाचा दरवर्षी फटका बसत आला आहे. समुद्राच्या बाजूने दोन टप्प्यात बांधण्यात आलेल्या संरक्षक बंधाऱ्यामुळे तळाशीलचा काही भूभाग सुरक्षित असला, तरी पौर्णिमेला आलेल्या उधाणाचा फटका बसल्याने अंदाजे पंधरा फूट किनारपट्टीचा भूभाग समुद्राने गिळंकृत केला आहे. तळाशीलच्या मुख्य रस्त्यापासून काही फुटावरच समुद्र येऊन ठेपला आहे. त्यामुळे या भागातील घरांना धोका निर्माण झाला आहे.१५ घरांना धोका केळूसकर यांनी सांगितले की, तळाशील समुद्रकिनारी उर्वरित पाचशे मीटर संरक्षक बंधाऱ्याची गरज आहे. सध्याच्या उधाणामुळे बंधारा नसलेल्या किनारपट्टीचा भूभाग खचत चालला आहे. यामुळे या भागातील १५ घरांना धोका निर्माण झाला आहे. या मोसमातील अजून काही उधाणे बाकी आहेत. यामुळे तातडीने संरक्षक बंधारा बांधण्याची गरज निर्माण झाली आहे.