शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
मुंबई, पुणे, कोल्हापूर, लातूरचे १०० जण अडकले नेपाळमध्ये; प्रवास टाळा, राज्यातील पर्यटकांना सरकारच्या सूचना 
3
नेपाळचं नेतृत्व करण्यास सज्ज झालेल्या सुशीला कार्की यांनी नरेंद्र मोदी आणि भारताबाबत केलं मोठं विधान, म्हणाल्या... 
4
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
5
भयंकर! ज्या प्रियकराच्या मदतीनं पतीच्या हत्येचा रचला कट; त्याचाच मृतेदह झाडाला लटकलेला आढळला
6
"त्यांचं रिलेशनशिप टॉक्झिक होतं", कुमार सानू आणि कुनिकाच्या अफेअरबद्दल लेक अयान म्हणाला- "आई आजही..."
7
"धोनीने मला 'सरडा' बनायला भाग पाडलं..."; दिनेश कार्तिकने सांगितलं टीम इंडियाचं मोठं गुपित
8
Stock Markets Today: सुस्त सुरुवातीनंतर शेअर बाजारात पुन्हा खरेदी, Nifty २५,००० च्या जवळ; Adani Ports, TCS, NTPC टॉप गेनर्स
9
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
10
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
11
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
13
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
14
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
15
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
16
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
17
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
18
अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरी आजपासून, १३ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना करता येणार अर्ज
19
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
20
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?

भाजपा नेत्यांवर टीका करून राडे घडवून आणायचे हे ठाकरे सेनेचे षडयंत्र, प्रमोद जठार यांचा आरोप

By सुधीर राणे | Updated: February 6, 2024 15:11 IST

कणकवली : उद्धव ठाकरे यांच्या सत्तेच्या लालसी वृत्तीने सत्ता तसेच पक्ष, चिन्ह गेले. सोबतचे सहकारी सुद्धा साथ सोडून गेले. ...

कणकवली : उद्धव ठाकरे यांच्या सत्तेच्या लालसी वृत्तीने सत्ता तसेच पक्ष, चिन्ह गेले. सोबतचे सहकारी सुद्धा साथ सोडून गेले. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक ठाकरे पूर्णपणे हरणार आहेत. त्यामुळे भाजपा नेत्यांवर टीका करायची, शिव्या द्यायच्या आणि राडे घडवून आणायचे असे षडयंत्र ठाकरे यांचे आहे. त्याचा पहिला अंक तळकोकणात ठाकरेंनी केला. अशी टीका भाजपा रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा निवडणूक प्रमुख माजी आमदार प्रमोद जठार यांनी केली आहे. कणकवली येथील शासकीय विश्राम गृह येथे मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.यावेळी  महिला मोर्चा प्रदेश महामंत्री डॉ.मंजुषा कुद्रीमोती, प्रदेश सचिव हर्षदा देसाई, माजी नगरसेवक शिशिर परुळेकर, प्रसाद जाधव, बबलू सावंत आदी उपस्थित होते. जठार म्हणाले, कुटुंब संवाद नावाचे टुरिंग टॉकीज घेऊन उद्धव ठाकरे कोकण दौऱ्यावर आले होते. मुळात ठाकरे कुटुंबात संवाद नाही, त्यांचा स्वतःचा सख्खा भाऊ सोबत राहत नाही.  राजकारणात प्रगल्भ असणाऱ्या राज ठाकरे यांना बाजूला केलेल्या औरंगजेबी वृत्तीने वागणाऱ्या उद्धव ठाकरेंनी आधी स्वतःच्या कुटुंबाशी संवाद साधावा. जे बाळासाहेबांनी आयुष्यभर कमावले ते उद्धव ठाकरे यांनी सत्तेच्या मोहापायी गमावले. शिवसेनेतून बाहेर पडलेल्या छगन भुजबळ, गणेश नाईक, नारायण राणे, राज ठाकरे यांचे एकमेव  विरोधक उद्धव ठाकरे यांची सत्तेच्या लालसेची वृत्ती होती. बाळासाहेबांनी धरावे म्हटले तर उद्धव यांनी मारावे म्हणत 'ध'चा 'मा' केला.कणकवली येथील सभेतील भास्कर जाधव यांच्या भाषणातून नेमके नशा करून  कोण आले होते हे जनतेने बघितले. जाधव आपल्या भाषणातून वैभव नाईक यांना उद्धव ठाकरे म्हणत होते. पौष महिन्याला डिसेंबर महिना म्हणत होते.भाजपा सरकारचे जनतेला अपेक्षित असे काम केंद्र आणि राज्यात सुरू आहे. कोकणात येणाऱ्या प्रत्येक प्रकल्पाला खासदार विनायक राऊत यांनी विरोध केला. ५० कोटींचा पाणबुडी प्रकल्प गुजरातला नेला म्हणून उर फोडून रडणारे विनायक राऊत यांनी ३ लाख कोटींची गुंतवणूक असणारा, कोकणातील प्रत्येक बेरोजगाराला रोजगार देणाऱ्या रिफायनरी प्रकल्पाला  विरोध केला. जोपर्यंत विनायक राऊत, उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडे कोकणातील खासदारकी राहील तेवढा काळ कोकणचा विकास कधीच होणार नाही. असेही प्रमोद जठार म्हणाले.विनायक राऊत यांना हरवायला तोफगोळे आवश्यक नाही!रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात उमेदवार म्हणून  ठाकरे शिवसेनेकडे राऊत यांच्याशिवाय दुसरा उमेदवार नाही. मात्र, भाजपा महाविकास आघाडीकडे लोकसभेसाठी उमेदवारांची रांग लागली आहे. आमच्याकडे केंद्रीय मंत्री नारायण राणे ,सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, शिवसेनेचे किरण सामंत यांच्यासारखे उमेदवार आहेत. मात्र विनायक राऊत यांना हरवायला हे तोफ गोळे आणण्याची आम्हाला गरज नाही. त्यांच्यासाठी माझ्यासारखी तलवारच पुरेशी आहे असेही प्रमोद जठार यावेळी म्हणाले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गPramod Jatharप्रमोद जठारShiv Senaशिवसेना