शहरं
Join us  
Trending Stories
1
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
2
Operation Sindoor Live Updates: राज्यांना आपत्कालीन अधिकारांचा वापर करण्याची परवानगी, गृह मंत्रालयाचा निर्णय
3
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर RSSची मोदी सरकारच्या पाठीवर कौतुकाची थाप, भारतीय सैन्याचे केले अभिनंदन
4
भारत-पाक तणावादरम्यान सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर?
5
India Pakistan War: 'आमचे पंतप्रधान भित्रे, ते मोदींचे नाव घ्यायला घाबरतात'; पाकिस्तानी खासदाराने त्यांच्याच सरकारला सुनावले
6
India Pakistan Vidoe: पाकिस्तानने डागलेली उखळी तोफ थेट घरावर, क्षणात दिसेनासं झालं, बघा काय घडलं?
7
यशस्वी जैस्वालचा यू-टर्न ! गोवा नव्हे, मुंबई संघाकडूनच क्रिकेट खेळणार... काय दिलं कारण?
8
हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त! पाकिस्तानच्या गोळीबारात जुळ्या भावंडांचा मृत्यू
9
पाक लष्कर प्रमुखाला मिळाली विशेष 'पॉवर'; पाकिस्तानी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
10
लग्नाच्या अवघ्या १५व्या दिवशीच नवरीनं उडवली सासरची झोप; नवरदेवालाही लावला चुना अन्...  
11
Mumbai: टाटा मेमोरियल हॉस्पिटलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; भारत- पाकिस्तान तणावादरम्यान मेल
12
उद्यापासून महाराष्ट्रातील या ठिकाणी पेट्रोल पंपावर UPI पेमेंट बंद; कारण काय? जाणून घ्या...
13
तुमच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी आर्थिक नियोजन कसे करावे? महागाई लक्षात घेऊन 'या' टिप्स फॉलो करा
14
India Pakistan: 'ये कोई तरीका है भीख मांगने का'; भारताच्या 'पीआयबी'ने पाकिस्तानची उडवली खिल्ली 
15
मागे कोण उभं आहे बघा, शवपेट्यांना लपटलेले झेंडे बघा; भारताने जगाला दाखवला पाकचा खरा चेहरा
16
Operation Sindoor वर मुकेश अंबानींचं वक्तव्य, पंतप्रधानांचा उल्लेख करत केलं 'हे' वक्तव्य 
17
"घाबरण्याची गरज नाही..," भारत-पाक तणावादरम्यान इंडियन ऑईलनं पेट्रोल-डिझेलवर केलं मोठं वक्तव्य
18
"पुढचं आईस्क्रीम आता लाहोरमध्येच खाईन"; कर्तव्यावर परतलेल्या जवानाचा व्हिडीओ पाहून वाटेल अभिमान!
19
India Pakistan: पाकिस्तानच्या मिसाईल्स फटाक्यासारख्या फुस्स; पंजाबमध्ये सापडली पाडलेली क्षेपणास्त्रे, बघा व्हिडीओ
20
सलमान खान आर्मी ऑफिसरच्या भूमिकेत, गलवान व्हॅलीतील भारत-चीन युद्धावर येणार सिनेमा

आमदार, खासदारांची पर्यटनाकडे पाठ

By admin | Updated: April 3, 2015 00:41 IST

मालवण तालुका काँग्रेस : वेळप्रसंगी आंदोलन करणार

मालवण : निवडून गेलेल्या आमदार, खासदार आणि पालकमंत्र्यांनीही तारकर्ली देवबाग येथील पर्यटन व्यावसायिकांकडे पाठ फिरविली आहे. आमदार वैभव नाईक आणि पालकमंत्री दीपक केसरकर हे सूडबुद्धीचे राजकारण करीत आहेत. काँग्रेस नेते नारायण राणे यांच्यामुळेच तारकर्ली देवबाग येथील ग्रामस्थांना पर्यटन उद्योगातून रोजगाराची संधी मिळाली आहे. हा रोजगार कोणी हिरावून घेण्याचा प्रयत्न करीत असेल तर वेळप्रसंगी आंदोलन करू, असा इशारा काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाळू कोळंबकर व पंचायत समितीचे उपसभापती देवानंद चिंदरकर यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत दिला.येथील काँग्रेस कार्यालयात गुरुवारी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी बोलताना तालुकाध्यक्ष बाळू कोळंबकर म्हणाले, जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावरअनधिकृतपणे धनदांडग्यांकडून वाळू उपसा केला जात आहे. महसूल आणि पोलीस यंत्रणा दिवसाढवळ्या होत असलेल्या वाळू उपशाकडे सोयीस्करपणे डोळेझाक करत आहेत. प्रशासनाला राजरोसपणे चाललेला अनधिकृत वाळू उपसा दिसत नाही. मात्र पर्यटनाच्या माध्यमातून गोरगरीबांवर गुन्हे दाखल करण्याचे काम प्रशासनाने अवलंबिले आहे. रत्नागिरीसह जिल्ह्याच्या संपूर्ण किनारपट्टी भागात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे वाढत असताना फक्त तारकर्ली व देवबाग येथीलच पर्यटन व्यावसायिकांवर त्यांना दोषी ठरवत त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले ही बाब गंभीर असतानाही पालकमंत्री, खासदार व आमदार या भागात फिरकलेसुद्धा नाहीत. पालकमंत्री दीपक केसरकर व आमदार वैभव नाईक सूडबुद्धीचे राजकारण करीत असून ते पर्यटन जिल्ह्याचे वाटोळे करणार असल्याची टीका कोळंबकर यांनी केली.यावेळी देवानंद चिंदरकर म्हणाले, तारकर्ली, देवबाग, वायरी गावातील ग्रामस्थांनी शासनाकडे कोणत्याही निधीची मागणी न करता तसेच शासनाच्या कोणत्याही योगदानाशिवाय गावात स्वखर्चाने रोजगार उपलब्ध केला आहे. असे असताना येथील २१ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. एमसीझेडएमएचे दोन दिवसांत परवाने मिळवून एमटीडीसीने आपल्या इमारती अधिकृत ठरविल्या आहेत. सीआरझेडबाबत स्थानिकांत अनभिज्ञता असल्याने अनेकवेळा जिल्हाधिकाऱ्यांकडे त्याबाबत मार्गदर्शन मागण्यात आले होते. जिल्हाधिकाऱ्यांनी आतातरी ज्याप्रमाणे एमटीडीसीने आपल्या इमारती अधिकृत केल्या त्या प्रक्रियेची आम्हांला माहिती देऊन सहकार्य करावे असे देवानंद चिंदरकर म्हणाले. त्याचप्रमाणे अकृषक कराची भरणा करून घेऊन अनधिकृत पर्यटन व्यावसायिकांना अधिकृत करून घ्यावे अशीही मागणी चिंदरकर यांनी केली. यावेळी जिल्हा परिषद सदस्या संजीवनी लुडबे, तारकर्ली सरपंच मोहन केळुसकर, भाई मांजरेकर, महेश लुडबे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)