शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

आमदार, खासदारांची पर्यटनाकडे पाठ

By admin | Updated: April 3, 2015 00:41 IST

मालवण तालुका काँग्रेस : वेळप्रसंगी आंदोलन करणार

मालवण : निवडून गेलेल्या आमदार, खासदार आणि पालकमंत्र्यांनीही तारकर्ली देवबाग येथील पर्यटन व्यावसायिकांकडे पाठ फिरविली आहे. आमदार वैभव नाईक आणि पालकमंत्री दीपक केसरकर हे सूडबुद्धीचे राजकारण करीत आहेत. काँग्रेस नेते नारायण राणे यांच्यामुळेच तारकर्ली देवबाग येथील ग्रामस्थांना पर्यटन उद्योगातून रोजगाराची संधी मिळाली आहे. हा रोजगार कोणी हिरावून घेण्याचा प्रयत्न करीत असेल तर वेळप्रसंगी आंदोलन करू, असा इशारा काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाळू कोळंबकर व पंचायत समितीचे उपसभापती देवानंद चिंदरकर यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत दिला.येथील काँग्रेस कार्यालयात गुरुवारी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी बोलताना तालुकाध्यक्ष बाळू कोळंबकर म्हणाले, जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावरअनधिकृतपणे धनदांडग्यांकडून वाळू उपसा केला जात आहे. महसूल आणि पोलीस यंत्रणा दिवसाढवळ्या होत असलेल्या वाळू उपशाकडे सोयीस्करपणे डोळेझाक करत आहेत. प्रशासनाला राजरोसपणे चाललेला अनधिकृत वाळू उपसा दिसत नाही. मात्र पर्यटनाच्या माध्यमातून गोरगरीबांवर गुन्हे दाखल करण्याचे काम प्रशासनाने अवलंबिले आहे. रत्नागिरीसह जिल्ह्याच्या संपूर्ण किनारपट्टी भागात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे वाढत असताना फक्त तारकर्ली व देवबाग येथीलच पर्यटन व्यावसायिकांवर त्यांना दोषी ठरवत त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले ही बाब गंभीर असतानाही पालकमंत्री, खासदार व आमदार या भागात फिरकलेसुद्धा नाहीत. पालकमंत्री दीपक केसरकर व आमदार वैभव नाईक सूडबुद्धीचे राजकारण करीत असून ते पर्यटन जिल्ह्याचे वाटोळे करणार असल्याची टीका कोळंबकर यांनी केली.यावेळी देवानंद चिंदरकर म्हणाले, तारकर्ली, देवबाग, वायरी गावातील ग्रामस्थांनी शासनाकडे कोणत्याही निधीची मागणी न करता तसेच शासनाच्या कोणत्याही योगदानाशिवाय गावात स्वखर्चाने रोजगार उपलब्ध केला आहे. असे असताना येथील २१ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. एमसीझेडएमएचे दोन दिवसांत परवाने मिळवून एमटीडीसीने आपल्या इमारती अधिकृत ठरविल्या आहेत. सीआरझेडबाबत स्थानिकांत अनभिज्ञता असल्याने अनेकवेळा जिल्हाधिकाऱ्यांकडे त्याबाबत मार्गदर्शन मागण्यात आले होते. जिल्हाधिकाऱ्यांनी आतातरी ज्याप्रमाणे एमटीडीसीने आपल्या इमारती अधिकृत केल्या त्या प्रक्रियेची आम्हांला माहिती देऊन सहकार्य करावे असे देवानंद चिंदरकर म्हणाले. त्याचप्रमाणे अकृषक कराची भरणा करून घेऊन अनधिकृत पर्यटन व्यावसायिकांना अधिकृत करून घ्यावे अशीही मागणी चिंदरकर यांनी केली. यावेळी जिल्हा परिषद सदस्या संजीवनी लुडबे, तारकर्ली सरपंच मोहन केळुसकर, भाई मांजरेकर, महेश लुडबे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)