शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदी २०० देश फिरले, पण एकही पाठिशी नाही; शिष्टमंडळाच्या वऱ्हाडावर बहिष्कार टाकला पाहिजे”
2
संपूर्ण यादीच आली, सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे सदस्य ठरले, प्रत्येक टीममध्ये किती अन् कोण नेते?
3
पोखरणच्या जमिनीवर 'असा' झाला स्फोट, अमेरिकाही हादरली; आजच्या दिवशी भारताची दखल जगानं घेतली
4
पाकची नवी चाल! भारताच्या ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ला ‘शांतीदूता’ने उत्तर; जगाला सांगणार काय?
5
गिलख्रिस्टच्या IPL संघात विराटला स्थान नाही, Mumbai Indiansचे ५ जण, कर्णधार कोण?
6
पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान भारत आणि अफगाणिस्तानमधील व्यापार पुन्हा सुरू
7
आयडियाची कल्पना झाली फेल! बेपत्ता झालेला गुरुग्रामचा आयटी मॅनेजर पकडला गेला अन् समोर आलं खरं कारण
8
अटकेत पाकिस्तानी स्पाय? ज्योती मल्होत्राची कमाई किती? कोरोनात नोकरी गेली अन्... पाकिस्तानही फिरून आली...
9
Hyundai ने आखली मोठी योजना! भारतात लॉन्च करणार 20 पेट्रोल-डिझेल अन् 6 EV कार
10
तुम्हीही एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड वापरता? मग फायद्यासोबत हे तोटे माहिती आहे का?
11
कोण आहे पाकिस्तानी अधिकारी, ज्याच्या जाळ्यात अडकली ज्योती?; भारताने देशाबाहेर काढले होते
12
"विराट कोहलीला क्रिकेटमधील योगदानासाठी 'भारतरत्न' द्या"; स्टार माजी क्रिकेटपटूने केली मागणी
13
हैदराबादमधील गुलजार हाऊसजवळ भीषण आग, १७ जणांचा होरपळून मृत्यू; अनेक जण गंभीर जखमी
14
Video: "असा धडा शिकवणार, की..."; सैन्यानं जारी केला 'ऑपरेशन सिंदूर'चा आणखी एक व्हिडिओ
15
केरळात मान्सून वाऱ्याच्या वेगाने दाखल होणारा, ढग भरभरून पाऊस देणार
16
करण जोहरच्या 'तख्त' सिनेमाचं पुढे काय झालं? पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत म्हणाला, "तो सिनेमा..."
17
ज्योती मल्होत्रा पाकिस्तानी ISI अधिकाऱ्यासोबत बालीलाही गेलेली; वडील कारपेंटर, मुलीची लक्झरी लाईफ, नेमके करायची तरी काय...
18
टेरिफ वॉरची खुमखुमी अन् अमेरिकेचा तिळपापड! मूडीजने क्रेडिट रेटिंग घटविताच...
19
२५ लाख दे, नाहीतर मरून जा; पत्नीने दिली धमकी! शिक्षक पतीने उचलले दुर्दैवी पाऊल
20
सुसाइड नोटमध्ये मराठीत सही कशी?; डॉ. वळसंगकर आत्महत्या प्रकरणी वेगळाच संशय

दहशतवादाचा बुरखा कुडाळच्या जनतेने फाडला

By admin | Updated: April 20, 2016 01:13 IST

जयेंद्र परूळेकर : पालकमंत्र्यांवर टीका ; यापुढील निवडणुकीतही जनता काँग्रेसच्याच पाठीशी राहणार

सावंतवाडी : एका पक्षाचे पालकमंत्री, खासदार, आमदार असतानाही कुडाळात युतीला जनतेने नाकारले आहे. याचाच अर्थ या जिल्ह्याने पुन्हा नारायण राणे यांचे नेतृत्व स्वीकारले असून, यापुढच्या निवडणुकांमध्येही जनता काँगे्रस आघाडीच्याच पाठीशी राहणार आहे. पालकमंत्री दीपक केसरकर हे दहशतवादाचा बागुलबुवा करून निवडून आले. मात्र, निवडून आल्यावर जनतेने त्यांना ओळखले असल्यानेच कुडाळमधून त्यांना नाकारले, असा आरोप यावेळी काँग्रेसचे प्रवक्ते डॉ. जयेंद्र परूळेकर यांनी केला.ते सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी तालुकाध्यक्ष संजू परब, सरचिटणीस मंदार नार्वेकर, शहर अध्यक्ष सुधीर आडिवरेकर आदी उपस्थित होते.कुडाळात जनतेने आम्हाला पूर्ण बहुमत देत सत्तेवर आणले. जनतेला विकास कोण करू शकतो, हे कळले आहे. काही उमेदवार आमचे थोडक्या मतांनी पडले आहेत. असे असले तरी जनतेने जो कौल दिला, तो आम्हाला मान्य असून, जिल्ह्याचा विकास करण्याची ताकद फक्त काँग्रेसमध्येच असल्याचे यातून दिसून येत आहे.अनेक प्रकल्प युती शासनाच्या काळात बंद आहेत. हे जनतेने ओळखले आहे. यांचे आमदार टक्केवारीतच गुंतले आहेत. त्यामुळे दर्जेदार विकास कामेही होत नाहीत, असा आरोपही यावेळी डॉ. परूळेकर यांनी केला आहे.कुडाळात युतीचा झालेला पराभव हा त्यांच्या चांगलाच जिव्हारी लागला असून, आता युतीच्या नेत्यांना कुडाळात तोंड दाखवायला जागा शिल्लक राहिली नाही. नेहमी केसरकर काँग्रेसवर दहशतवादाचा आरोप करीत राहिले. दहशतवादाचा आरोप करून जनतेला त्यांनी फसवले. पण पालकमंत्री झाल्यावरही जनतेत जो भ्रम पसरवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे जनतेने पूर्णत: शिवसेनेच्या कारनाम्यांना वैतागली असून, त्यांनी आपले उत्तर मतपेटीतून दाखवून दिले आहे. यापुढच्या निवडणुकांमध्येही जनतेच्या अपेक्षित कामांना न्याय देऊ. या जिल्ह्याचा विकास राणेच करू शकतात, हे जनतेला आता कळले असून, जनतेने विकासाच्या बाजूने कौल दिल्याचे डॉ. परूळेकर यांनी म्हटले आहे. (प्रतिनिधी)