शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

दहशतवादाचा बुरखा कुडाळच्या जनतेने फाडला

By admin | Updated: April 20, 2016 01:13 IST

जयेंद्र परूळेकर : पालकमंत्र्यांवर टीका ; यापुढील निवडणुकीतही जनता काँग्रेसच्याच पाठीशी राहणार

सावंतवाडी : एका पक्षाचे पालकमंत्री, खासदार, आमदार असतानाही कुडाळात युतीला जनतेने नाकारले आहे. याचाच अर्थ या जिल्ह्याने पुन्हा नारायण राणे यांचे नेतृत्व स्वीकारले असून, यापुढच्या निवडणुकांमध्येही जनता काँगे्रस आघाडीच्याच पाठीशी राहणार आहे. पालकमंत्री दीपक केसरकर हे दहशतवादाचा बागुलबुवा करून निवडून आले. मात्र, निवडून आल्यावर जनतेने त्यांना ओळखले असल्यानेच कुडाळमधून त्यांना नाकारले, असा आरोप यावेळी काँग्रेसचे प्रवक्ते डॉ. जयेंद्र परूळेकर यांनी केला.ते सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी तालुकाध्यक्ष संजू परब, सरचिटणीस मंदार नार्वेकर, शहर अध्यक्ष सुधीर आडिवरेकर आदी उपस्थित होते.कुडाळात जनतेने आम्हाला पूर्ण बहुमत देत सत्तेवर आणले. जनतेला विकास कोण करू शकतो, हे कळले आहे. काही उमेदवार आमचे थोडक्या मतांनी पडले आहेत. असे असले तरी जनतेने जो कौल दिला, तो आम्हाला मान्य असून, जिल्ह्याचा विकास करण्याची ताकद फक्त काँग्रेसमध्येच असल्याचे यातून दिसून येत आहे.अनेक प्रकल्प युती शासनाच्या काळात बंद आहेत. हे जनतेने ओळखले आहे. यांचे आमदार टक्केवारीतच गुंतले आहेत. त्यामुळे दर्जेदार विकास कामेही होत नाहीत, असा आरोपही यावेळी डॉ. परूळेकर यांनी केला आहे.कुडाळात युतीचा झालेला पराभव हा त्यांच्या चांगलाच जिव्हारी लागला असून, आता युतीच्या नेत्यांना कुडाळात तोंड दाखवायला जागा शिल्लक राहिली नाही. नेहमी केसरकर काँग्रेसवर दहशतवादाचा आरोप करीत राहिले. दहशतवादाचा आरोप करून जनतेला त्यांनी फसवले. पण पालकमंत्री झाल्यावरही जनतेत जो भ्रम पसरवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे जनतेने पूर्णत: शिवसेनेच्या कारनाम्यांना वैतागली असून, त्यांनी आपले उत्तर मतपेटीतून दाखवून दिले आहे. यापुढच्या निवडणुकांमध्येही जनतेच्या अपेक्षित कामांना न्याय देऊ. या जिल्ह्याचा विकास राणेच करू शकतात, हे जनतेला आता कळले असून, जनतेने विकासाच्या बाजूने कौल दिल्याचे डॉ. परूळेकर यांनी म्हटले आहे. (प्रतिनिधी)