शहरं
Join us  
Trending Stories
1
संतापजनक...! IAS अधिकाऱ्याची गाडी तपासली; गोव्याच्या एसपींनी पोलिसांनाच दिली उठाबशांची शिक्षा...
2
१९ तारखेला अत्यंत स्फोटक माहिती उघड होणार, ज्यानं भाजपा नेत्यांची फजिती होईल; संजय राऊतांचा दावा
3
महायुतीत एकनाथ शिंदेंची कोंडी; मुंबईत भाजपानं शिंदेसेनेला केवळ ५२ जागांचा दिला प्रस्ताव?
4
टीम इंडियाला मल्टीप्लेक्समध्ये पाहून सगळचे चकीत झाले...; मैदानातील सगळेच धुरंधर 'धुरंधर' पहायला गेलेले...
5
Crime: बुरखा न घातल्यानं पती संतापला, पत्नीसह पोटच्या २ मुलींना संपवलं; मृतदेह पुरले खड्ड्यात!
6
कोण आहे डोनाल्ड ट्रम्प यांची होणारी सून...! मंगळवारीच उरकला साखरपुडा, दोघे भारतातही येऊन गेलेले...
7
उद्धव-राज विरुद्ध भाजप-शिंदेसेना असाच सामना; १३८ मराठी बहुल मतदारसंघ या निवडणुकीत ठरणार निर्णायक
8
सरकार आणखी एका बँकेतील हिस्सा विकण्याच्या तयारीत; खात्यात येणार २१०० कोटी, सध्या आहे ९५% हिस्सा
9
'उद्याच्या तेजस्वी पहाटेसाठी!' रितेश देशमुखचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेतील पहिला लूक समोर
10
"महापालिका निवडणूक लुटण्याचे वाटे केले गेले"; अंजली दमानियांचा निशाणा, महायुतीवर भडकल्या
11
प्रसिद्ध दिग्दर्शक आणि पत्नीच्या हत्या प्रकरणाला नवं वळण, पोलिसांनी लेकालाच केली अटक
12
निवडणुका जाहीर होताच तापले युती अन् आघाडीचे राजकारण; महाराष्ट्रात काही ठिकाणी गणित बिघडणार
13
अमेरिकन शेअर बाजारात मोठा बदल! नॅस्डॅक २४ तास ट्रेडिंग सुरू करण्याच्या तयारीत; भारतीय गुंतवणूकदारांवर काय होणार परिणाम?
14
अमेरिकेत पॅलेस्टिनसह इतर ७ देशांतील नागरिकांना प्रवास बंदी; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय
15
Stock Market Today: सुस्त सुरुवातीनंतर सेन्सेक्स-निफ्टीमध्ये किंचित वाढ; ICICI Bank, Nestle, HDFC Bank मध्ये घसरण
16
महालक्ष्मी व्रत उद्यापन: ४ गुरुवार नेटाने केलेल्या महालक्ष्मी व्रताचे १८ डिसेंबर रोजी उद्यापन कसे करावे? वाचा विधी
17
'१२ लाख सैनिकांची गरज काय? त्यांना दुसरे काम लावा'; पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्टच सांगितलं
18
आई मंदिराबाहेर फुले विकायची...! आयपीएलने मुलाला बनविले 'करोडपती', वडील मैदानावर...
19
LIC ची कोणत्या कंपनीत किती गुंतवणूक? सरकारनं दिली महत्त्वाची माहिती; टाटा, रिलायन्स, अदानीसह कोणत्या कंपन्या?
20
अंबरनाथमध्ये भाजपाचे उमेदवार पवन वाळेकर यांच्या कार्यालयावर गोळीबार; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
Daily Top 2Weekly Top 5

दहशतवाद संपला विकासाची लढाई सुरु

By admin | Updated: December 26, 2014 00:22 IST

दीपक केसरकर : सावंतवाडीवासीयांच्यावतीने नागरी सत्कार

सावंतवाडी : कोकणच्या जनतेने दहशतवादाच्या विरूद्धची लढाई जिंकून देण्यात मोलाचा वाटा उचलला आहे. आता आम्हाला विकासाची लढाई जिंकायची आहे. यापुढे कोकणच्या विकासासाठी प्राण पणाला लावून काम करणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा विश्वास सार्थ ठरवणार, असे मत राज्याचे ग्रामविकास राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी माडले.राज्यमंत्री झाल्यानंतर दीपक केसरकर यांचा पहिला नागरी सत्कार सावंतवाडीत झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे, शिवसेना आमदार वैभव नाईक, नगराध्यक्ष बबन साळगावकर, बेस्टचे चेअरमन अरुण दुधवडकर, माजी नगराध्यक्षा पल्लवी केसरकर, उपनगराध्यक्ष राजन पोकळे, महिला आघाडी प्रमुख स्रेहा तेंडोलकर, तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, संपर्कप्रमुख सिद्धी परब, जिल्हा परिषद सदस्या जान्हवी सावंत, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपट्टे, मुख्याधिकारी विजयकुमार द्वासे, नगरसेवक विलास जाधव, राजू बेग, किर्ती बोंद्रे, गोविंद वाडकर, देवेंद्र टेमकर आदी उपस्थित होते. राज्यमंत्री केसरकर म्हणाले, मी आता यापुढे सत्कार स्वीकारणार नाही. दुष्काळग्रस्तांसाठी काम करणार आहे. तेथील जनतेकडे जाणार असून त्यांना न्याय कसा देता येईल, हे बघणार आहे. शिवसेना पक्षप्रमुखांनी माझ्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी सर्व ताकद पणाला लावीन. सावंतवाडी तसेच कोकणचा विकास होण्यासाठी जास्तीत जास्त निधी या भागात आणणार आहे, असे सांगत निवडणुकीत माझा पराभव करण्यासाठी अनेक आमिषे दाखवण्यात आली. पैशांचा पाऊस पाडण्यात आला पण येथील जनता नेहमीच माझ्यामागे राहिली, असेही यावेळी केसरकर यांनी सांगितले.या कार्यक्रमाच्या निमित्ताने कोल्हापूर येथील राजू परूळेकर यांनी चांदीची तलवार भेट म्हणून दिली. तर सावंतवाडी नगरपालिकेच्या नगरसेविकांनी दीपक केसरकर यांच्या पत्नीचे औक्षण करीत ओटी भरली. यावेळी केसरकर यांना सन्मानपत्र देण्यात आले. त्याचे वाचन सुमेधा धुरी यांनी केले. महोत्सवासाठी सावंतवाडीतून मोठ्या प्रमाणात नागरिक आले होते. (प्रतिनिधी)विकासाची भूक केसरकरांना माहित : साळगावकरसावंतवाडी शहराचा विकास कशाप्रकारे केला पाहिजे, याची माहिती राज्यमंत्री म्हणून दीपक केसरकर यांना आहे. केसरकर कुटुंबीय यापूर्वी अनेक घाव सोसूनही कधीही मागे हटले नाही.नेहमीच जनतेमध्ये राहिले आणि त्यामुुळे आज हे चांगले दिवस बघायला मिळाले. हा तालुका गेली वीस वर्षे विकासापासून वंचित होता, असेही यावेळी नगराध्यक्ष साळगावकर म्हणाले.आजपर्यंत जिल्ह्यात येणाऱ्या मंत्र्यांचा सत्कार दीपक केसरकर करत होते. मात्र, आज प्रत्यक्षात मंत्री म्हणून केसरकर यांचाच सत्कार होत आहे. येथील जनतेच्या चेहऱ्यावर वेगळा आनंद पहायला मिळत आहे. हा आनंद विकासातून दिसेल, असे मत आमदार वैभव नाईक यांनी मांडले.