शहरं
Join us  
Trending Stories
1
अचानक राजीनामा दिल्यानंतर, काय करतायत जगदीप धनखड? पत्नी वारंवार का जात आहे राजस्थानला?
2
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
3
"खू्प कर्ज झालंय..."; सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय?
4
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
5
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
6
R Ashwin: आर. अश्विन आयपीएलमधून निवृत्त, फक्त विदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळणार!
7
ऑनलाईन App वरुन ऑर्डर केलं जेवण अन् डिलिव्हरी बॉयच्याच पडली प्रेमात, आता केलं लग्न
8
अष्टविनायक चित्रपटातील साधीभोळी गणेशभक्त वीणा आता दिसते अशी, अनेक वर्षे होती चित्रपटांपासून दूर
9
"सूनेने गोळी मारून हत्या केली, माझा मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता"; तीन महिन्यातच पतीची हत्या
10
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
11
खळबळजनक! कॉन्स्टेबलने कुटुंबीयांच्या मदतीने पत्नीला जिवंत जाळलं, प्रकृती गंभीर
12
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
13
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
14
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
15
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
16
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
17
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस
18
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
19
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
20
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता

दहशतवाद संपला विकासाची लढाई सुरु

By admin | Updated: December 26, 2014 00:22 IST

दीपक केसरकर : सावंतवाडीवासीयांच्यावतीने नागरी सत्कार

सावंतवाडी : कोकणच्या जनतेने दहशतवादाच्या विरूद्धची लढाई जिंकून देण्यात मोलाचा वाटा उचलला आहे. आता आम्हाला विकासाची लढाई जिंकायची आहे. यापुढे कोकणच्या विकासासाठी प्राण पणाला लावून काम करणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा विश्वास सार्थ ठरवणार, असे मत राज्याचे ग्रामविकास राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी माडले.राज्यमंत्री झाल्यानंतर दीपक केसरकर यांचा पहिला नागरी सत्कार सावंतवाडीत झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे, शिवसेना आमदार वैभव नाईक, नगराध्यक्ष बबन साळगावकर, बेस्टचे चेअरमन अरुण दुधवडकर, माजी नगराध्यक्षा पल्लवी केसरकर, उपनगराध्यक्ष राजन पोकळे, महिला आघाडी प्रमुख स्रेहा तेंडोलकर, तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, संपर्कप्रमुख सिद्धी परब, जिल्हा परिषद सदस्या जान्हवी सावंत, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपट्टे, मुख्याधिकारी विजयकुमार द्वासे, नगरसेवक विलास जाधव, राजू बेग, किर्ती बोंद्रे, गोविंद वाडकर, देवेंद्र टेमकर आदी उपस्थित होते. राज्यमंत्री केसरकर म्हणाले, मी आता यापुढे सत्कार स्वीकारणार नाही. दुष्काळग्रस्तांसाठी काम करणार आहे. तेथील जनतेकडे जाणार असून त्यांना न्याय कसा देता येईल, हे बघणार आहे. शिवसेना पक्षप्रमुखांनी माझ्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी सर्व ताकद पणाला लावीन. सावंतवाडी तसेच कोकणचा विकास होण्यासाठी जास्तीत जास्त निधी या भागात आणणार आहे, असे सांगत निवडणुकीत माझा पराभव करण्यासाठी अनेक आमिषे दाखवण्यात आली. पैशांचा पाऊस पाडण्यात आला पण येथील जनता नेहमीच माझ्यामागे राहिली, असेही यावेळी केसरकर यांनी सांगितले.या कार्यक्रमाच्या निमित्ताने कोल्हापूर येथील राजू परूळेकर यांनी चांदीची तलवार भेट म्हणून दिली. तर सावंतवाडी नगरपालिकेच्या नगरसेविकांनी दीपक केसरकर यांच्या पत्नीचे औक्षण करीत ओटी भरली. यावेळी केसरकर यांना सन्मानपत्र देण्यात आले. त्याचे वाचन सुमेधा धुरी यांनी केले. महोत्सवासाठी सावंतवाडीतून मोठ्या प्रमाणात नागरिक आले होते. (प्रतिनिधी)विकासाची भूक केसरकरांना माहित : साळगावकरसावंतवाडी शहराचा विकास कशाप्रकारे केला पाहिजे, याची माहिती राज्यमंत्री म्हणून दीपक केसरकर यांना आहे. केसरकर कुटुंबीय यापूर्वी अनेक घाव सोसूनही कधीही मागे हटले नाही.नेहमीच जनतेमध्ये राहिले आणि त्यामुुळे आज हे चांगले दिवस बघायला मिळाले. हा तालुका गेली वीस वर्षे विकासापासून वंचित होता, असेही यावेळी नगराध्यक्ष साळगावकर म्हणाले.आजपर्यंत जिल्ह्यात येणाऱ्या मंत्र्यांचा सत्कार दीपक केसरकर करत होते. मात्र, आज प्रत्यक्षात मंत्री म्हणून केसरकर यांचाच सत्कार होत आहे. येथील जनतेच्या चेहऱ्यावर वेगळा आनंद पहायला मिळत आहे. हा आनंद विकासातून दिसेल, असे मत आमदार वैभव नाईक यांनी मांडले.