शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

सांगा कसे जगायचे?, न रस्ता, न पाणी

By admin | Updated: September 21, 2015 23:41 IST

विनायक राऊत यांच्या गावची हाक : खासदारांनी तळगाव पेडवेवाडीत मुलभूत सुविधा पुरवाव्यात

मालवण : तालुक्यातील तळगाव पेडवेवाडी (फातरीचे टेंब) गावाला भारत स्वतंत्र काळातही रस्ता व पाण्याची सोय नाही. विशेष म्हणजे हे गाव खासदार विनायक राऊत यांचे असून पेडवेवाडीतील ग्रामस्थांना खासदारांनी पाणी, रस्ता व इतर सुविधांची पूर्तता करावी व शेकडो वर्षांची मागणीला न्याय द्यावा अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत. पर्यटनाच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्हा जगाच्या नकाशावर पोहचला आहे. मात्र सुविधांची वानवा येथे नेहमीच दिसून आली आहे. २०० हून अधिक लोकवस्तीच्या वाडीवर रस्ताच पोहचला नाही. पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीरच आहे. जलस्वराजच्या नावाखाली लोकवर्गणीतून बांधलेली विहीर जमीन मालक खासगी ठरवून पाणी देत नाही. आजारी माणसाला दवाखान्यात नेण्यासाठी रिक्षा सोडाच दुचाकी जायला रस्ता नाही. शासनाला निवेदने, पत्रव्यवहार करूनही काहीच उपयोग झाला नाही. शेतमळ्यातून पेडवेवाडीत यायला अर्धा ते पाऊन किमी पायपीट करावी लागते. पूर्वी रुंद असलेला हा मार्ग आता एका माणसालाही चालण्यासाठी जिकरीचा बनला आहे. गावातील वृद्ध, आजारी अथवा गरोदर स्त्रीला दवाखान्यात नेणेही मुश्किल आहे. गणेशोत्सवात गणेशाची मूर्ती आणतानाही अनेक विघ्ने आतापर्यंत आली आहेत. या मार्गावरून चालताना काही वषार्पूर्वी लक्ष्मण शिरोडकर हे वृद्ध पडले. त्यात त्यांना आपला अंगठाही गमवावा लागला. आज ते दोन पायावर उभेही राहू शकत नाही अशी स्थिती गणेशोत्सवाला येणारे चाकरमानी येतात मात्र या समस्यांमुळे तेही राहत नाहीत. त्यांची बायका-मुले येण्यास नकारच देतात. अशी व्यथा रामदास शिरोडकर व वाडीतील शेकडो ग्रामस्थांनी मांडली आहे. (प्रतिनिधी)अनेक कुटुंबीयांनी केला गावालाच रामरामपेडवेवाडी येथील काही कुटुंबे ग्रामपंचायत प्रशासनाच्या मनमानी कारभाराला कंटाळून गाव सोडण्याच्या मन:स्थितीत आहे. येथील कुटुंबे समस्यांचा डोंगर डोक्यावर घेऊन जगताना दिसत आहेत.तर अनेक कुटुंबांनी वाडीत रस्ता, पाणी तसेच इतर सुविधा नसल्याने गाव सोडले देखील आहे. गावाला शिवराम दळवींच्या रूपाने आमदार, दत्ता दळवींच्या रूपाने मुंबईचे महापौर लाभले. त्यांच्याकडे हजारो वेळा निवेदने दिली मात्र त्यांनीही केवळ आश्वासनेच दिली आहेत. ग्रामपंचायतीचे आडमुठे धोरण सरपंच आणि ग्रामसेवकाचा मनमानी कारभार यामुळेच गावचा विकास झालेला नाही.याबाबत खासदार विनायक राऊत यांनी लक्ष घालून गावला स्ता व पाण्याची सोय करून द्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.