शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
4
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
5
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
6
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
7
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
8
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
9
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
10
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
11
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
12
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
13
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
14
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
15
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
16
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
17
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
18
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
19
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
20
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल

सांगा कसे जगायचे?, न रस्ता, न पाणी

By admin | Updated: September 21, 2015 23:41 IST

विनायक राऊत यांच्या गावची हाक : खासदारांनी तळगाव पेडवेवाडीत मुलभूत सुविधा पुरवाव्यात

मालवण : तालुक्यातील तळगाव पेडवेवाडी (फातरीचे टेंब) गावाला भारत स्वतंत्र काळातही रस्ता व पाण्याची सोय नाही. विशेष म्हणजे हे गाव खासदार विनायक राऊत यांचे असून पेडवेवाडीतील ग्रामस्थांना खासदारांनी पाणी, रस्ता व इतर सुविधांची पूर्तता करावी व शेकडो वर्षांची मागणीला न्याय द्यावा अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत. पर्यटनाच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्हा जगाच्या नकाशावर पोहचला आहे. मात्र सुविधांची वानवा येथे नेहमीच दिसून आली आहे. २०० हून अधिक लोकवस्तीच्या वाडीवर रस्ताच पोहचला नाही. पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीरच आहे. जलस्वराजच्या नावाखाली लोकवर्गणीतून बांधलेली विहीर जमीन मालक खासगी ठरवून पाणी देत नाही. आजारी माणसाला दवाखान्यात नेण्यासाठी रिक्षा सोडाच दुचाकी जायला रस्ता नाही. शासनाला निवेदने, पत्रव्यवहार करूनही काहीच उपयोग झाला नाही. शेतमळ्यातून पेडवेवाडीत यायला अर्धा ते पाऊन किमी पायपीट करावी लागते. पूर्वी रुंद असलेला हा मार्ग आता एका माणसालाही चालण्यासाठी जिकरीचा बनला आहे. गावातील वृद्ध, आजारी अथवा गरोदर स्त्रीला दवाखान्यात नेणेही मुश्किल आहे. गणेशोत्सवात गणेशाची मूर्ती आणतानाही अनेक विघ्ने आतापर्यंत आली आहेत. या मार्गावरून चालताना काही वषार्पूर्वी लक्ष्मण शिरोडकर हे वृद्ध पडले. त्यात त्यांना आपला अंगठाही गमवावा लागला. आज ते दोन पायावर उभेही राहू शकत नाही अशी स्थिती गणेशोत्सवाला येणारे चाकरमानी येतात मात्र या समस्यांमुळे तेही राहत नाहीत. त्यांची बायका-मुले येण्यास नकारच देतात. अशी व्यथा रामदास शिरोडकर व वाडीतील शेकडो ग्रामस्थांनी मांडली आहे. (प्रतिनिधी)अनेक कुटुंबीयांनी केला गावालाच रामरामपेडवेवाडी येथील काही कुटुंबे ग्रामपंचायत प्रशासनाच्या मनमानी कारभाराला कंटाळून गाव सोडण्याच्या मन:स्थितीत आहे. येथील कुटुंबे समस्यांचा डोंगर डोक्यावर घेऊन जगताना दिसत आहेत.तर अनेक कुटुंबांनी वाडीत रस्ता, पाणी तसेच इतर सुविधा नसल्याने गाव सोडले देखील आहे. गावाला शिवराम दळवींच्या रूपाने आमदार, दत्ता दळवींच्या रूपाने मुंबईचे महापौर लाभले. त्यांच्याकडे हजारो वेळा निवेदने दिली मात्र त्यांनीही केवळ आश्वासनेच दिली आहेत. ग्रामपंचायतीचे आडमुठे धोरण सरपंच आणि ग्रामसेवकाचा मनमानी कारभार यामुळेच गावचा विकास झालेला नाही.याबाबत खासदार विनायक राऊत यांनी लक्ष घालून गावला स्ता व पाण्याची सोय करून द्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.