शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: अमृतसरमध्ये वीज पुरवठा पूर्ववत; अद्यापही रेड अलर्ट कायम
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

सांगा कसे जगायचे?, न रस्ता, न पाणी

By admin | Updated: September 21, 2015 23:41 IST

विनायक राऊत यांच्या गावची हाक : खासदारांनी तळगाव पेडवेवाडीत मुलभूत सुविधा पुरवाव्यात

मालवण : तालुक्यातील तळगाव पेडवेवाडी (फातरीचे टेंब) गावाला भारत स्वतंत्र काळातही रस्ता व पाण्याची सोय नाही. विशेष म्हणजे हे गाव खासदार विनायक राऊत यांचे असून पेडवेवाडीतील ग्रामस्थांना खासदारांनी पाणी, रस्ता व इतर सुविधांची पूर्तता करावी व शेकडो वर्षांची मागणीला न्याय द्यावा अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत. पर्यटनाच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्हा जगाच्या नकाशावर पोहचला आहे. मात्र सुविधांची वानवा येथे नेहमीच दिसून आली आहे. २०० हून अधिक लोकवस्तीच्या वाडीवर रस्ताच पोहचला नाही. पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीरच आहे. जलस्वराजच्या नावाखाली लोकवर्गणीतून बांधलेली विहीर जमीन मालक खासगी ठरवून पाणी देत नाही. आजारी माणसाला दवाखान्यात नेण्यासाठी रिक्षा सोडाच दुचाकी जायला रस्ता नाही. शासनाला निवेदने, पत्रव्यवहार करूनही काहीच उपयोग झाला नाही. शेतमळ्यातून पेडवेवाडीत यायला अर्धा ते पाऊन किमी पायपीट करावी लागते. पूर्वी रुंद असलेला हा मार्ग आता एका माणसालाही चालण्यासाठी जिकरीचा बनला आहे. गावातील वृद्ध, आजारी अथवा गरोदर स्त्रीला दवाखान्यात नेणेही मुश्किल आहे. गणेशोत्सवात गणेशाची मूर्ती आणतानाही अनेक विघ्ने आतापर्यंत आली आहेत. या मार्गावरून चालताना काही वषार्पूर्वी लक्ष्मण शिरोडकर हे वृद्ध पडले. त्यात त्यांना आपला अंगठाही गमवावा लागला. आज ते दोन पायावर उभेही राहू शकत नाही अशी स्थिती गणेशोत्सवाला येणारे चाकरमानी येतात मात्र या समस्यांमुळे तेही राहत नाहीत. त्यांची बायका-मुले येण्यास नकारच देतात. अशी व्यथा रामदास शिरोडकर व वाडीतील शेकडो ग्रामस्थांनी मांडली आहे. (प्रतिनिधी)अनेक कुटुंबीयांनी केला गावालाच रामरामपेडवेवाडी येथील काही कुटुंबे ग्रामपंचायत प्रशासनाच्या मनमानी कारभाराला कंटाळून गाव सोडण्याच्या मन:स्थितीत आहे. येथील कुटुंबे समस्यांचा डोंगर डोक्यावर घेऊन जगताना दिसत आहेत.तर अनेक कुटुंबांनी वाडीत रस्ता, पाणी तसेच इतर सुविधा नसल्याने गाव सोडले देखील आहे. गावाला शिवराम दळवींच्या रूपाने आमदार, दत्ता दळवींच्या रूपाने मुंबईचे महापौर लाभले. त्यांच्याकडे हजारो वेळा निवेदने दिली मात्र त्यांनीही केवळ आश्वासनेच दिली आहेत. ग्रामपंचायतीचे आडमुठे धोरण सरपंच आणि ग्रामसेवकाचा मनमानी कारभार यामुळेच गावचा विकास झालेला नाही.याबाबत खासदार विनायक राऊत यांनी लक्ष घालून गावला स्ता व पाण्याची सोय करून द्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.