शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

आमदारांची तहसीलमध्ये ठाण

By admin | Updated: June 10, 2016 00:15 IST

मालवणमधील प्रकार : प्रलंबित दाखले वितरणाची वैभव नाईकांची मागणी

मालवण : मालवण तहसील कार्यालयात इंटरनेट, जनरेटर सुविधा कोलमडल्याने विद्यार्थ्यांना वितरीत केले जाणारे विविध दाखले वेळेत मिळत नसल्याची तक्रार आमदार वैभव नाईक यांच्याकडे पालक वर्गाने केली. या पार्श्वभूमीवर गुरूवारी आमदार वैभव नाईक यांनी तहसील कार्यालय येथे ठाण मांडून बंद यंत्रणा कार्यान्वित करत विद्यार्थ्यांचे ९८ दाखले वितरीत करण्याची नोंद महसूल प्रशासनामार्फत केली आहे.दरम्यान, विविध जातीचे तसेच नॉन क्रिमिलेअर स्वरूपाचे हे ९८ दाखले पुढील कार्यवाहीसाठी गुरुवारी सायंकाळी प्रांताधिकारी कार्यालयात पाठविण्यात आले असून लवकरच ते विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार आहेत. येत्या काही दिवसात विविध ठिकाणी प्रवेश प्रक्रिया सुरु असल्याने विद्यार्थ्यांना वेळेत दाखले वितरीत व्हावेत यासाठी महसूल प्रशासनाने गतिमान कार्यवाही करावी, अशा सूचना आमदार नाईक यांनी दिल्या आहेत. याबाबत विद्यार्थी व पालकवर्गातून समाधान व्यक्त करण्यात आले.गेले काही दिवस विविध दाखल्यांसाठी विद्यार्थ्यांची होणारी परवड लक्षात घेता आमदार नाईक यांनी गुरुवारी मालवण तहसील कार्यालय येथे उपस्थिती दर्शवली. रखडलेल्या दाखल्याबाबत नायब तहसीलदार जी. के. सावंत, एस. पी. खडपकर, शुभांगी चव्हाण यांच्याकडून माहिती जाणून घेतली. यावेळी तहसील कार्यालयाकडे विद्यार्थ्यांचे तब्बल २९१ दाखले प्रलंबित असल्याची माहिती समोर आली. वारंवार खंडित होणारी इंटरनेट सुविधा, कमी दाबाचा व खंडित वीज पुरवठा, बंद जनरेटर अशा अनेक कारणांमुळे दाखले वितरीत होत नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.विविध दाखल्यांसाठी आजही मोठ्या संख्यने विद्यार्थी व पालकवर्ग उपस्थित होता. यावेळी सेना पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने बीएसएनएल व वीज कर्मचाऱ्यांना बोलावून इंटरनेट व वीज पुरवठा तत्काळ सुरळीत करण्यात आला. दरम्यानच्या काळात जो पर्यंत जास्तीत विद्यार्थ्यांच्या दाखले नोंदीची कार्यवाही होणार नाही तोपर्यंत तहसील कार्यालयात ठाण मांडण्याची भूमिका आमदार नाईक यांनी घेतली. सायंकाळी जातीचे दाखले ७१ व नॉन-क्रिमिलेअर २७ दाखले असे ९८ दाखले प्रांताधिकारी यांच्याकडे स्वाक्षरीसाठी पाठविण्यात आले असल्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)