शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: अमृतसरमध्ये वीज पुरवठा पूर्ववत; अद्यापही रेड अलर्ट कायम
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

शिक्षण विभागावर ताशेर

By admin | Updated: August 5, 2014 23:43 IST

शैक्षणिक गुणवत्तेचा मुद्दा : शिक्षण समितीच्या सभेत खडाजंगीे

सिंधुदुर्गनगरी : जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ताही दिवसेंदिवस ढासळत चालली असल्याचा आरोप होत असतानाच आता चक्क शिक्षण सभापती प्रकाश कवठणकर यांनी ‘शैक्षणिक गुणवत्ता’ या मुद्यावरून शिक्षण विभागावर ताशेरे ओढले. या विषयावरून सभागृहात खडाजंगी झाली. गटशिक्षणाधिकारी सभागृहात केवळ कागदोपत्री माहिती पुरवत असून प्रत्यक्षात मात्र गुणवत्तेबाबत ‘हवेत’ न राहता सद्यपरिस्थितीत गुणवत्तेची स्थिती काय आहे ते पहावे. शिक्षणाधिकारी धाकोरकर यांनी घसरत चाललेल्या गुणवत्तेच्या पार्श्वभूमीवर वेळीच रिमोट दाबा, असे आदेशही यावेळी प्रकाश कवठणकर यांनी दिले.शिक्षण समितीची मासिक सभा येथील बॅ. नाथ पै सभागृहात सभापती प्रकाश कवठणकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी समिती सदस्य प्रमोद कामत, स्रेहलता चोरगे, सुषमा कोदे, राजेंद्र म्हापसेकर, विष्णू घाडी, स्वीकृत सदस्य संजय बगळे, फादर लोबो, संतोष पाताडे, समिती सचिव तथा प्राथमिक शिक्षणाधिकारी रत्नाकर धाकोरकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी देवीदास कुलाल, सर्व गटशिक्षणाधिकारी, अधिकारी, खातेप्रमुख उपस्थित होते.जिल्हा परिषद प्राथमिक शाळांची शैक्षणिक गुणवत्ता खालावत जात असल्याचे आरोप जिल्हा परिषद उपाध्यक्षांनी उदाहरणासह सभागृहात सादर केले असल्याची घटना ताजी असतानाच आता शिक्षण सभापती प्रकाश कवठणकर यांनी मंगळवारच्या सभेत शैक्षणिक गुणवत्तेबाबत तीव्र नाराजी व्यक्त करीत शिक्षण विभागावर ताशेरे ओढले.दोडामार्ग तालुक्यातील शाळांची भरारी पथकामार्फत तपासणी केली असता एका शाळेत शिक्षकालाच एक प्रश्न विचारला असता त्यांना त्याचे उत्तर देता आले नाही, ही मोठी खेदाची बाब आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर प्रचंड नाराजी व्यक्त करीत शिक्षणाधिकाऱ्यांचा शिक्षकांवर वचक राहिलेला नसल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. मुलांना साध्या प्रश्नाचे उत्तर जर देता येत नसेल तर कठीण परिस्थिती आहे. यावर गटशिक्षणाधिकाऱ्यांचे लक्ष नसून तुम्ही शाळांवर भेटी देता की नाही? यावर सभापतींनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. विद्यार्थ्यांची ढासळत चाललेली गुणवत्ता रोखण्यासाठी आता शिक्षणाधिकाऱ्यांनी रिमोट दाबावा व शिक्षकांवर वचक निर्माण करीत गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करा, असे आदेश सभापतींनी दिले.देवगड तालुक्यात १०१ पदवीधर शिक्षकाची पदे रिक्त असून याकडे शिक्षण विभाग दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप सदस्य विष्णू घाडी यांनी करीत या विभागावर नाराजी व्यक्त केली. देवगडवरच अन्याय होत असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले. यावर सभापती प्रकाश कवठणकर यांनी या विषयावर आपण मार्ग काढू, असे सांगत वादावर पडदा टाकला. (प्रतिनिधी)