शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
2
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
3
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
4
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
5
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
6
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
7
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
8
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
9
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
10
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
11
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
12
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
13
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
14
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
15
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
16
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
17
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
18
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
19
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
20
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."

शिक्षण विभागावर ताशेर

By admin | Updated: August 5, 2014 23:43 IST

शैक्षणिक गुणवत्तेचा मुद्दा : शिक्षण समितीच्या सभेत खडाजंगीे

सिंधुदुर्गनगरी : जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ताही दिवसेंदिवस ढासळत चालली असल्याचा आरोप होत असतानाच आता चक्क शिक्षण सभापती प्रकाश कवठणकर यांनी ‘शैक्षणिक गुणवत्ता’ या मुद्यावरून शिक्षण विभागावर ताशेरे ओढले. या विषयावरून सभागृहात खडाजंगी झाली. गटशिक्षणाधिकारी सभागृहात केवळ कागदोपत्री माहिती पुरवत असून प्रत्यक्षात मात्र गुणवत्तेबाबत ‘हवेत’ न राहता सद्यपरिस्थितीत गुणवत्तेची स्थिती काय आहे ते पहावे. शिक्षणाधिकारी धाकोरकर यांनी घसरत चाललेल्या गुणवत्तेच्या पार्श्वभूमीवर वेळीच रिमोट दाबा, असे आदेशही यावेळी प्रकाश कवठणकर यांनी दिले.शिक्षण समितीची मासिक सभा येथील बॅ. नाथ पै सभागृहात सभापती प्रकाश कवठणकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी समिती सदस्य प्रमोद कामत, स्रेहलता चोरगे, सुषमा कोदे, राजेंद्र म्हापसेकर, विष्णू घाडी, स्वीकृत सदस्य संजय बगळे, फादर लोबो, संतोष पाताडे, समिती सचिव तथा प्राथमिक शिक्षणाधिकारी रत्नाकर धाकोरकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी देवीदास कुलाल, सर्व गटशिक्षणाधिकारी, अधिकारी, खातेप्रमुख उपस्थित होते.जिल्हा परिषद प्राथमिक शाळांची शैक्षणिक गुणवत्ता खालावत जात असल्याचे आरोप जिल्हा परिषद उपाध्यक्षांनी उदाहरणासह सभागृहात सादर केले असल्याची घटना ताजी असतानाच आता शिक्षण सभापती प्रकाश कवठणकर यांनी मंगळवारच्या सभेत शैक्षणिक गुणवत्तेबाबत तीव्र नाराजी व्यक्त करीत शिक्षण विभागावर ताशेरे ओढले.दोडामार्ग तालुक्यातील शाळांची भरारी पथकामार्फत तपासणी केली असता एका शाळेत शिक्षकालाच एक प्रश्न विचारला असता त्यांना त्याचे उत्तर देता आले नाही, ही मोठी खेदाची बाब आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर प्रचंड नाराजी व्यक्त करीत शिक्षणाधिकाऱ्यांचा शिक्षकांवर वचक राहिलेला नसल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. मुलांना साध्या प्रश्नाचे उत्तर जर देता येत नसेल तर कठीण परिस्थिती आहे. यावर गटशिक्षणाधिकाऱ्यांचे लक्ष नसून तुम्ही शाळांवर भेटी देता की नाही? यावर सभापतींनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. विद्यार्थ्यांची ढासळत चाललेली गुणवत्ता रोखण्यासाठी आता शिक्षणाधिकाऱ्यांनी रिमोट दाबावा व शिक्षकांवर वचक निर्माण करीत गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करा, असे आदेश सभापतींनी दिले.देवगड तालुक्यात १०१ पदवीधर शिक्षकाची पदे रिक्त असून याकडे शिक्षण विभाग दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप सदस्य विष्णू घाडी यांनी करीत या विभागावर नाराजी व्यक्त केली. देवगडवरच अन्याय होत असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले. यावर सभापती प्रकाश कवठणकर यांनी या विषयावर आपण मार्ग काढू, असे सांगत वादावर पडदा टाकला. (प्रतिनिधी)