शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
9
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
10
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
11
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
12
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
13
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
14
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
15
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
16
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
17
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
18
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
19
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
20
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना

तिलारी प्रकल्पग्रस्तांची सरकारकडून चेष्टाच

By admin | Updated: September 16, 2015 00:42 IST

न्यायालयात जाण्याचा इशारा : शासकीय सेवेत सामील करून घेण्याची मागणी

कसई दोडामार्ग : वनटाईम सेटलमेंट करून तिलारी प्रकल्पग्रस्तांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. तिलारी धरणग्रस्तांना वनटाईम सेटलमेंट म्हणून पाच लाख रूपये देणे, म्हणजे एकप्रकारे शासनाने धरणग्रस्तांची क्रूर चेष्टा केली आहे. शासनाने देऊ केलेली रक्कम पाच लाखांऐवजी प्रत्येक कुटुंबामध्ये किमान २० ते २५ लाख देणे आवश्यक आहे. अन्यथा शासनाने तिलारी धरणग्रस्तांना शासन सेवेत समाविष्ट करून घ्यावे, अशी मागणी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष दत्ताराम गावकर यांनी केली आहे. याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दत्ताराम गावकर यांनी म्हटले आहे की, तिलारी प्रकल्पग्रस्तांना वनटाईम सेटलमेंट करून पाच लाख रूपये दिले, म्हणजे शासनाने चेष्टा केली आहे. प्रकल्पग्रस्तांचे दाखले देताना त्यावेळी एक कुटुंब एक दाखला देण्यात आला. त्यामुळे कुटुंबातील इतर भावंडांवर अन्याय झाला आहे. आजच्या घडीला एका कुटुंबाची अनेक कुटुंबे झाली आहेत. परंतु धरणग्रस्त दाखला नसल्याने त्या कुटुंबांना वनटाईम सेटलमेंटची रक्कम अपुरी अशीच आहे. धरणग्रस्तांना शासन सेवेत घेतल्यास किंवा नोकरी दिली गेल्यास कायमस्वरूपी धरणप्रकल्पग्रस्तांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटला असता. परंतु शासनाने देय केलेली पाच लाख रूपये रक्कम त्या कुटुंबातील आई, वडील, भाऊ, बहिणींना अपुरी असल्याने प्रकल्पग्रस्तांमध्ये एक प्रकारे नाराजी पसरली आहे. शासनाने देऊ केलेली रक्कम पाच लाखाऐवजी प्रत्येक कुटुंबामध्ये किमान २० ते २५ लाख रूपये देणे आवश्यक आहे. अन्यथा शासनाने तिलारी धरणग्रस्तांना शासन सेवेत घ्यावे, असे गावकर यांनी म्हटले आहे. शासनाने फक्त तिलारी धरणामध्ये बाधित असणाऱ्या शेतकऱ्यांना हा मोबदला देय केलेला आहे. परंतु उन्नेयी बंधारा, कालवे यासाठी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी शासनाने संपादित केल्या, त्या शेतकऱ्यांवर मात्र अन्याय केलेला आहे. धरणासाठी संपादित केलेली जागा व कालव्यासाठी तसेच इतर कारणांसाठी संपादित केलेली जागा यामध्ये दुजाभावाची वागणूक करून प्रकल्प व धरणग्रस्त समितीची घोर फसवणूक केली आहे. शासनाने याबाबत योग्य तो निर्णय न दिल्यास किंवा वनटाईम सेटलमेंट वाढीव रक्कम न दिल्यास धरणग्रस्तांच्यावतीने महाराष्ट्र नवनिर्माण सेना न्यायालयात दाद मागेल. यासाठी सर्व धरणग्रस्तांनी वाढीव रकमेसाठी लढा देण्यासाठी एकत्रित यावे, असे आवाहन गावकर यांनी केले आहे. अनेकवेळा आंदोलने, उपोषणे झाली. परंतु तिलारी धरणग्रस्तांना न्याय देण्यात आघाडी सरकार व युती सरकार अपयशी ठरले. माजी आमदार परशुराम उपरकर यांनी धरणग्रस्तांच्या पाठीशी ठाम राहण्याचे आश्वासन देऊन त्यांना वाढीव वनटाईम सेटलमेंटसाठी प्रसंगी न्यायालयात दाद मागू, असे सांगितले होते. त्यासाठी तिलारी धरणग्रस्तांनी आपली एकजूट दाखवून प्रत्येक कुटुंबप्रमुखाला सेटलमेंट मिळावी, म्हणून एकत्र यावे, असे गावकर यांनी यावेळी बोलताना सांगितले. (वार्ताहर)