शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

तिलारी प्रकल्पग्रस्तांची सरकारकडून चेष्टाच

By admin | Updated: September 16, 2015 00:42 IST

न्यायालयात जाण्याचा इशारा : शासकीय सेवेत सामील करून घेण्याची मागणी

कसई दोडामार्ग : वनटाईम सेटलमेंट करून तिलारी प्रकल्पग्रस्तांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. तिलारी धरणग्रस्तांना वनटाईम सेटलमेंट म्हणून पाच लाख रूपये देणे, म्हणजे एकप्रकारे शासनाने धरणग्रस्तांची क्रूर चेष्टा केली आहे. शासनाने देऊ केलेली रक्कम पाच लाखांऐवजी प्रत्येक कुटुंबामध्ये किमान २० ते २५ लाख देणे आवश्यक आहे. अन्यथा शासनाने तिलारी धरणग्रस्तांना शासन सेवेत समाविष्ट करून घ्यावे, अशी मागणी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष दत्ताराम गावकर यांनी केली आहे. याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दत्ताराम गावकर यांनी म्हटले आहे की, तिलारी प्रकल्पग्रस्तांना वनटाईम सेटलमेंट करून पाच लाख रूपये दिले, म्हणजे शासनाने चेष्टा केली आहे. प्रकल्पग्रस्तांचे दाखले देताना त्यावेळी एक कुटुंब एक दाखला देण्यात आला. त्यामुळे कुटुंबातील इतर भावंडांवर अन्याय झाला आहे. आजच्या घडीला एका कुटुंबाची अनेक कुटुंबे झाली आहेत. परंतु धरणग्रस्त दाखला नसल्याने त्या कुटुंबांना वनटाईम सेटलमेंटची रक्कम अपुरी अशीच आहे. धरणग्रस्तांना शासन सेवेत घेतल्यास किंवा नोकरी दिली गेल्यास कायमस्वरूपी धरणप्रकल्पग्रस्तांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटला असता. परंतु शासनाने देय केलेली पाच लाख रूपये रक्कम त्या कुटुंबातील आई, वडील, भाऊ, बहिणींना अपुरी असल्याने प्रकल्पग्रस्तांमध्ये एक प्रकारे नाराजी पसरली आहे. शासनाने देऊ केलेली रक्कम पाच लाखाऐवजी प्रत्येक कुटुंबामध्ये किमान २० ते २५ लाख रूपये देणे आवश्यक आहे. अन्यथा शासनाने तिलारी धरणग्रस्तांना शासन सेवेत घ्यावे, असे गावकर यांनी म्हटले आहे. शासनाने फक्त तिलारी धरणामध्ये बाधित असणाऱ्या शेतकऱ्यांना हा मोबदला देय केलेला आहे. परंतु उन्नेयी बंधारा, कालवे यासाठी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी शासनाने संपादित केल्या, त्या शेतकऱ्यांवर मात्र अन्याय केलेला आहे. धरणासाठी संपादित केलेली जागा व कालव्यासाठी तसेच इतर कारणांसाठी संपादित केलेली जागा यामध्ये दुजाभावाची वागणूक करून प्रकल्प व धरणग्रस्त समितीची घोर फसवणूक केली आहे. शासनाने याबाबत योग्य तो निर्णय न दिल्यास किंवा वनटाईम सेटलमेंट वाढीव रक्कम न दिल्यास धरणग्रस्तांच्यावतीने महाराष्ट्र नवनिर्माण सेना न्यायालयात दाद मागेल. यासाठी सर्व धरणग्रस्तांनी वाढीव रकमेसाठी लढा देण्यासाठी एकत्रित यावे, असे आवाहन गावकर यांनी केले आहे. अनेकवेळा आंदोलने, उपोषणे झाली. परंतु तिलारी धरणग्रस्तांना न्याय देण्यात आघाडी सरकार व युती सरकार अपयशी ठरले. माजी आमदार परशुराम उपरकर यांनी धरणग्रस्तांच्या पाठीशी ठाम राहण्याचे आश्वासन देऊन त्यांना वाढीव वनटाईम सेटलमेंटसाठी प्रसंगी न्यायालयात दाद मागू, असे सांगितले होते. त्यासाठी तिलारी धरणग्रस्तांनी आपली एकजूट दाखवून प्रत्येक कुटुंबप्रमुखाला सेटलमेंट मिळावी, म्हणून एकत्र यावे, असे गावकर यांनी यावेळी बोलताना सांगितले. (वार्ताहर)